शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

अंबोली धरण ओव्हरफ्लो; त्र्यंबकला दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:14 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली धरण ओव्हरफ्लो झाले तरी शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, ...

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली धरण ओव्हरफ्लो झाले तरी शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरूनही शहरातील श्री निरंजनी आखाडा परिसरात असलेल्या आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी काॅलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र, गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवाशांना गेल्या सात दिवसांपासून पाणीच नसल्याने अन्य जलाशयातून पाण्याची गरज भागवावी लागत आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत ‘आंधळं दळतंय नि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर नगरपरिषद गंभीर नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना अपेक्षित असताना चालढकल केली जात आहे. अनेक भागात सात ते आठ दिवसांपासून पाणी नसल्याने संबंधित भागातील रहिवासी विहिरी, झरे अशा माध्यमातून पाणी आणत आहेत. त्यामुळे अनेकांना साथीचे आजार जडले आहेत. नगर परिषद अहिल्या धरण, अंबोली धरण, बेझे येथील गौतमी प्रकल्पातून पाणी उचलत असते. अशावेळी पालिकेने यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.