शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मीय वारकऱ्यांना सामावून घेणारा आनंद सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:14 IST

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती.

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती. संत नामदेव महाराजांनी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपल्या भक्त व परिवारासह येथे हजेरी लावली होती. वारकरी संप्रदायात वारीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून दिंड्या आणि पालख्या येतात. तीर्थक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते. तर तीर्थक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. शेगावाहून गजानन महाराजांची पालखी येते. परभणी जिल्ह्यातून संत नामदेव महाराजांची पालखी तर पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी येते. खान्देशातून संत मुक्ताबार्इंची पालखी निघते. याशिवाय अनेक संतांच्या पालख्या येतात. सर्व जाती-जमातीचे लोक यामध्ये सहभागी झालेले असतात.‘विठु माझा लेकुरवाळा।संगे गोपाळांचा मेळा।।’असा आनंद सोहळा असतो. एकप्रकारे आध्यात्मिक आनंद या वारीमधून मिळतो. त्यामुळे जन्मभरात एकदा तरी वारी करावी, असे म्हटले जाते.‘सुखा लागे करीशी तळमळ ।तरी तू जाय एकवेळ, पंढरपूर।।मग, तू अवघाची सुखरूप होशी ।दु:ख विसरशी, तू जन्मोजन्मीचे ।।असे या वारीचे माहात्म्य सांगण्यात येते. आमच्या परिवारात वारीची परंपरा पूर्वीपासून आहे. माझ्या वडिलांनी हयातभर पंढरीची वारी केली. मीदेखील संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत गेलो आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीसोबत वारी केली आहे. संत निवृत्तिनाथ संस्थानचा अध्यक्ष असतानाच्या काळात वारकºयांना सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून नेहमीच प्रयत्न केला. पूर्वी वारकºयांची संख्या कमी असायची. आता दरवर्षी वारकºयांची संख्या वाढत आहे. पूर्वी बैलगाडीतून पालखी नेत असत, सामान वाहन्यासाठीदेखील फारशी साधने नव्हती. आता पालखीसाठी रथ बनविण्यात आलेला आहे. सामान नेण्यासाठी वाहने असतात. त्याचबरोबर पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका, पुरेशी औषधी आणि डॉक्टरांचे पथकदेखील असते. वारीमध्ये तरुणांची संख्या वाढते आहे. काळानुरूप वारीत बदल होत आहे. तरुणवर्ग धार्मिक आध्यात्मिकतेकडे वळत असून, ही समाधानाची बाब आहे. - त्र्यंबकराव गायकवाड (लेखक, संत निवृत्तिनाथ  संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी