शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

विधानसभेसाठी मतदार याद्यांची दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:50 IST

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत व पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या काळात अशाच प्रकारे राज्यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी तक्रारी केल्या होत्या. निवडणूक यंत्रणेने परस्पर मतदार यादीतील नावे वगळल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात मतदारांनी धाव

ठळक मुद्देलोकसभेच्या तक्रारीची दखल : दुबार, मयत वगळणारआयोगाने मतदारांना १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना त्यांची नाव सापडली नाहीत, तर अनेकांची एकापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर नावे असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने या सर्व तक्रारींची दखल घेत येत्या विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निवडणूक विभागाने आत्तापासूनच मतदार यादी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या संदर्भात सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दुबार व मयत मतदारांची नावे तत्काळ वगळण्याचे तर त्यांच्याकडे नाव नोंदणीचे पडून असलेल्या मतदारांच्या अर्जांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत व पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या काळात अशाच प्रकारे राज्यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी तक्रारी केल्या होत्या. निवडणूक यंत्रणेने परस्पर मतदार यादीतील नावे वगळल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात मतदारांनी धाव घेण्याचा प्रकारही घडला होता. त्यानंतर मात्र निवडणूक आयोगाने मतदारांबाबत काटेकोरपणे काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची खात्री करण्याबरोबरच त्यांचे एकापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर नाव असेल तर त्याबाबत नोटीस बजावून एकाच मतदान केंद्रावर नाव असण्याचा आग्रह धरला होता. अर्थात हे सारे प्रयत्न कागदोपत्री ठरले. त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली व आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीदेखील असाच अनुभव मतदारांना घ्यावा लागला. कदाचित मतदार यादीतील घोळ गृहीत धरूनच निवडणूक आयोगाने मतदारांना १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला होता. त्याद्वारे मतदाराला त्याचे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधून देण्यात आले. ज्यांनी या सेवेचा लाभ घेतला त्यांची नोंद निवडणूक यंत्रणेने घेतली, परंतु मतदानाच्या दिवशी नाव सापडले नाही या कारणावरून अनेक मतदार मतदान केंद्रावरून परत गेले. परिणामी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने गेल्या काही महिन्यांपासून मतदार जागृती अभियान राबवूनही मतदानाचा टक्का वाढू शकला नाही. या संदर्भातील तक्रारी प्रामुख्याने नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ, मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य या सहा मतदारसंघांत करण्यात आल्या. त्यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निवडणूक यंत्रणेने दोन दिवसांपूर्वीच सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नायब तहसीलदारांची बैठक घेऊन त्यांना याबाबतच्या सक्त सूचना केल्या. ज्यांनी लोकसभा निवडणुकीत तक्रारी केल्या त्यांची यादीच सोपविण्यात आली असून, त्या आधारे मतदार यादीची दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय