शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:12 IST

जळगाव नेऊर : कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीकरिता शहरात जावे लागते, परिणामी शेतकऱ्याला आताच्या खरिपासाठी लागणारे भांडवल तो शेतमाल विकूनच उभे करणे जिकिरीचे होत आहे.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : बळीराजाला पडली भांडवलाची चिंता

जळगाव नेऊर : कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीकरिता शहरात जावे लागते, परिणामी शेतकऱ्याला आताच्या खरिपासाठी लागणारे भांडवल तो शेतमाल विकूनच उभे करणे जिकिरीचे होत आहे.

२०२० चा खरीप, रब्बी हंगाम कोरोनाच्या सावटाखाली गेल्याने २०२१ या वर्षातही कोरोनामुळे शेतकरी चिंतेत आहे.बाजार समित्या कधी बंद, तर कधी चालू यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीस अडचणी येत आहे. शिवाय माल विक्रीस नेला तर त्यास भाव भेटत नसल्याने येणारा २०२१ खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. शेतकऱ्यांची कांदा काढणी, साठवणूक शेती कामे अंतिम टप्प्यात असून शेतीच्या मशागतीला वेग आला आहे.साधारणत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर येत असतात. तसेच बरेच शेतकरी टोमॅटो लागवडीसाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी अनेक नर्सरीकडे रोपे बुक करण्यासाठी धाव घेतात.परंतु येत्या काही दिवसात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आला असून पेरणी हंगाम जसजसा जवळ येत आहे तसतशी शेतकरी वर्गाची लगबग सुरू झाली आहे. चालू हंगामात हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जूनलाच पावसाचे केरळात आगमन होईल, असे वर्तविले असून पाऊस वेळेवर झाल्यास पाण्याची चिंता जरी मिटली तरी कोरोना आटोक्यात आला नाही, तर शेती व्यवसायावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.शेतीत जरी फारशी भीती नसली तरी शेतकऱ्याला अनेक ठिकाणी शेतीस लागणारे साहित्य व माल विक्रीस बाहेर पडावे लागते व शेतावर विविध ठिकाणांहून मजूर आणावे लागते, त्याच्यामुळे ही कोरोनाची भीती वाढत आहे. अशा संकटात शेतकरी सापडला आहे. तरीही योग्य ती काळजी घेऊन, अंतर ठेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे.(०८ जळगाव नेऊर)जळगाव नेऊर येथे शेतात सुरू असलेली नांगरणी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी