शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

दीडशे एकर कोबीवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:17 IST

सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली. ‘दैव देते अन् कर्म नेते’ अशी नैसर्गिक आपत्ती बळीराजावर ओढवल्यामुळे नायगाव परिसरातील कोबी उत्पादक शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात लोटला गेला आहे. संपूर्ण नायगाव खोºयात सुमारे १३ कोटी रुपयांच्यावर शेतकºयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने होरपळून आर्थिक बोजाखाली सापडला जाणारा शेतकरी यावर्षी कोबी व टमाटे ही पिके अस्मानी (नैसर्गिक) संकटामुळे काढणीला आलेले असताना शेतातच खराब (सडले) झाल्यामुळे परिसरातील शेकडो शेतकºयांच्या सुमारे दीडशे एकर कोबी पिकाचे म्हणजे सुमारे दोन हजार २०० टन कोबीचे नुकसान झाले असल्याचे परिसरात बोलले जात आहे. आहे. परिसरातील नायगाव, जायगाव, वडझिरे, देशवंडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबी व टमाट्याचे पीक घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकºयांनी हे पीक घेतले होते. महागडे बी, खते, औषधे व मजुरीचा एकूण ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च करुन हे पीक घेतले होते; मात्र काढणीला काही दिवस शिल्लक असताना या पिकांवर करपा, दांड्या, काळ्या टिपक्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन दहा-पंधरा दिवसांत हे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने बाजारात विक्री अयोग्य झाले. दरम्यान गेल्या महिनाभरापासून कोबीला अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मालाची प्रतवारी पाहून ७ ते १३ रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी शेतात खरेदी करत आहे. सध्याच्या सरासरी बाजारभावाप्रमाणे सुमारे बारा ते तेरा कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हे पीक विक्रीसाठी आले असते तर या पिकाचे बºयापैकी पैसे बळीराजाच्या पदरात पडले असते. मात्र, अगदी हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास निसर्गाने अक्षरश: हिसकावून घेतल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे कष्टकरी शेतकरी राजा निसर्गाच्या या अवकृपेमुळे आर्थिक बोजाखाली पुन्हा एखादा दबला गेला आहे, असे म्हटले तरी वावगे ठारणार नाही.