शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कांदा उत्पादकांकडून घरगुती बियाने तयार करण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:35 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिाक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकर्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण रोपे नष्ट झाले. यामुळे प्रत्येक कांदा उत्पादक शेतक-यांनी पुन्हा पुन्हा कांदा बियाणे टाकल्यामुळे व शेतकर्यांजवळील बियाणे संपल्यामुळे बाजारात बियाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली.

ठळक मुद्देफसवणुक टाळण्यासाठी उपाययोजना : उत्पन्न वाढीसाठी डोंगळा लागवड

लखमापूर : दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिाक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकर्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण रोपे नष्ट झाले. यामुळे प्रत्येक कांदा उत्पादक शेतक-यांनी पुन्हा पुन्हा कांदा बियाणे टाकल्यामुळे व शेतकर्यांजवळील बियाणे संपल्यामुळे बाजारात बियाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. तसेच बियाणे सध्या साडेतीन ते चार हजार रु पये किलोने विकले जात असल्यामुळे यंदा कांदा उत्पादक शेतक-यांनी जास्त डोंगळा लागवडीवर भर दिल्याचे चित्र दिसत आहे.बर्याचदा कांदा बियाण्याची गरज स्वत: डोंगळे लावून शेतकरी भागवतात. बियाणे कमी पडल्यास नातेवाइकांकडून उसनवारीने घेतले जाते. यावर्षी मात्र पावसाने सर्वच कांदा उत्पादक पोळले गेल्याने बियाणे मिळणे मुश्किल झाले आहे. बाजारामध्ये कांदा बियाणे विक्र ीसाठी उपलब्ध असले तरी या बियाण्यापासून कांद्याचे योग्य उत्पादन त्याची खात्री नसल्याने यंदा कांदा उत्पादक शेतकर्यांनी बाजारातील देण्याऐवजी स्वत: बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे.मागील वर्षी झालेल्या गारपीट व बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकास बरोबरच कांदा पिकाचे व कांद्याच्या डोंगळ्यापासून बियाणे तयार होतात ते डोंगळे पूर्णपणे भुईसपाट झाल्यामुळे डोंगळ्यांचे मोठे नुकसान होऊन बियाणे तयार झाले नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकर्यांना याचा मोठा फटका बसून आज बाजारातून चढ्या भावाने कांदा बियाणे खरेदी करावे लागत आहे पुढील हंगामात पुन्हा कांदा बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कांदा उत्पादक डोंगळा लागवडीवर भर देत असल्याचे दिसत आहे.1) परतीच्या पावसाने कांदा रोपे नष्ट झाल्याने शेतकरी वर्गाचा घरगुती कांदा बियाने तयार करण्यावर भर.2) कांदा बियाने मिळत नसल्याने डोंगळा लागवडीवर भर.3) खरीप हंगामात सर्व भांडवल खर्च करून ही उत्पन्न न मिळाल्याने घरगुती बियाने तयार करून खर्चाची काटकसर.मागील वर्षी डोंगळे खराब झाल्यामुळे यंदा कांदा बियाण्याची टंचाई निर्माण झाली. मात्र, बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही यंत्राच्या साह्याने कांदा बियाणे पेरून कांदा लागवड करणार असून यासाठी मजुरांचीही बचत होणार आहे.- भाऊसाहेब ढाकणे, कांदा उत्पादक, ओझे 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी