शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

...अन् कुपोषित बाळाला मिळाले जीवदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 14:27 IST

त्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेच्या कायकर्त्यांच्या प्रसांगावधनामुळे तालुक्यातील बर्ड्याचे पाडा येथील गंभीर अवस्थेतील अतितिव्र कुपोषित बाळाला जीवदान मिळाले आहे. अंधश्रद्धेला फाटा देत बाळावर तातडीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला आहे.

त्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेच्या कायकर्त्यांच्या प्रसांगावधनामुळे तालुक्यातील बर्ड्याचे पाडा येथील गंभीर अवस्थेतील अतितिव्र कुपोषित बाळाला जीवदान मिळाले आहे. अंधश्रद्धेला फाटा देत बाळावर तातडीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला आहे.तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायतीच्या बर्ड्याचे पाडा येथील लचके कुटूंबियातील दीड वर्षाचे बाळ ज्ञानेश्वर हे गेल्या काही दिवसांपासून अतितीव्र कुपोषित झाले होते. त्याची तब्येतही अत्यंत गंभीर झाली होती. त्या बाळावर डॉक्टरांकडून औषधोपचार न करता त्याला काहीतरी भूतबाधा झाली म्हणून भगताकडे नेले जात होते. दिवसेंदिवस बाळाची तब्येत जास्तच खालावत चालली होती. तरी देखील या बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत नव्हते, याबाबतची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी तात्काळ त्या बाळाला त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले मात्र तेथे देखील त्या बाळाची आजी म्हणत होती की, बाळाला दवाखान्यात फरक पडणार नाही. त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रु ग्णालयात कोणालाही न विचारता गुपचूप बाळाला घेऊन आजी पळ काढत होती. परंतु त्यांना न जुमानता संघटनेचे सचिव तानाजी शिद यांनी जबरदस्तीने त्या बाळाला पुनश्च हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की बाळाची तब्येत चिंताजनक आहे, ज्ञानेश्वरला त्वरित नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल करावे लागेल. अखेर शिद यांनी स्वत: जबाबदारी घेत बाळाला १०८ च्या रु ग्ण वाहिकेतून नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. कार्यकर्ते बाळाच्या सोबत जिल्हा रु ग्णालयात थांबले होते. बाळावर उपचार सुरु केले गेले. तब्बल १३ दिवसांत बाळाला बरे वाटु लागले, त्यानंतर आणखी तीन ते चार दिवस बाळाला आहार दिला. त्यामुळे ज्ञानेश्वर खेळू लागला, हसू लागला. त्यानंतर १७ व्या दिवशी बाळाला घरी आणले. विशेष म्हणजे बाळाला दाखल केल्यापासून संघटनेचे कार्यकर्ते रु ग्णालयात सतत त्या बाळाच्या उपचाराची काळजी घेत होते. ज्ञानेश्वर व त्याच्या आईच्या चेहऱ्यावर फुलले हसू पाहून सर्वांचे मन सुखावून गेले होते.

टॅग्स :Nashikनाशिक