शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राष्ट्रवादीच्या विचारांशी कायम बांधील; माजी आमदार हिरेंचे स्पष्टीकरण

By श्याम बागुल | Updated: July 1, 2023 14:32 IST

काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांच्या समवेत आपण ठाकरे गटाचे खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती.

नाशिक : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाशी आणि अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ, असून पक्षात कोणतीच अडचण नसल्याचे सांगत माजी आमदार डॉ. अपुर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चेला पुर्ण विराम दिला असून, यापुढेही पक्षाचेच काम करत राहणार असल्याचे जाहीर केले आहेे.

गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अपुर्व हिरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी खळबळ उडाली होती. हिरे हे गेल्या विधानसभा निवडणूकीत पश्चिम मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची मते घेवून पराभूत झाले आहेत. त्यामुळे यंदा त्यांची या मतदार संघात दावेदारी मानली जात असतांना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटातील बडगुजर यांची उमेदवार धोक्यात येण्याची शक्यताही निर्माण झालेली असतांना हिरे यांनी मात्र ठाकरे गटातील प्रवेशाचा साफ इन्कार केला आहे ते म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने मला उमेदवारी देवून विश्वास ठेवला. त्यामुळे या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही, असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांच्या समवेत आपण ठाकरे गटाचे खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत धुळे लोकसभा मतदार संघ, पश्चिम विधानसभा मतदार संघ व नाशिक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकी बाबत सकारात्मक चर्चा केली. यामुळे कदाचित शिवसेनेत (ठाकरे गट) मध्ये जाणार असल्याचा चर्चेना उधाण आले असावे असेही डॉ. हिरे यांनी सांगितले.