शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

युवकांच्या पुढाकारातून एरंडगाव येथील सर्व रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:08 IST

जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत.

एरंडगाव : जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. तसेच गावात आता एकही वाहन प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.फक्त रस्ते बंद करून हे युवक थांबले नाही तर ज्या भागात मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे कामही या युवकांनी हाती घेतले आहे. येथील युवक एकत्र येऊन विविध उपक्र म राबवत असतात. या लॉकडाउन काळात, संचारबंदी कालावधीत गरीब कुटुंबातील आजारी व्यक्तींना मेडिकल व दवाखान्याचा खर्च पुरविणे. गरीब व गरजू कुटुंबांना किराणा वाटप करणे आदी उपक्र म राबवित आहेत. या उपक्र मात रवींद्र साताळकर, शरद रंधे, सतीश काळे, अनिल पडोळ, बाबासाहेब गोविंद, रशीद पटेल, मुक्तार पटेल, सागर सुराणा, ज्ञानेश्वर पडोळ, तुकाराम पडोळ, अश्फाक सैय्यद, देविदास खकाळे, दत्तू बोराडे, गोरख शिंदे, समाधान आहेर, सागर आहेर, गणेश चौघुले, असिफ पठाण, खलील पठाण, आवेद शेख, जावेद शेख, तन्वीर शेख आदी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, करोनापासून गाव वाचवण्यासाठी एरंडगाव येथील युवक राबवत असलेले उपक्र म स्तुत्य आहे. गावातील प्रत्येक घरी भाजीपाला, आवश्यक किराणा पोहोच करून गरजूंची चिंता मिटवली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करून मास्क वाटप केले आहेत. एखाद्यावर वाईट प्रसंग आल्यास तातडीने मदत केली जाते. हा आदर्श इतर गावातील युवकांनीही घ्यावा, असे सुरेश उशीर यांनी सांगितले. तर एरंडगावातील युवक नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश बंद करणे हे अमानवीय आहे. ज्यावेळी गावात काही सार्वजनिक कार्यक्र म असो अथवा निवडणूक असो अशावेळी गावपुढाऱ्यांना प्रथम गावातील मतदार यादीत असलेले पण नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी असलेल्यांची आठवण येते. मग संकटकाळी त्या लोकांना गावात यायचे असल्यास त्यांना गावात येण्यास बंदी करायची, हे योग्य नाही अशी भावना बाहेरगावी नोकरीस असलेला एरंडगावकरांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य