शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

आळवंड गाव दोन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 17:48 IST

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथे आठ दिवसांपूर्वीच बसवलेले रोहित्र जळाल्याने दोन दिवसांपासून आळवंड गाव अंधारात आहे. विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने विद्युत रोहित्रावर ताण पडून रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी गावाला गेल्या दोन दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. वारंवार विजेच्या त्रासाला नागरिक हैराण झाले असून, खंडित झालेल्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देविद्युत रोहित्र नादुरुस्त : रोहित्राची नागरिकांकडून मागणी

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथे आठ दिवसांपूर्वीच बसवलेले रोहित्र जळाल्याने दोन दिवसांपासून आळवंड गाव अंधारात आहे. विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने विद्युत रोहित्रावर ताण पडून रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी गावाला गेल्या दोन दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. वारंवार विजेच्या त्रासाला नागरिक हैराण झाले असून, खंडित झालेल्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान, आळवंड येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत रोहित्र खराब होऊन नादुरुस्त झाल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत होते. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महावितरण विभागाने तात्काळ कार्यवाही करत तेथे ६३ केव्हीचा नवीन रोहित्र बसविला. मात्र, आठ दिवसांतच अतिरिक्त विजेचा ताण वाढल्याने रोहित्र पुन्हा जळून नादुरुस्त झाले.नागरिकांनी वारंवार शंभर केव्हीचे रोहित्र बसविण्याची मागणी केली होती. परंतु महावितरण विभागाने नागरिकांची अडचण लक्षात न घेता ६३ केव्हीचेच रोहित्र बसविले. मात्र, ते आठ दिवसही तग धरू शकले नाही. आता तरी आळवंड गावाला शंभर केव्हीचे रोहित्र बसवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.विजेच्या वारंवार येणाऱ्या समस्यांनी नागरिक हैराण झाले असून, विजेवर चालणारी उपकरणे बंद पडली आहेत. ऑनलाइन परीक्षांच्या काळात वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. महावितरण विभागाने गावाची अडचण लक्षात घेऊन शंभर केव्हीचे रोहित्र बसवावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देहाडे आदींनी केली आहे.आठ दिवसांपूर्वी महावितरण विभागाने ६३ केव्हीचे नवीन रोहित्र बसविले. परंतु जेमतेम तग धरू शकले. परिणामी अतिरिक्त ताणाने नादुरुस्त झाला. आमची मागणी शंभर केव्हीच्या रोहित्राची आहे. तरी विद्युत विभागाने आळवंड गावासाठी शंभर केव्हीचा रोहित्र बसवावा.- विक्रम वाघ, सरपंच, आळवंड.(फोटो २९ आळवंड १)आळवंड येथील जेमतेम आठ दिवस चाललेले रोहित्र.

टॅग्स :electricityवीजRural Developmentग्रामीण विकास