शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

दीडशे एकर कोबीवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:17 IST

सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली. ‘दैव देते अन् कर्म नेते’ अशी नैसर्गिक आपत्ती बळीराजावर ओढवल्यामुळे नायगाव परिसरातील कोबी उत्पादक शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात लोटला गेला आहे. संपूर्ण नायगाव खोºयात सुमारे १३ कोटी रुपयांच्यावर शेतकºयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने होरपळून आर्थिक बोजाखाली सापडला जाणारा शेतकरी यावर्षी कोबी व टमाटे ही पिके अस्मानी (नैसर्गिक) संकटामुळे काढणीला आलेले असताना शेतातच खराब (सडले) झाल्यामुळे परिसरातील शेकडो शेतकºयांच्या सुमारे दीडशे एकर कोबी पिकाचे म्हणजे सुमारे दोन हजार २०० टन कोबीचे नुकसान झाले असल्याचे परिसरात बोलले जात आहे. आहे. परिसरातील नायगाव, जायगाव, वडझिरे, देशवंडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबी व टमाट्याचे पीक घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकºयांनी हे पीक घेतले होते. महागडे बी, खते, औषधे व मजुरीचा एकूण ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च करुन हे पीक घेतले होते; मात्र काढणीला काही दिवस शिल्लक असताना या पिकांवर करपा, दांड्या, काळ्या टिपक्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन दहा-पंधरा दिवसांत हे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने बाजारात विक्री अयोग्य झाले. दरम्यान गेल्या महिनाभरापासून कोबीला अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मालाची प्रतवारी पाहून ७ ते १३ रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी शेतात खरेदी करत आहे. सध्याच्या सरासरी बाजारभावाप्रमाणे सुमारे बारा ते तेरा कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हे पीक विक्रीसाठी आले असते तर या पिकाचे बºयापैकी पैसे बळीराजाच्या पदरात पडले असते. मात्र, अगदी हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास निसर्गाने अक्षरश: हिसकावून घेतल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे कष्टकरी शेतकरी राजा निसर्गाच्या या अवकृपेमुळे आर्थिक बोजाखाली पुन्हा एखादा दबला गेला आहे, असे म्हटले तरी वावगे ठारणार नाही.