शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या बाजूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या तिढ्यामुळे सकल मराठा समाजाने आता लोकप्रतिनींनी बोलते व्हावे, असे आवाहन करीत राज्यातील दुसऱ्या ...

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या तिढ्यामुळे सकल मराठा समाजाने आता लोकप्रतिनींनी बोलते व्हावे, असे आवाहन करीत राज्यातील दुसऱ्या मौन आंदोलनाला नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी (दि.२१) खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनास राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दादा भुसे, माजी केंद्रीयमंत्री खासदार सुभाष भामरे या मान्यवरांनी भेटी देत आरक्षणासाठी मराठा समाजाच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला.

गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.२१) सकाळी ९ वाजेपासून कडेकोट बंंदोबस्तात हे आंदोलन सुरू केले. बहुतांश नेत्यांनी काळे कपडे परिधान केले होते तसेच आरक्षणाचे समर्थन करणारे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले हेाते. आंदोलन स्थळी येऊन लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडावी यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार सर्वपक्षीय मंत्री, आमदार, खासदार यांनी हजेरी तर लावलीच, परंतु समाजाच्या आरक्षणासाठी लढण्याची ग्वाही दिली. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करतानाच केंद्र शासनाकडून न्यायालयातील लढ्यात मदत मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले, तर कृषिमंत्री दादा भुसे यांनी राज्य शासनाच्या अखत्यारितील ११ मागण्यांबाबत लवकरच दिलासा मिळेल, असे मत व्यक्त केले.

यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी उपलब्ध पर्यायांवर लक्ष केंद्रित केले असून, यात राज्याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यास क्युरेटिव्ह पिटीशनचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने ३३८ ‘ब’ नुसार राज्याने प्रस्ताव तयार करून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे तो पाठवावा. आरक्षणाबाबत प्रस्ताव संसदेत चर्चेला आल्यास केंद्र सरकारकडे पाठपुराव्यासाठी लढा सुरूच राहणार असून, तोपर्यंत राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारितील मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्द पाळत पाठपुरावा करावा, असे आवाहन केले.

आंदोलनास्थळी माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, भारती पवार यांनी आंदोलनाचे समर्थन करतानाच मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

इन्फो...

भुजबळ आल्यानंतर गोंधळ

आंदोलनस्थळी सर्वांना जमिनीवर बैठकीची व्यवस्था असताना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बसण्यासाठी खुर्ची घेतल्याने काही कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदविला. मात्र, भुजबळ यांच्या प्रकृतीचे कारण समजताच आंदोलक शांत झाले. संभाजीराजे यांनी आंदोलकांचा गैरसमज दूर केला.

कोट-१

मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, मात्र इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. मराठा समाजासोबतच ओबीसी आरक्षणाचाही प्रश्न तयार झाला आहे. त्यामुळे या समाजांनी एकत्रित येऊन आरक्षणासाठी लढा देण्याची आवश्यकता आहे. ओबीसींचे ‘आक्रोश’ आंदोलन त्यांचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठीच आहे.

- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री

कोट-

मराठा समाजाच्या भावीपिढीसाठी आरक्षणाची गरज आहे. समाजाच्या मागण्यांसाठी राज्यपातळीवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करण्यासोबतच राज्य सरकार राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडेही लवकरच प्रस्ताव सादर करणार आहे.

- दादा भुसे, कृषिमंत्री