शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

विधानसभेसाठी मतदार याद्यांची दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:50 IST

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत व पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या काळात अशाच प्रकारे राज्यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी तक्रारी केल्या होत्या. निवडणूक यंत्रणेने परस्पर मतदार यादीतील नावे वगळल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात मतदारांनी धाव

ठळक मुद्देलोकसभेच्या तक्रारीची दखल : दुबार, मयत वगळणारआयोगाने मतदारांना १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना त्यांची नाव सापडली नाहीत, तर अनेकांची एकापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर नावे असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने या सर्व तक्रारींची दखल घेत येत्या विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निवडणूक विभागाने आत्तापासूनच मतदार यादी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या संदर्भात सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दुबार व मयत मतदारांची नावे तत्काळ वगळण्याचे तर त्यांच्याकडे नाव नोंदणीचे पडून असलेल्या मतदारांच्या अर्जांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत व पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या काळात अशाच प्रकारे राज्यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी तक्रारी केल्या होत्या. निवडणूक यंत्रणेने परस्पर मतदार यादीतील नावे वगळल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात मतदारांनी धाव घेण्याचा प्रकारही घडला होता. त्यानंतर मात्र निवडणूक आयोगाने मतदारांबाबत काटेकोरपणे काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची खात्री करण्याबरोबरच त्यांचे एकापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर नाव असेल तर त्याबाबत नोटीस बजावून एकाच मतदान केंद्रावर नाव असण्याचा आग्रह धरला होता. अर्थात हे सारे प्रयत्न कागदोपत्री ठरले. त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली व आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीदेखील असाच अनुभव मतदारांना घ्यावा लागला. कदाचित मतदार यादीतील घोळ गृहीत धरूनच निवडणूक आयोगाने मतदारांना १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला होता. त्याद्वारे मतदाराला त्याचे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधून देण्यात आले. ज्यांनी या सेवेचा लाभ घेतला त्यांची नोंद निवडणूक यंत्रणेने घेतली, परंतु मतदानाच्या दिवशी नाव सापडले नाही या कारणावरून अनेक मतदार मतदान केंद्रावरून परत गेले. परिणामी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने गेल्या काही महिन्यांपासून मतदार जागृती अभियान राबवूनही मतदानाचा टक्का वाढू शकला नाही. या संदर्भातील तक्रारी प्रामुख्याने नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ, मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य या सहा मतदारसंघांत करण्यात आल्या. त्यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निवडणूक यंत्रणेने दोन दिवसांपूर्वीच सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नायब तहसीलदारांची बैठक घेऊन त्यांना याबाबतच्या सक्त सूचना केल्या. ज्यांनी लोकसभा निवडणुकीत तक्रारी केल्या त्यांची यादीच सोपविण्यात आली असून, त्या आधारे मतदार यादीची दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय