शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

कांदा उत्पादकांकडून घरगुती बियाने तयार करण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:35 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिाक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकर्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण रोपे नष्ट झाले. यामुळे प्रत्येक कांदा उत्पादक शेतक-यांनी पुन्हा पुन्हा कांदा बियाणे टाकल्यामुळे व शेतकर्यांजवळील बियाणे संपल्यामुळे बाजारात बियाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली.

ठळक मुद्देफसवणुक टाळण्यासाठी उपाययोजना : उत्पन्न वाढीसाठी डोंगळा लागवड

लखमापूर : दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिाक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकर्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण रोपे नष्ट झाले. यामुळे प्रत्येक कांदा उत्पादक शेतक-यांनी पुन्हा पुन्हा कांदा बियाणे टाकल्यामुळे व शेतकर्यांजवळील बियाणे संपल्यामुळे बाजारात बियाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. तसेच बियाणे सध्या साडेतीन ते चार हजार रु पये किलोने विकले जात असल्यामुळे यंदा कांदा उत्पादक शेतक-यांनी जास्त डोंगळा लागवडीवर भर दिल्याचे चित्र दिसत आहे.बर्याचदा कांदा बियाण्याची गरज स्वत: डोंगळे लावून शेतकरी भागवतात. बियाणे कमी पडल्यास नातेवाइकांकडून उसनवारीने घेतले जाते. यावर्षी मात्र पावसाने सर्वच कांदा उत्पादक पोळले गेल्याने बियाणे मिळणे मुश्किल झाले आहे. बाजारामध्ये कांदा बियाणे विक्र ीसाठी उपलब्ध असले तरी या बियाण्यापासून कांद्याचे योग्य उत्पादन त्याची खात्री नसल्याने यंदा कांदा उत्पादक शेतकर्यांनी बाजारातील देण्याऐवजी स्वत: बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे.मागील वर्षी झालेल्या गारपीट व बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकास बरोबरच कांदा पिकाचे व कांद्याच्या डोंगळ्यापासून बियाणे तयार होतात ते डोंगळे पूर्णपणे भुईसपाट झाल्यामुळे डोंगळ्यांचे मोठे नुकसान होऊन बियाणे तयार झाले नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकर्यांना याचा मोठा फटका बसून आज बाजारातून चढ्या भावाने कांदा बियाणे खरेदी करावे लागत आहे पुढील हंगामात पुन्हा कांदा बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कांदा उत्पादक डोंगळा लागवडीवर भर देत असल्याचे दिसत आहे.1) परतीच्या पावसाने कांदा रोपे नष्ट झाल्याने शेतकरी वर्गाचा घरगुती कांदा बियाने तयार करण्यावर भर.2) कांदा बियाने मिळत नसल्याने डोंगळा लागवडीवर भर.3) खरीप हंगामात सर्व भांडवल खर्च करून ही उत्पन्न न मिळाल्याने घरगुती बियाने तयार करून खर्चाची काटकसर.मागील वर्षी डोंगळे खराब झाल्यामुळे यंदा कांदा बियाण्याची टंचाई निर्माण झाली. मात्र, बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही यंत्राच्या साह्याने कांदा बियाणे पेरून कांदा लागवड करणार असून यासाठी मजुरांचीही बचत होणार आहे.- भाऊसाहेब ढाकणे, कांदा उत्पादक, ओझे 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी