शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

युवकांच्या पुढाकारातून एरंडगाव येथील सर्व रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:08 IST

जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत.

एरंडगाव : जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. तसेच गावात आता एकही वाहन प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.फक्त रस्ते बंद करून हे युवक थांबले नाही तर ज्या भागात मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे कामही या युवकांनी हाती घेतले आहे. येथील युवक एकत्र येऊन विविध उपक्र म राबवत असतात. या लॉकडाउन काळात, संचारबंदी कालावधीत गरीब कुटुंबातील आजारी व्यक्तींना मेडिकल व दवाखान्याचा खर्च पुरविणे. गरीब व गरजू कुटुंबांना किराणा वाटप करणे आदी उपक्र म राबवित आहेत. या उपक्र मात रवींद्र साताळकर, शरद रंधे, सतीश काळे, अनिल पडोळ, बाबासाहेब गोविंद, रशीद पटेल, मुक्तार पटेल, सागर सुराणा, ज्ञानेश्वर पडोळ, तुकाराम पडोळ, अश्फाक सैय्यद, देविदास खकाळे, दत्तू बोराडे, गोरख शिंदे, समाधान आहेर, सागर आहेर, गणेश चौघुले, असिफ पठाण, खलील पठाण, आवेद शेख, जावेद शेख, तन्वीर शेख आदी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, करोनापासून गाव वाचवण्यासाठी एरंडगाव येथील युवक राबवत असलेले उपक्र म स्तुत्य आहे. गावातील प्रत्येक घरी भाजीपाला, आवश्यक किराणा पोहोच करून गरजूंची चिंता मिटवली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करून मास्क वाटप केले आहेत. एखाद्यावर वाईट प्रसंग आल्यास तातडीने मदत केली जाते. हा आदर्श इतर गावातील युवकांनीही घ्यावा, असे सुरेश उशीर यांनी सांगितले. तर एरंडगावातील युवक नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश बंद करणे हे अमानवीय आहे. ज्यावेळी गावात काही सार्वजनिक कार्यक्र म असो अथवा निवडणूक असो अशावेळी गावपुढाऱ्यांना प्रथम गावातील मतदार यादीत असलेले पण नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी असलेल्यांची आठवण येते. मग संकटकाळी त्या लोकांना गावात यायचे असल्यास त्यांना गावात येण्यास बंदी करायची, हे योग्य नाही अशी भावना बाहेरगावी नोकरीस असलेला एरंडगावकरांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य