शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नाशिकच्या मनसेत नाही ऑल इज वेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:23 IST

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने उभारी घेण्याची तयारी गेल्या वर्षी सुरू असतानाच अचानक सुरू झालेले फेरबदल अनेकांना आश्चर्य चकीत करणारे ठरत आहेत. विशेषत: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नाशिकमध्ये खूप काही घडले नाही. मात्र एकापाठोपाठ असे दोन संघटनात्मक बदल झाल्याने पक्षात यानिमित्ताने ह्यऑल इज नॉट वेलह्णची प्रचीती आली आहे. इतकेच नव्हे तर दोन छोटे बदल झाल्यानंतर आता पुढील विकेट कोणाची पडणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देफेरबदलांमुळे चर्चाअनेकांना अर्धचंद्र मिळणार

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने उभारी घेण्याची तयारी गेल्या वर्षी सुरू असतानाच अचानक सुरू झालेले फेरबदल अनेकांना आश्चर्य चकीत करणारे ठरत आहेत. विशेषत: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नाशिकमध्ये खूप काही घडले नाही. मात्र एकापाठोपाठ असे दोन संघटनात्मक बदल झाल्याने पक्षात यानिमित्ताने ह्यऑल इज नॉट वेलह्णची प्रचीती आली आहे. इतकेच नव्हे तर दोन छोटे बदल झाल्यानंतर आता पुढील विकेट कोणाची पडणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.राज्यात एकमेव सत्ता मिळालेल्या गेलेल्या नाशिक महापालिकेतील सत्ता गमविल्यानंतर आता पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरे उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. नाशिक महापालिकेचीअवघ्या दहा महिन्यांनी निवडणूक होणार आहे. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांबरोबर मनसेने अंग झटकून कामाला सुरूवात केली असली तरी या पक्षाची संघटनात्मक कामाची तयारी तशी नाही, उलट एकमेकांच्या कुरघोड्या आणि त्यातून होणारे फेरबदल हा चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी पक्षातील तरूण तुर्कांनी काही ज्येष्ठांच्या मक्तेदारी विषयी तक्रारी केल्यानंतर तरी राज यांच्या नाशिक दौऱ्यात काही तरी मोठा संदेश दिला जाईल अशी अपेक्षा होती. परंतू निवडक पदाधिकाऱ्यांची एक औपचारीक बैठक सोडली तर गर्दी करणाऱ्यांच्या हाती फार काही लागले नाही.राजदूत घडवण्याची नवी संकल्पना राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात मांडली. त्यानंतर दोन पदाधिकारी नाशिकमध्ये येऊन राजदूत संकल्पनेविषयी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले गेले. परंतु पुढे काहीच झाले नाही. उलट त्यानंतर सचिन भोसले आणि संदीप भंवर यांची पदे काढून घेतल्याने नवीन काहीच नाही उलट जुन्यातच फेरबदल सुरू झाल्याचे दिसले. अर्थात हे फेरबदल दिसायला फार महत्वाचे वाटत नसले तरी बदल झाल्यानंतर चर्चा तर होणारच...! आता आणखी काही एक दोन नंबर लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरवर शांत वाटत असले तरी मनसेत अंतर्गत खदखद कायम असल्याचे सांगितले जात आहे.पक्षातील गटबाजी हे पक्षाचे जिवंतपणाचे लक्षण असल्याचे नेहेमीच काही ज्येष्ठ नेते बोलून गेले आहेत. मात्र असा जिवंतपणा विरोधी पक्षांना नामोहरम करण्यापेक्षा स्वपक्षीयांच्या विरोधात असेल तर फार काही वावगे होणार नाही. पक्षात सध्या दोन नेत्यांचे उघड गट असून बहुतांश पदाधिकाऱ्यांची त्यात विभागणी झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तटस्थतेला तर वावच नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणूकीत ही गटबाजी मोडीत काढण्याचे खरे आव्हान पक्षासमोर आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMNSमनसे