शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘उजाला’ योजनेचे उद्दिष्ट वाढले

By admin | Updated: April 1, 2017 01:48 IST

नाशिक : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना स्वच्छ इंधन पुरविणाऱ्या प्रधानमंत्री उजाला योजनेत नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा नव्याने ३० हजार जोडणी तेल कंपन्यांनी मंजूर केली

नाशिक : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना स्वच्छ इंधन पुरविणाऱ्या प्रधानमंत्री उजाला योजनेत नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा नव्याने ३० हजार जोडणी तेल कंपन्यांनी मंजूर केली असून, मार्चच्या अखेरच्या दिवशी देण्यात आलेले उद्दिष्टपूर्तीसाठी तेल कंपन्या व गॅस एजन्सीचालकांची धावपळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्णात प्रधानमंत्री उजाला योजनेंतर्गत गॅस कंपन्यांनी गेल्यावर्षी आॅगष्ट महिन्यात जिल्ह्णातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा शोध घेतला होता. त्यासाठी ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली. साधारणत: ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधन म्हणून सरपण, गोवऱ्या, कोळश्याचा वापर केला जात असल्याने अशा कुटुंबांना प्रधानमंत्री उजाला योजनेंतर्गत गॅस जोडणी देण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ७१ हजार ६४५ इतके कुटुंबांचा शोध घेण्यात आला, तथापि, नाशिक जिल्ह्णाला दहा हजार जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आल्याने आॅक्टोबर महिन्यातच १०७३५ कुटुंबाना गॅस जोडणी देण्यात आली, उर्वरित जवळपास ६० हजार कुटुंबे जोडणीच्या प्रतीक्षेत होती. या संदर्भात शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र सरकारने मार्चअखेरीस पुन्हा उजाला योजनेचे उद्दिष्ट वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्णात यासाठी ३० हजार नवीन जोडणी देण्यात येणार असून, दोन दिवसांतच ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश तेल कंपन्यांनी गॅस एजन्सीचालकांना दिले आहेत. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांची हाती असलेल्या माहितीच्या आधारे गॅस जोडणी देण्यासाठी धावपळ  उडाली आहे. (प्रतिनिधी)