शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

देवगावी आवणीच्या कामांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:26 IST

देवगाव : जुलैच्या सुरुवातीपासूनच होत असलेल्या दमदार बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र,कोरोनाच्या भीतीने मजुरच मिळत नसल्याने शेतीची कामे संथगतीने होत असून लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

देवगाव : जुलैच्या सुरुवातीपासूनच होत असलेल्या दमदार बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र,कोरोनाच्या भीतीने मजुरच मिळत नसल्याने शेतीची कामे संथगतीने होत असून लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.देवगाव परिसरासह वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट, चंद्राचीमेंट, डहाळेवाडी,टाकेहर्षे या भागात दमदार पावसामुळे आवणींच्या कामाला सुरुवात झाली असून मजूर टंचाईमुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव, वांजळे, कोरोळे या भागातून शेतकरी वाडीपाड्यातील मजूर घेऊन जात असल्यामुळे मजुरांची उणीव भासत आहे. त्यात दरवर्षीच्या तुलनेत मजुरीत वाढ केल्याने शेतकºयांत चिंता व्यक्त होत आहे. दरदिवसाला २५० रुपये मजुरी होती. परंतू, लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळत नसल्याने आता ३०० रुपये मजुरी झाली आहे. मजुरी वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला असून घरच्या उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने शेतीच्या कामांवर जोर दिला जात आहे.देवगाव परिसरात नागली, वरई, भात या मुख्य पिकांसह कोलम,एक हजार आठ, रुपाली, सोनम,एक हजार दफ्तरी या भातांच्या जातीची लागवड केली जाते. उशिरा पण समाधानकारक पाऊस पडत असल्याने व वेळेवर शेतकºयांनीपेरणी केल्यामुळे भात लावणीस सुरुवात झाली आहे. तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर देवगाव परिसरातील सर्वच खेड्यापाड्यांत लावणीच्या कामांना वेग आला आहे.------------------दरवर्षीप्रमाणे भात आवणीसाठी पन्नास ते साठ मजूर घेत होतो.परंतू, चालुवर्षी लॉकडाऊनमूळे मजुरी वाढल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे. मजुरी वाढल्याने व मजूर मिळत नसल्याने घरातील उपलब्ध माणसांना घेऊन आवणी करावी लागत आहे.- दिलीप शिंदे, शेतकरी, देवगाव.--------------लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून हाताला काम नव्हते. परंतु, पाऊस वेळेत पडल्याने भात लावणीस सुरवात झाली. त्यामुळे काम मिळू लागल्याने हाती दोन पैसे मिळतील. मजुरी वाढवल्याने नक्कीच समाधान झाले आहे.- सुरेखा दोंदे, मजूर, देवगाव

टॅग्स :Nashikनाशिक