शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

विमानसेवेची सज्जता : आता देशांतर्गत सेवेसाठी प्रतीक्षा नाशिकला स्वागत, पुण्यासाठी हिरवा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:38 IST

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत येत्या शनिवारपासून सुरू होणाºया विमानसेवेची सज्जता सुरू झाली आहे. एअर डेक्कनच्या विमानाचे सायंकाळी ओझर येथे आल्यानंतर स्वागत करण्यात येणार आहे

नाशिक : केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत येत्या शनिवारपासून सुरू होणाºया विमानसेवेची सज्जता सुरू झाली आहे. एअर डेक्कनच्या विमानाचे सायंकाळी ओझर येथे आल्यानंतर स्वागत करण्यात येणार आहे तर त्यानंतर सायंकाळी नाशिकहून पुण्यासाठी विमान रवाना होताना पालकमंत्री गिरीश महाजन हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या सेवेसाठी नागरिकही उत्सुक असून, त्यामुळेच ३ जानेवारीपर्यंत तिकिटे विकली गेली आहेत.नाशिकच्या ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची उद्योजक आणि व्यावसायिकांची मागणी होती. नाशिकच्या विकासाला पोषक ठरू शकणारी ही मागणी केंद्र सरकारच्या वतीने प्रादेशिक विमानसेवेसाठी आखलेल्या उडान योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने विमान कंपन्यांना आर्थिक मदत करण्याचे (पन्नास टक्के तिकिटांसाठी अनुदान) धोरण आखल्याने कंपन्यांना तोटा होणार नाही. त्यामुळे यापूर्वी याच कारणावरून विमानसेवा बंद पडण्याचा अनुभव असला तरी ही सेवा अखंडितपणे सुरू राहील, असा विश्वास नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांनी व्यक्त केला. एअर डेक्कनच्या वतीने नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे अशी सेवा येत्या शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकाºयांनी प्रशासकीय सज्जतेची माहिती दिली. २३ तारखेला सायंकाळी ५.१० वाजता मुंबईहून निघणारे विमान सायंकाळी ६ वाजता ओझर विमानतळावर आल्यानंतर तेथे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. याठिकाणाहून सायंकाळी ६.२० मिनिटांनी विमान पुण्याला रवाना होईल त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.या कार्यक्रमांना दोन्ही खासदार, जिल्ह्यातील आमदार, महापौर तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच निमा, आयमा अशा सर्व उद्योग संघटनांना निमंत्रित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला १८ सीटचे छोटे विमान असणार असून, कंपनीला मिळणाºया प्रतिसादानंतर मोठे चाळीस सीटर विमान आणू शकते, असेदेखील गोडसे आणि राधाकृष्णन् यांनी सांगितले. या विमानसेवेसाठी सध्या महामार्गानंतर विमानतळाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून, तेथे जाण्यासाठी विलंब होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने लवकरच रुंदीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.