शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

आनंदाचे डोही आनंद तरंग...अनुपम्य सुख सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 02:03 IST

वारी ही शरीराची व्यवस्था नसून मनाची अवस्था आहे. आपली संसारात जशी एक व्यवस्था असते प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळच्या वेळी हवी असते. त्यासाठी मनुष्य सतत धावपळ करीत असतो. संघर्ष करतो, श्रम करतो आणि धन, संपत्ती, वेगवेगळी साधनसुविधा मिळविण्यासाठी अपार मेहनतदेखील करत असतो.

पंडित महाराज कोल्हेवारी ही शरीराची व्यवस्था नसून मनाची अवस्था आहे. आपली संसारात जशी एक व्यवस्था असते प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळच्या वेळी हवी असते. त्यासाठी मनुष्य सतत धावपळ करीत असतो. संघर्ष करतो, श्रम करतो आणि धन, संपत्ती, वेगवेगळी साधनसुविधा मिळविण्यासाठी अपार मेहनतदेखील करत असतो. परंतु वारीमध्ये कोणतीही सोयीसुविधा नसताना मनाची अशी काही अवस्था होऊन जाते की केवळ माझ्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मी या मोहमयी संसारातून निघालो आहे आणि जे काही अन्न-पाणी मिळेल त्यावर गुजराण करीत, मिळेल तो निवारा घेत किंवा उघड्यावर रात्र काढीत मला फक्त पुढे पुढे जायचे आहे हा एकच ध्यास घेऊन वारकरी चालत राहतो. ‘मनी एक ध्यास, मनी एक आस तुझ्या दर्शनाची, तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या माथी’ अशी ती मनाची अवस्था असते. दुसरे म्हणजे वारी हा समन्वय असतो. काही लोक अन्नदान करतात, श्रीमंत लोक अन्नदान करतात; परंतु ते वारीत सहभागी होत नाहीत. काही लोक वारीत सहभागी असतात, परंतु ते परिस्थितीने गरीब असल्याने अन्नदान करू शकत नाही. याउलट काही लोक वारीतही सहभागी होतात आणि अन्नदानही करतात. म्हणजे या तिन्ही प्रकारच्या लोकांचा समन्वय येथे असतो. सर्वांनाच पुण्यप्राप्ती होते. एकप्रकारे अंतरिक समाधान मिळते. या ठिकाणी वारीमध्ये आपल्याला विचारांचा आणि आचारांचा समन्वय दिसून येतो. ‘अवघे धरू सुपंथ’ असा विचार येथे प्रत्येकांच्या मनात असतो. वारकरी सांप्रदाय हा मनुष्याला कर्म करायला प्रवृत्त करत असतो. संसारात राहूनच आपण परमार्थ साधू शकतो असे साधे सोपे तत्त्वज्ञान या वारकरी सांप्रदायाचे आहे. संतांनीदेखील हाच संदेश आपल्याला दिलेला आहे. कोणाला काही अडचण असेल तर दुसरा लगेच धावून जातो, आपल्या भाकरीतील अर्धी भाकर दुसऱ्याला देतो, पाण्याचा तांब्या दुसºयाला भरून देतो. या ठिकाणी प्रत्येक वारकरी रोज १५ ते २२ किलोमीटर पायी चालतो, परंतु मुखी हरिनामाचा गजर असल्याने त्याला चालण्याचे श्रम वाटत नाही. मन आणि शरीर भक्तिमय होऊन जाते. एक प्रकारे आनंदाचा महासागर म्हणजे वारी होय. या ठिकाणी आपली संसारिक दु:खे बाजूला ठेवून प्रत्येकजण विठुमाउलीचे भजन म्हणत राहतो, कीर्तन ऐकत असतो. एकप्रकारे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा हा अनुपम्य सुख सोहळा असतो. हा अनुभव मी स्वत: घेत आहे.(लेखक संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्याचे प्रमुख)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम