शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

रानमेव्यासह आंबे, स्ट्रॉबेरीचीही मिळाली जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST

वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, आता ...

वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, आता हे चित्र बदलत चालले असून करवंद, जांभूळ या रानमेव्यांसह आंबे व स्ट्राॅबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला आहे. शिवाय या वस्तुंच्या विक्रीसाठीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे. उदरनिर्वाहासाठी पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करणे हा आदिवासी बांधवांचा आवडता व्यवसाय. प्रामाणिकपणा, कष्टकरी वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये. मात्र, जसजसा काळ बदलत गेला तसतशी शेती व्यवसायाबरोबर पर्यायी उत्पन्नाची संकल्पना आदिवासी बांधवांच्या मनात रुजू लागली आहे. प्रगत तंत्रज्ञान व नवनवीन क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी यांनीही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरित केले आहे. आदिवासी बांधवांची नाळ निसर्गाशी जोडल्याने नैसर्गिक पद्धतीने उत्पादित वस्तूंच्या विक्रीतून आर्थिक वृद्धीस त्यांना हातभार लागला आहे. वणी-कळवण रस्त्यावरील अहिवंतवाडीपासून ते पायरपाडा परिसरात करवंद, जांभूळ, गावठी आंबे रस्त्यालगत विक्रीसाठी आदिवासी बांधव घेऊन बसतात. दरेगाव व बिलवाडी व सप्तशृंग गडाच्या पायथ्याच्या परिसरात या नैसर्गिक वस्तू उत्पादित होतात. बिलवाडी परिसरात तर शेकडोंच्या संख्येने आंब्याची झाडे आहेत तर डोंगराळ भागात व दऱ्याखोऱ्याच्या परिसरात करवंद व जांभळे यांच्या झाडांची संख्या मोठी असल्याची माहिती सोमनाथ गवळी यांनी दिली. या मार्गावरून गडावर जाणारे पर्यटक नैसर्गिक चवीचा आस्वाद देणारी ही फळे खरेदी करतात. त्या माध्यमातून आदिवासी बांधवांना चार पैशांची कमाई होत असते.

इन्फो

पर्यटकांकडून प्रतिसाद

वणी-सापुतारा या रस्त्यावर स्ट्राॅबेरी, जांभूळ, करवंद या फळांची विक्री करण्यात येते. खाजगी वाहने आरामदायी बसमधील प्रवासी हे त्यांचे ग्राहक असतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आदिवासी महिला, लहान मुले उन्हात या फळांची विक्री करताना आढळून येतात. गुजरात राज्यातील सापुतारा येथे जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात या फळांची खरेदी करून नैसर्गिक चव चाखतात.

कोट...

रानमेव्यासह फळांचे विशिष्ट पद्धतीने मार्केटिंग करून विक्री केल्यास व प्रोत्साहन दिल्यास आदिवासी बांधवांना बळ मिळू शकते. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. आदिवासी बांधवांचे निसर्गाशी असलेले नाते भावनात्मक असून निसर्गाने दिलेला ठेवा, त्याचे जतन करणे व या फळांची विक्री करून होणारी आर्थिक वृद्धी ही जीवनमानाला प्रेरणा देणारी बाब आहे.

- वामन राऊत, करंजखेड