नाशिकरोड : शहरातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, खून, घरफोड्या, वाहन जळीतकांड, गुन्हेगारी टोळ्या यांचा बीमोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, याकरिता बिटको चौकात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक पत्रे लिहून पाठविण्यात आली. पोलीस ठाण्याचे विभाजन करून गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढली आहे. पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचा ताळमेळच बसत नसल्याने पोलीस प्रशासनाला सपशेल अपयश येत आहे. याच्या निषेधार्थ नाशिकरोड राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने अनेक पत्रे लिहून पाठविण्यात आली.यावेळी मनोहर कोरडे, निवृत्ती अरिंगळे, अशोक खालकर, विश्वनाथ जगताप, प्रशांत वाघ, संजय काळे, दस्तगीर शेख, विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख, प्रकाश साडे, बबलू खेलुकर, मुन्ना अन्सारी, ताहीर शेख, प्रवीण बैसाणे, अपर्ण जाधव, अर्चना जाधव, रेखा काकड, नलिनी नहार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप
By admin | Updated: May 22, 2016 23:27 IST