शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अंबोली धरण ओव्हरफ्लो; त्र्यंबकला दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:14 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली धरण ओव्हरफ्लो झाले तरी शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, ...

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली धरण ओव्हरफ्लो झाले तरी शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरूनही शहरातील श्री निरंजनी आखाडा परिसरात असलेल्या आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी काॅलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र, गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवाशांना गेल्या सात दिवसांपासून पाणीच नसल्याने अन्य जलाशयातून पाण्याची गरज भागवावी लागत आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत ‘आंधळं दळतंय नि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर नगरपरिषद गंभीर नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना अपेक्षित असताना चालढकल केली जात आहे. अनेक भागात सात ते आठ दिवसांपासून पाणी नसल्याने संबंधित भागातील रहिवासी विहिरी, झरे अशा माध्यमातून पाणी आणत आहेत. त्यामुळे अनेकांना साथीचे आजार जडले आहेत. नगर परिषद अहिल्या धरण, अंबोली धरण, बेझे येथील गौतमी प्रकल्पातून पाणी उचलत असते. अशावेळी पालिकेने यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.