शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचे डोही आनंद तरंग...अनुपम्य सुख सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 02:03 IST

वारी ही शरीराची व्यवस्था नसून मनाची अवस्था आहे. आपली संसारात जशी एक व्यवस्था असते प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळच्या वेळी हवी असते. त्यासाठी मनुष्य सतत धावपळ करीत असतो. संघर्ष करतो, श्रम करतो आणि धन, संपत्ती, वेगवेगळी साधनसुविधा मिळविण्यासाठी अपार मेहनतदेखील करत असतो.

पंडित महाराज कोल्हेवारी ही शरीराची व्यवस्था नसून मनाची अवस्था आहे. आपली संसारात जशी एक व्यवस्था असते प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळच्या वेळी हवी असते. त्यासाठी मनुष्य सतत धावपळ करीत असतो. संघर्ष करतो, श्रम करतो आणि धन, संपत्ती, वेगवेगळी साधनसुविधा मिळविण्यासाठी अपार मेहनतदेखील करत असतो. परंतु वारीमध्ये कोणतीही सोयीसुविधा नसताना मनाची अशी काही अवस्था होऊन जाते की केवळ माझ्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मी या मोहमयी संसारातून निघालो आहे आणि जे काही अन्न-पाणी मिळेल त्यावर गुजराण करीत, मिळेल तो निवारा घेत किंवा उघड्यावर रात्र काढीत मला फक्त पुढे पुढे जायचे आहे हा एकच ध्यास घेऊन वारकरी चालत राहतो. ‘मनी एक ध्यास, मनी एक आस तुझ्या दर्शनाची, तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या माथी’ अशी ती मनाची अवस्था असते. दुसरे म्हणजे वारी हा समन्वय असतो. काही लोक अन्नदान करतात, श्रीमंत लोक अन्नदान करतात; परंतु ते वारीत सहभागी होत नाहीत. काही लोक वारीत सहभागी असतात, परंतु ते परिस्थितीने गरीब असल्याने अन्नदान करू शकत नाही. याउलट काही लोक वारीतही सहभागी होतात आणि अन्नदानही करतात. म्हणजे या तिन्ही प्रकारच्या लोकांचा समन्वय येथे असतो. सर्वांनाच पुण्यप्राप्ती होते. एकप्रकारे अंतरिक समाधान मिळते. या ठिकाणी वारीमध्ये आपल्याला विचारांचा आणि आचारांचा समन्वय दिसून येतो. ‘अवघे धरू सुपंथ’ असा विचार येथे प्रत्येकांच्या मनात असतो. वारकरी सांप्रदाय हा मनुष्याला कर्म करायला प्रवृत्त करत असतो. संसारात राहूनच आपण परमार्थ साधू शकतो असे साधे सोपे तत्त्वज्ञान या वारकरी सांप्रदायाचे आहे. संतांनीदेखील हाच संदेश आपल्याला दिलेला आहे. कोणाला काही अडचण असेल तर दुसरा लगेच धावून जातो, आपल्या भाकरीतील अर्धी भाकर दुसऱ्याला देतो, पाण्याचा तांब्या दुसºयाला भरून देतो. या ठिकाणी प्रत्येक वारकरी रोज १५ ते २२ किलोमीटर पायी चालतो, परंतु मुखी हरिनामाचा गजर असल्याने त्याला चालण्याचे श्रम वाटत नाही. मन आणि शरीर भक्तिमय होऊन जाते. एक प्रकारे आनंदाचा महासागर म्हणजे वारी होय. या ठिकाणी आपली संसारिक दु:खे बाजूला ठेवून प्रत्येकजण विठुमाउलीचे भजन म्हणत राहतो, कीर्तन ऐकत असतो. एकप्रकारे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा हा अनुपम्य सुख सोहळा असतो. हा अनुभव मी स्वत: घेत आहे.(लेखक संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्याचे प्रमुख)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम