शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे येणार तळमजल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 01:05 IST

नाशिक : मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, त्यांच्यासाठी सुलभ मतदान केंद्र असावे यासाठी भारत निवडणूक ...

ठळक मुद्देतयारी विधानसभेची निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघांतील मतदान केंद्रांची पडताळणी

नाशिक : मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, त्यांच्यासाठी सुलभ मतदान केंद्र असावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील जी मतदान केंद्रे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर होती अशी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर येणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतची तातडीने अंमलबाजवणी सुरू केली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीदरम्यान निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर ठेवण्यात यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिले होते. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रे ही पहिल्या किंवा दुसºया मजल्यावर आहेत अशा मतदान केंद्रांची पडताळणी करून पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील मतदान केंद्रांचेदेखील नियोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या ही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी असून, जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या ४५९६ इतकी आहे तर सहायकारी मतदान केंद्रे सुमारे १५० इतकी राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते शक्यतो त्याच मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीचेही मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांना त्याच मतदान केंद्रात मात्र तळमजल्यावर आता मतदानाची सोय होणार आहे. अपवादात्मक स्थितीत फक्त मतदान केंद्र बदलू शकते मात्र जिल्ह्यात तशी शक्यता कमीच आहे.तळमजल्याच्या केंद्रांसाठी प्रसंगीसरकारी, खासगी जागांचा पर्यायनिवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जी मतदान केंद्रे ही पहिल्या किंवा दुसºया मजल्यावर आहेत ती मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्यासाठी नजीक असलेल्या भागात उपलब्ध शासकीय इमारतीमध्ये व्यवस्था करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. शासकीय इमारत नसल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ नुसार खासगी इमारतीमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे. मात्र असे करताना भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेशदेखील देण्यात आलेले आहेत.४ अपवादात्मक स्थितीत तात्पुरते शेड उभारण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार आयोगाने दिले असून जिल्ह्यात मालेगावमध्ये तात्पुरते केंद्र उभारण्याची वेळ येऊ शकते असे समजते.

टॅग्स :NashikनाशिकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारी