शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

विमानसेवेची सज्जता : आता देशांतर्गत सेवेसाठी प्रतीक्षा नाशिकला स्वागत, पुण्यासाठी हिरवा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:38 IST

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत येत्या शनिवारपासून सुरू होणाºया विमानसेवेची सज्जता सुरू झाली आहे. एअर डेक्कनच्या विमानाचे सायंकाळी ओझर येथे आल्यानंतर स्वागत करण्यात येणार आहे

नाशिक : केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत येत्या शनिवारपासून सुरू होणाºया विमानसेवेची सज्जता सुरू झाली आहे. एअर डेक्कनच्या विमानाचे सायंकाळी ओझर येथे आल्यानंतर स्वागत करण्यात येणार आहे तर त्यानंतर सायंकाळी नाशिकहून पुण्यासाठी विमान रवाना होताना पालकमंत्री गिरीश महाजन हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या सेवेसाठी नागरिकही उत्सुक असून, त्यामुळेच ३ जानेवारीपर्यंत तिकिटे विकली गेली आहेत.नाशिकच्या ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची उद्योजक आणि व्यावसायिकांची मागणी होती. नाशिकच्या विकासाला पोषक ठरू शकणारी ही मागणी केंद्र सरकारच्या वतीने प्रादेशिक विमानसेवेसाठी आखलेल्या उडान योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने विमान कंपन्यांना आर्थिक मदत करण्याचे (पन्नास टक्के तिकिटांसाठी अनुदान) धोरण आखल्याने कंपन्यांना तोटा होणार नाही. त्यामुळे यापूर्वी याच कारणावरून विमानसेवा बंद पडण्याचा अनुभव असला तरी ही सेवा अखंडितपणे सुरू राहील, असा विश्वास नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांनी व्यक्त केला. एअर डेक्कनच्या वतीने नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे अशी सेवा येत्या शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकाºयांनी प्रशासकीय सज्जतेची माहिती दिली. २३ तारखेला सायंकाळी ५.१० वाजता मुंबईहून निघणारे विमान सायंकाळी ६ वाजता ओझर विमानतळावर आल्यानंतर तेथे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. याठिकाणाहून सायंकाळी ६.२० मिनिटांनी विमान पुण्याला रवाना होईल त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.या कार्यक्रमांना दोन्ही खासदार, जिल्ह्यातील आमदार, महापौर तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच निमा, आयमा अशा सर्व उद्योग संघटनांना निमंत्रित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला १८ सीटचे छोटे विमान असणार असून, कंपनीला मिळणाºया प्रतिसादानंतर मोठे चाळीस सीटर विमान आणू शकते, असेदेखील गोडसे आणि राधाकृष्णन् यांनी सांगितले. या विमानसेवेसाठी सध्या महामार्गानंतर विमानतळाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून, तेथे जाण्यासाठी विलंब होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने लवकरच रुंदीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.