शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

येवला तालुक्यातील सर्वच बंधारे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:55 IST

सायगाव : जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मात्र पावसाने येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागावर वक्र दृष्टी केल्याने तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सर्वच बंधारे कोरडेठाक पडले असून शेतकर्यांना आता रब्बी हंगामाची चिंता लागली आहे.

तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव व पांजरवाडी परिसरातील कोळगंगा नदीवरील कोरडाठाक पडलेला बंधारा.

 

सायगाव : जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मात्र पावसाने येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागावर वक्र दृष्टी केल्याने तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सर्वच बंधारे कोरडेठाक पडले असून शेतकर्यांना आता रब्बी हंगामाची चिंता लागली आहे. सुरवाती पासून पाऊस नसल्याने बंधारे विहारी नद्या कोरडया असल्याने या पिकांना पाणी देण्यासाठी कोणतीच शास्वत व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाच्या भरवश्यावरच शेती अवलंबून आहे. रब्बी हंगामाची पेरणी धोक्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र टंचाई भासण्याची चिन्हे आजच दिसत आहे. त्यामुळे रब्बी हंगामाला पाणी देणार कोठून असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. यामुळे शेतकर्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे.सायगाव, नगरसुलसह उत्तर पूर्व भागातील 10 ते 15 गावांना कोणत्याही पाटपाण्याचा फायदा मिळाला नाही. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याची प्रतीक्षा या भागातील तीन पिढ्यांनी केली. परंतु पाणी मिळण्याची चिन्हे दिसत नाही. येवला तालुक्याला वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प मार्गी लागला तर तालुक्याचा पूर्व भाग पूर्णपणे ओलिता खाली येईल. या प्रकल्पामुळे उत्तर पूर्व भागातील सायगाव, नगरसुल, पांजरवाडी, न्याहरखेडे, रेंडाळे, डोंगरगाव या गावांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे.बुधवारी मांजरपाडा 1 या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. हा आशेचा किरण असला तरी नदी जोड प्रकल्पाअतर्गत नारपार खोर्यातील पाणी गोदावरी खोर्यात वळविले आण िपाण्याची उपलब्धता किमान पाच टीएमसीने वाढली या शिवाय बंद पाईप द्वारे शेतीला पाणी देण्याचे नियोजन झाले.अथवा कालव्याची वहन क्षमता वाढविली तरच डोंगरगाव पर्यत पाणी पोहोचू शकते. असे पाणीतज्ञाचा अभ्यास असल्याने मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता धूसर आहे.