शहरं
Join us  
Trending Stories
1
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
2
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
3
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
4
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
5
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
6
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
7
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
8
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
9
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
11
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
12
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
13
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
14
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
15
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
16
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
17
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
18
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
19
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
20
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!

आळवंड गाव दोन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 17:48 IST

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथे आठ दिवसांपूर्वीच बसवलेले रोहित्र जळाल्याने दोन दिवसांपासून आळवंड गाव अंधारात आहे. विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने विद्युत रोहित्रावर ताण पडून रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी गावाला गेल्या दोन दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. वारंवार विजेच्या त्रासाला नागरिक हैराण झाले असून, खंडित झालेल्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देविद्युत रोहित्र नादुरुस्त : रोहित्राची नागरिकांकडून मागणी

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथे आठ दिवसांपूर्वीच बसवलेले रोहित्र जळाल्याने दोन दिवसांपासून आळवंड गाव अंधारात आहे. विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने विद्युत रोहित्रावर ताण पडून रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी गावाला गेल्या दोन दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. वारंवार विजेच्या त्रासाला नागरिक हैराण झाले असून, खंडित झालेल्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान, आळवंड येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत रोहित्र खराब होऊन नादुरुस्त झाल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत होते. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महावितरण विभागाने तात्काळ कार्यवाही करत तेथे ६३ केव्हीचा नवीन रोहित्र बसविला. मात्र, आठ दिवसांतच अतिरिक्त विजेचा ताण वाढल्याने रोहित्र पुन्हा जळून नादुरुस्त झाले.नागरिकांनी वारंवार शंभर केव्हीचे रोहित्र बसविण्याची मागणी केली होती. परंतु महावितरण विभागाने नागरिकांची अडचण लक्षात न घेता ६३ केव्हीचेच रोहित्र बसविले. मात्र, ते आठ दिवसही तग धरू शकले नाही. आता तरी आळवंड गावाला शंभर केव्हीचे रोहित्र बसवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.विजेच्या वारंवार येणाऱ्या समस्यांनी नागरिक हैराण झाले असून, विजेवर चालणारी उपकरणे बंद पडली आहेत. ऑनलाइन परीक्षांच्या काळात वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. महावितरण विभागाने गावाची अडचण लक्षात घेऊन शंभर केव्हीचे रोहित्र बसवावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देहाडे आदींनी केली आहे.आठ दिवसांपूर्वी महावितरण विभागाने ६३ केव्हीचे नवीन रोहित्र बसविले. परंतु जेमतेम तग धरू शकले. परिणामी अतिरिक्त ताणाने नादुरुस्त झाला. आमची मागणी शंभर केव्हीच्या रोहित्राची आहे. तरी विद्युत विभागाने आळवंड गावासाठी शंभर केव्हीचा रोहित्र बसवावा.- विक्रम वाघ, सरपंच, आळवंड.(फोटो २९ आळवंड १)आळवंड येथील जेमतेम आठ दिवस चाललेले रोहित्र.

टॅग्स :electricityवीजRural Developmentग्रामीण विकास