शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

दीडशे एकर कोबीवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:17 IST

सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली. ‘दैव देते अन् कर्म नेते’ अशी नैसर्गिक आपत्ती बळीराजावर ओढवल्यामुळे नायगाव परिसरातील कोबी उत्पादक शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात लोटला गेला आहे. संपूर्ण नायगाव खोºयात सुमारे १३ कोटी रुपयांच्यावर शेतकºयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने होरपळून आर्थिक बोजाखाली सापडला जाणारा शेतकरी यावर्षी कोबी व टमाटे ही पिके अस्मानी (नैसर्गिक) संकटामुळे काढणीला आलेले असताना शेतातच खराब (सडले) झाल्यामुळे परिसरातील शेकडो शेतकºयांच्या सुमारे दीडशे एकर कोबी पिकाचे म्हणजे सुमारे दोन हजार २०० टन कोबीचे नुकसान झाले असल्याचे परिसरात बोलले जात आहे. आहे. परिसरातील नायगाव, जायगाव, वडझिरे, देशवंडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबी व टमाट्याचे पीक घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकºयांनी हे पीक घेतले होते. महागडे बी, खते, औषधे व मजुरीचा एकूण ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च करुन हे पीक घेतले होते; मात्र काढणीला काही दिवस शिल्लक असताना या पिकांवर करपा, दांड्या, काळ्या टिपक्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन दहा-पंधरा दिवसांत हे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने बाजारात विक्री अयोग्य झाले. दरम्यान गेल्या महिनाभरापासून कोबीला अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मालाची प्रतवारी पाहून ७ ते १३ रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी शेतात खरेदी करत आहे. सध्याच्या सरासरी बाजारभावाप्रमाणे सुमारे बारा ते तेरा कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हे पीक विक्रीसाठी आले असते तर या पिकाचे बºयापैकी पैसे बळीराजाच्या पदरात पडले असते. मात्र, अगदी हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास निसर्गाने अक्षरश: हिसकावून घेतल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे कष्टकरी शेतकरी राजा निसर्गाच्या या अवकृपेमुळे आर्थिक बोजाखाली पुन्हा एखादा दबला गेला आहे, असे म्हटले तरी वावगे ठारणार नाही.