शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

केरळमधून येणाऱ्या मसाल्याचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:21 IST

केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे भुसार बाजारात वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांच्या आवकेवर परिणाम झाला असून, आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीच्या भावात प्रतिकिलोमागे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नाशिक : केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे भुसार बाजारात वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांच्या आवकेवर परिणाम झाला असून, आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीच्या भावात प्रतिकिलोमागे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केरळ राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे येथील उत्पादनावर परिणाम झाला असून, आगामी काळात या सर्व मसाल्याच्या पदार्थांच्या भावात तेजी येण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.  केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये विलायची, काळी मिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीसोबत लवंग, खोबरे, दालचिनी यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. याखेरीज तामिळनाडू, कर्नाटकमध्येही या पिकांचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, केरळच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू होता. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र, जोरदार पावसाने शेतकºयांचे हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फिरले आहे.  दरम्यान, काळी मिरी आणि सुंठाचे उत्पादन यापूर्वी शेतकºयांनी घेतले असून बहुतांश मालाचा गुदाममध्ये साठा करून ठेवण्यात आला होता. मात्र, केरळमधील पूरपरिस्थितीमुळे गोदामांमध्ये पाणी शिरल्याने ७० ते ८ ० टक्क्यांहून अधिक माल भिजला असून, त्याचा मोठा फटका मसाल्याच्या बाजारपेठांना बसला आहे.गेल्या दहा दिवसांपासून भुसार बाजारात मसाल्याच्या वस्तूंची आवक झाली नसल्याचे व्यापारी सांगत असून आगामी काळातही आवक वाढण्याची शक्यता कमी आहे. येणाºया दिवसांमध्ये मसाल्याच्या पदार्थांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे घाऊक व्यापाºयांकडून सांगण्यात येत आहे.खोबरेल  तेलाची आवकही घटलीकेरळमधील पुरामुळे तेथून होणाºया मसाल्यांची व खोबरेल तेलाची आवक कमी झाल्यामुळे या वस्तूची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. खोबरेल तेलाची केरळमधून होणारी आवक थांबली तरी राज्यात व्यापाºयांकडे साठा आहे. अन्य राज्यांतूनही तेल येत असल्याने किमती स्थिर आहेत. पण केरळातील स्थिती सुधारली नाही, तर खोबरेल तेल महागण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.केरळ येथील गुदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने येत्या काळात केरळ येथून होणाºया मसाल्यांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नाही.  - बाबुभाई पटेल, संचालक, श्री वाराही ट्रेडिंग कंपनी

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरMarketबाजार