शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

केरळमधून येणाऱ्या मसाल्याचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:21 IST

केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे भुसार बाजारात वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांच्या आवकेवर परिणाम झाला असून, आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीच्या भावात प्रतिकिलोमागे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नाशिक : केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे भुसार बाजारात वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांच्या आवकेवर परिणाम झाला असून, आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीच्या भावात प्रतिकिलोमागे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केरळ राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे येथील उत्पादनावर परिणाम झाला असून, आगामी काळात या सर्व मसाल्याच्या पदार्थांच्या भावात तेजी येण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.  केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये विलायची, काळी मिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीसोबत लवंग, खोबरे, दालचिनी यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. याखेरीज तामिळनाडू, कर्नाटकमध्येही या पिकांचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, केरळच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू होता. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र, जोरदार पावसाने शेतकºयांचे हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फिरले आहे.  दरम्यान, काळी मिरी आणि सुंठाचे उत्पादन यापूर्वी शेतकºयांनी घेतले असून बहुतांश मालाचा गुदाममध्ये साठा करून ठेवण्यात आला होता. मात्र, केरळमधील पूरपरिस्थितीमुळे गोदामांमध्ये पाणी शिरल्याने ७० ते ८ ० टक्क्यांहून अधिक माल भिजला असून, त्याचा मोठा फटका मसाल्याच्या बाजारपेठांना बसला आहे.गेल्या दहा दिवसांपासून भुसार बाजारात मसाल्याच्या वस्तूंची आवक झाली नसल्याचे व्यापारी सांगत असून आगामी काळातही आवक वाढण्याची शक्यता कमी आहे. येणाºया दिवसांमध्ये मसाल्याच्या पदार्थांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे घाऊक व्यापाºयांकडून सांगण्यात येत आहे.खोबरेल  तेलाची आवकही घटलीकेरळमधील पुरामुळे तेथून होणाºया मसाल्यांची व खोबरेल तेलाची आवक कमी झाल्यामुळे या वस्तूची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. खोबरेल तेलाची केरळमधून होणारी आवक थांबली तरी राज्यात व्यापाºयांकडे साठा आहे. अन्य राज्यांतूनही तेल येत असल्याने किमती स्थिर आहेत. पण केरळातील स्थिती सुधारली नाही, तर खोबरेल तेल महागण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.केरळ येथील गुदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने येत्या काळात केरळ येथून होणाºया मसाल्यांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नाही.  - बाबुभाई पटेल, संचालक, श्री वाराही ट्रेडिंग कंपनी

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरMarketबाजार