शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळेही लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:14 IST

नाशिक : शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी वाढविण्यात आले असून, बुधवार (दि. १२)पासून प्रशासनाकडून शहरात ...

नाशिक : शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी वाढविण्यात आले असून, बुधवार (दि. १२)पासून प्रशासनाकडून शहरात टा‌‌ळेबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी (दि. १४) अक्षय तृतीया असल्याने सलग दुसऱ्या वर्षी नाशिकच्या बाजारपेठेत ग्राहक आणि व्यावसायिकांचाही मुहूर्त चुकणार असून, शहरातील विवाह सोहळेही लॉकडाऊन झाले आहेत. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने यादिवशी कोणतेही शुभ काम करण्यास नागरिक प्राधान्य देतात. विशेष म्हणजे या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांचीही संख्या मोठी असते. विवाहाचे मुहूर्त अधिक असल्याने या काळात बाजारपेठेतही उत्साह संचारलेला असतो. या मुहूर्तावर साेने, वाहन, घर व गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला नाशिककरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे काहीजण नवीन उद्योग-व्यावसाय सुरू करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत कडक निर्बंध असल्याने सराफा व वाहन व्यावसायिकांसह अन्य व्यावसायिकांनाही मोठा फटका बसणार आहे. शासनाने बाजारपेठेत लागू केलेल्या निर्बंधांमुळे सराफा पेढ्या बंद राहणार असल्याने या मुहूर्तावर बुक झालेल्या तसेच लग्नसराईकरिता घेतलेल्या दागिन्यांच्या ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या, या विवंचनेत व्यावसायिक आहेत. शहरात या व्यवसायावर किमान पाच ते सात हजार बंगाली कारागीर उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आता त्यांना सराफा बाजारात काम करता येणार का? याचीही चिंता सतावत आहे. गतवर्षीही काेराेनामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकल्याने सराफा व्यावसायिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. हीच परिस्थिती वाहन विक्रेत्यांचीही आहे. दरम्यान, नाशिकमध्ये कोणत्याही मूहूर्तावर सुमारे सातशे ते साडेसातशे चारचाकी, तर दीड हजाराहून अधिक दुचाकी वाहनांची विक्री होते. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही या व्यवसायाला फटका बसणार आहे. खास अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी वाहने बुक करणाऱ्या ग्राहकांनाही वेळेत डिलिव्हरी देऊ शकणार की नाही, याविषयी व्यावसायिकांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत.

मे महिन्यात मुहूर्त

मे महिन्यात १६ विवाहांचे मुहूर्त असून, सुमारे ११ साखरपुड्यांचे मुहूर्त आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने शहर व जिल्ह्यातील अनेक विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत.

--

यंदा कर्तव्य नाही.

निर्बंधांमुळे मुलाचे लग्न दोनवेळा पुढे ढकलले. मे महिन्यात परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा होती. परंतु, आता लॉकाडाऊन सुरू झाल्याने पुन्हा लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.

गोविंद यादव, वर पिता

--

मुलीचे लग्न एप्रिल महिन्यात निश्चित झाले होते. लॉन्स व इतर तयारीही पूर्ण झाली होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्बंध आल्याने विवाह सोहळा रद्द करून घरीच साध्या पद्धतीने विवाह सोहळा उरकून घेतला.

- राजाराम जाधव, वधू पिता

---

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले.

- २८ मार्च २०२०पासून टाळेबंदीमुळे लॉन्स व मंगल कार्यालयांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला असून, या व्यावसायिकांना १३ ते १४ महिन्यांत तब्बल ५०० कोटी रुपयांचा फटका बसल्याने या व्यवसायाचे गणित बिघडले आहे.

- लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही मोठ्या व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांना मदत देऊ केली असली, तरी हा हंगामी स्वरुपाचा व्यवसाय असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे.

- विवाह सोहळ्यांवर लॉन्स व मंगल कार्यालयांसह केटरर्स, फोटोग्राफर, डेकोरेटर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, बँड पथक, किराणा आदी विविध व्यवसाय अवलंबून आहेत. त्यांचेही अर्थचक्र कोलमडले आहे.

- विवाह सोहळ्यांतील भोजन व्यवस्थेमुळे भाजीपाला व सजावटीसाठी फुलांनाही मागणी वाढते. परंतु, विवाह सोहळेच पुढे ढकलले जात असल्याने किंवा साध्या पद्धतीने होत असल्याने भाजीपाला आणि फुलांनाही मागणी घटली आहे.