शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘स्मार्ट नाशिक’साठी हवा लोकसहभाग , गिरीश महाजन : स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:38 IST

नाशिक : नाशिक शहरात विकासाची मोठी क्षमता आहे. परंतु, स्मार्ट नाशिकसाठी लोकसहभाग आवश्यक असून, पक्षभेद विसरून सर्वांनी त्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम घ्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘स्मार्ट सिटी’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.

ठळक मुद्दे ‘स्मार्ट नाशिक’साठी हवा लोकसहभाग स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटन

नाशिक : नाशिक शहरात विकासाची मोठी क्षमता आहे. परंतु, स्मार्ट नाशिकसाठी लोकसहभाग आवश्यक असून, पक्षभेद विसरून सर्वांनी त्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम घ्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘स्मार्ट सिटी’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.नाशिक महापालिका आणि नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने हॉटेल ‘द ताज गेटवे’ याठिकाणी एकदिवसीय स्मार्ट सिटी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटक गिरीश महाजन यांनी सांगितले, देशभरातील ९८ शहरांच्या यादीत नाशिकची निवड झालेली आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक या साºया दृष्टीने नाशिक परिपूर्ण शहर आहे. शहरात विकासासाठी मोठ्या संधी आहेत. केवळ टापटीप कपडे घातले म्हणजे माणूस स्मार्ट होत नाही, तर त्याचे बौद्धिक, शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच शहराचेही आहे. उड्डाणपूल, चांगले रस्ते बांधले म्हणजे शहर स्मार्ट होत नाही. शहराला मूलभूत गरजांची व्यवस्थाही महत्त्वाची आहे. शहरात आरोग्यविषयक अनेक तक्रारी आहेत. राज्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण नाशिकमध्ये सापडले आहेत. अशा स्थितीत आरोग्यविषयक उपयुक्त प्रकल्प उभे करावे लागणार आहेत. स्मार्ट नाशिक अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. बदलण्याची मानसिकता प्रत्येकाने ठेवली पाहिजे. स्मार्ट सिटी अंतर्गत कौशल्य विकासाची केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे उद्योगांना पूरक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकणार आहे.शहरात उद्योग वाढीस लागले पाहिजेत. पीपीपी तत्त्वावर सार्वजनिक स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्प राबविताना अडचणी येतील; परंतु लोकसहभागाशिवाय शहर स्मार्ट होणे अशक्य असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, महापौर रंजना भानसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची मांडलेली संकल्पना तडीस नेण्यासाठी सर्वांचा पुढाकार असणे आवश्यक असल्याचे सांगत, कुंभनगरीत विकासाच्या योजना राबविण्याबरोबरच गावठाणाचाही विकास होणार असल्याचे स्पष्ट केले. ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन प्रा. लिमिटेडचे जनरल मॅनेजर जोसेफ माप्राईल, नार्वेच्या कौन्सिल जनरल अ‍ॅन ओल्लेस्टड स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन. व्यासपीठावर वसंत गिते, दिनकर पाटील, बाळासाहेब सानप, अभिषेक कृष्ण, रंजना भानसी, महेश झगडे, अ‍ॅना ओल्लेस्टड, सीमा हिरे आणि जोसेफ माप्राईल.चर्चासत्रांचे आयोजनस्मार्ट नाशिक परिषदेत विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच तज्ज्ञ, अधिकारी यांनी आपल्या संकल्पनांचे तसेच अनुभवांचे सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने आयटीडीपीचे हर्षद अभ्यंकर, कार्तिक हरिहरन, नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने विविध योजनांविषयक सादरीकरण केले.‘प्रकल्प गोदा’कडे विशेष लक्षपालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा प्रकल्प राबविला जाणार असून, त्याकडे सरकार विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. गोदावरी नदी ही शहराची जीवनदायिनी आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्प गोदाद्वारे शहराच्या पर्यटनाला तसेच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. गोदावरी पात्रातील कॉँक्रिटीकरण काढावे की नाही याबाबत अभ्यासांतीच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.