शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रानमेव्यासह आंबे, स्ट्रॉबेरीचीही मिळाली जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST

वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, आता ...

वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, आता हे चित्र बदलत चालले असून करवंद, जांभूळ या रानमेव्यांसह आंबे व स्ट्राॅबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला आहे. शिवाय या वस्तुंच्या विक्रीसाठीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे. उदरनिर्वाहासाठी पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करणे हा आदिवासी बांधवांचा आवडता व्यवसाय. प्रामाणिकपणा, कष्टकरी वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये. मात्र, जसजसा काळ बदलत गेला तसतशी शेती व्यवसायाबरोबर पर्यायी उत्पन्नाची संकल्पना आदिवासी बांधवांच्या मनात रुजू लागली आहे. प्रगत तंत्रज्ञान व नवनवीन क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी यांनीही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरित केले आहे. आदिवासी बांधवांची नाळ निसर्गाशी जोडल्याने नैसर्गिक पद्धतीने उत्पादित वस्तूंच्या विक्रीतून आर्थिक वृद्धीस त्यांना हातभार लागला आहे. वणी-कळवण रस्त्यावरील अहिवंतवाडीपासून ते पायरपाडा परिसरात करवंद, जांभूळ, गावठी आंबे रस्त्यालगत विक्रीसाठी आदिवासी बांधव घेऊन बसतात. दरेगाव व बिलवाडी व सप्तशृंग गडाच्या पायथ्याच्या परिसरात या नैसर्गिक वस्तू उत्पादित होतात. बिलवाडी परिसरात तर शेकडोंच्या संख्येने आंब्याची झाडे आहेत तर डोंगराळ भागात व दऱ्याखोऱ्याच्या परिसरात करवंद व जांभळे यांच्या झाडांची संख्या मोठी असल्याची माहिती सोमनाथ गवळी यांनी दिली. या मार्गावरून गडावर जाणारे पर्यटक नैसर्गिक चवीचा आस्वाद देणारी ही फळे खरेदी करतात. त्या माध्यमातून आदिवासी बांधवांना चार पैशांची कमाई होत असते.

इन्फो

पर्यटकांकडून प्रतिसाद

वणी-सापुतारा या रस्त्यावर स्ट्राॅबेरी, जांभूळ, करवंद या फळांची विक्री करण्यात येते. खाजगी वाहने आरामदायी बसमधील प्रवासी हे त्यांचे ग्राहक असतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आदिवासी महिला, लहान मुले उन्हात या फळांची विक्री करताना आढळून येतात. गुजरात राज्यातील सापुतारा येथे जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात या फळांची खरेदी करून नैसर्गिक चव चाखतात.

कोट...

रानमेव्यासह फळांचे विशिष्ट पद्धतीने मार्केटिंग करून विक्री केल्यास व प्रोत्साहन दिल्यास आदिवासी बांधवांना बळ मिळू शकते. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. आदिवासी बांधवांचे निसर्गाशी असलेले नाते भावनात्मक असून निसर्गाने दिलेला ठेवा, त्याचे जतन करणे व या फळांची विक्री करून होणारी आर्थिक वृद्धी ही जीवनमानाला प्रेरणा देणारी बाब आहे.

- वामन राऊत, करंजखेड