शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

रानमेव्यासह आंबे, स्ट्रॉबेरीचीही मिळाली जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST

वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, आता ...

वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, आता हे चित्र बदलत चालले असून करवंद, जांभूळ या रानमेव्यांसह आंबे व स्ट्राॅबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला आहे. शिवाय या वस्तुंच्या विक्रीसाठीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे. उदरनिर्वाहासाठी पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करणे हा आदिवासी बांधवांचा आवडता व्यवसाय. प्रामाणिकपणा, कष्टकरी वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये. मात्र, जसजसा काळ बदलत गेला तसतशी शेती व्यवसायाबरोबर पर्यायी उत्पन्नाची संकल्पना आदिवासी बांधवांच्या मनात रुजू लागली आहे. प्रगत तंत्रज्ञान व नवनवीन क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी यांनीही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरित केले आहे. आदिवासी बांधवांची नाळ निसर्गाशी जोडल्याने नैसर्गिक पद्धतीने उत्पादित वस्तूंच्या विक्रीतून आर्थिक वृद्धीस त्यांना हातभार लागला आहे. वणी-कळवण रस्त्यावरील अहिवंतवाडीपासून ते पायरपाडा परिसरात करवंद, जांभूळ, गावठी आंबे रस्त्यालगत विक्रीसाठी आदिवासी बांधव घेऊन बसतात. दरेगाव व बिलवाडी व सप्तशृंग गडाच्या पायथ्याच्या परिसरात या नैसर्गिक वस्तू उत्पादित होतात. बिलवाडी परिसरात तर शेकडोंच्या संख्येने आंब्याची झाडे आहेत तर डोंगराळ भागात व दऱ्याखोऱ्याच्या परिसरात करवंद व जांभळे यांच्या झाडांची संख्या मोठी असल्याची माहिती सोमनाथ गवळी यांनी दिली. या मार्गावरून गडावर जाणारे पर्यटक नैसर्गिक चवीचा आस्वाद देणारी ही फळे खरेदी करतात. त्या माध्यमातून आदिवासी बांधवांना चार पैशांची कमाई होत असते.

इन्फो

पर्यटकांकडून प्रतिसाद

वणी-सापुतारा या रस्त्यावर स्ट्राॅबेरी, जांभूळ, करवंद या फळांची विक्री करण्यात येते. खाजगी वाहने आरामदायी बसमधील प्रवासी हे त्यांचे ग्राहक असतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आदिवासी महिला, लहान मुले उन्हात या फळांची विक्री करताना आढळून येतात. गुजरात राज्यातील सापुतारा येथे जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात या फळांची खरेदी करून नैसर्गिक चव चाखतात.

कोट...

रानमेव्यासह फळांचे विशिष्ट पद्धतीने मार्केटिंग करून विक्री केल्यास व प्रोत्साहन दिल्यास आदिवासी बांधवांना बळ मिळू शकते. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. आदिवासी बांधवांचे निसर्गाशी असलेले नाते भावनात्मक असून निसर्गाने दिलेला ठेवा, त्याचे जतन करणे व या फळांची विक्री करून होणारी आर्थिक वृद्धी ही जीवनमानाला प्रेरणा देणारी बाब आहे.

- वामन राऊत, करंजखेड