शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मीय वारकऱ्यांना सामावून घेणारा आनंद सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:14 IST

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती.

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती. संत नामदेव महाराजांनी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपल्या भक्त व परिवारासह येथे हजेरी लावली होती. वारकरी संप्रदायात वारीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून दिंड्या आणि पालख्या येतात. तीर्थक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते. तर तीर्थक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. शेगावाहून गजानन महाराजांची पालखी येते. परभणी जिल्ह्यातून संत नामदेव महाराजांची पालखी तर पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी येते. खान्देशातून संत मुक्ताबार्इंची पालखी निघते. याशिवाय अनेक संतांच्या पालख्या येतात. सर्व जाती-जमातीचे लोक यामध्ये सहभागी झालेले असतात.‘विठु माझा लेकुरवाळा।संगे गोपाळांचा मेळा।।’असा आनंद सोहळा असतो. एकप्रकारे आध्यात्मिक आनंद या वारीमधून मिळतो. त्यामुळे जन्मभरात एकदा तरी वारी करावी, असे म्हटले जाते.‘सुखा लागे करीशी तळमळ ।तरी तू जाय एकवेळ, पंढरपूर।।मग, तू अवघाची सुखरूप होशी ।दु:ख विसरशी, तू जन्मोजन्मीचे ।।असे या वारीचे माहात्म्य सांगण्यात येते. आमच्या परिवारात वारीची परंपरा पूर्वीपासून आहे. माझ्या वडिलांनी हयातभर पंढरीची वारी केली. मीदेखील संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत गेलो आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीसोबत वारी केली आहे. संत निवृत्तिनाथ संस्थानचा अध्यक्ष असतानाच्या काळात वारकºयांना सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून नेहमीच प्रयत्न केला. पूर्वी वारकºयांची संख्या कमी असायची. आता दरवर्षी वारकºयांची संख्या वाढत आहे. पूर्वी बैलगाडीतून पालखी नेत असत, सामान वाहन्यासाठीदेखील फारशी साधने नव्हती. आता पालखीसाठी रथ बनविण्यात आलेला आहे. सामान नेण्यासाठी वाहने असतात. त्याचबरोबर पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका, पुरेशी औषधी आणि डॉक्टरांचे पथकदेखील असते. वारीमध्ये तरुणांची संख्या वाढते आहे. काळानुरूप वारीत बदल होत आहे. तरुणवर्ग धार्मिक आध्यात्मिकतेकडे वळत असून, ही समाधानाची बाब आहे. - त्र्यंबकराव गायकवाड (लेखक, संत निवृत्तिनाथ  संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी