शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

स्वयंघोषणापत्रावर मिळणार सर्व दाखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 17:43 IST

नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामांसाठी ग्रामपंचायतीकडून दाखले घेण्याची आवश्यकता नसून, त्यांना स्वयंघोषणापत्रावर सर्व दाखले मिळणार आहेत.

नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामांसाठी ग्रामपंचायतीकडून दाखले घेण्याची आवश्यकता नसून, त्यांना स्वयंघोषणापत्रावर सर्व दाखले मिळणार आहेत. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने यासंदर्भातील आदेश नुकताच पारित केला आहे. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक यांच्या अधिकारात मात्र कपात होणार आहे.अनेकदा ग्रामस्थांना विविध दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये जावे लागत असे. तेथे सरपंच, ग्रामसेवक उपलब्ध नसल्यास ग्रामस्थांनी अतिशय परवड होत असे. ग्रामविकास विभागाने ही समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांना सर्व दाखले स्वयंघोषणापत्रावर उपलब्ध होतील, असा आदेश पारित केला आहे. या आदेशाने ग्रामस्थांनी परवड थांबणार असली तरी सरपंच व ग्रामसेवकांच्या अधिकारात कपात झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.ग्रामीण भागात ग्रामस्थांना दारिद्रयरेषेखालील असल्याचा दाखला, रहिवासी दाखला, विधवा असल्याचा दाखला, विभक्त कुटुंब दाखला, बेरोजगार दाखला, नोकरीत असल्याचा दाखला, गावात भाड्याने राहत असल्याचा दाखला, नळ जोडणी दाखला, शौचालय असल्याचा दाखला व शौचालय वापरत असल्याचा दाखला, अपत्य दाखला, चरित्र्याचा दाखला, वीजजोडणी नाहरकत दाखला, जन्म-मृत्यू नोंद दाखला, शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला, बचतगट, बॅँक कर्जपुरवठा व इतर कोणत्याही शासकीय सेवेचा लाभ न घेतल्याचे दाखले दिले जातात. यापूर्वी त्यावर सरपंच व ग्रामसेवकांची स्वाक्षरी असे, परंतु आता नव्या आदेशान्वये दाखल्याऐवजी संबंधीत ग्रामस्थांना स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.नव्या आदेशामुळे सरपंच व ग्रामसेवकांचे अधिकार कमी झाले असून, खोट्या व चुकीच्या कामांना बळ मिळण्याची शक्यता अधिक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक