शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्राम योजनेत आहेरगाव ग्रामपंचायत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST

जिल्हस्तरीय स्मार्ट ग्राम समितीकडून तपासणी पिंपळगाव बसवंत : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या ...

जिल्हस्तरीय स्मार्ट ग्राम समितीकडून तपासणी

पिंपळगाव बसवंत : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची योजना आहे. या योजनेत तालुकास्तरावर आहेरगाव ग्रामपंचायत पात्र ठरली असून आता जिल्हस्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीच्यावतीनेदेखील ग्रामपंचायतची तपासणी करण्यात आली. त्यातदेखील जिल्हा कमिटीने समाधान व्यक्त केले आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी, निफाडचे गट विकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी सुहास शिंदे, सोनवणे, के.टी. गादड यांनी या ग्राम कमिटीत सहभागी होते.

आहेरगाव हे गाव निफाड तालुक्यात नेहमी चर्चेत असणारे गाव आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शासनाच्या निर्मल ग्राम, स्वछ ग्राम, आदर्श गाव, साने गुरुजी स्वच्छ शाळा, बचत गट स्थापन करून रोजगार निर्मिती आदीसह अनेक शासनाच्या योजनेत भाग घेतला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर हे निकष आहेत. यावेळी आहेरगावच्या सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच रामकृष्ण शिंदे, रामभाऊ तात्या माळोदे संचालक कृउबास ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ मोरे, कृष्णा रसाळ, बाळासाहेब गांगुर्डे, गणेश निकम, लता रसाळ, धनश्री गवळी, मनीषा मोरे, जनाबाई जाधव, स्वाती बागुल, रामराव रसाळ, सुरेश शिंदे, भालचंद्र तरवारे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

-------------------------

कमिटीकडून समाधान

या निकषात जास्तीत जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना तालुक्यात प्रथम येणाऱ्या १० लाख रुपये पुरस्काराची योजना आहे. त्यात निफाड तालुक्यात आहेरगाव ग्रामपंचायत प्रथम क्रमांक म्हणून पात्र ठरली असून जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतमध्ये आहेरगाव ग्रामपंचायतचा समावेश झाला होता आणि आता जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीने पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.

-------------------------------

आहेरगाव ग्रामपंचायतीची पाहणी करताना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, समवेत इतर पदाधिकारी. (१७ पिंपळगाव १)

170721\17nsk_10_17072021_13.jpg

१७ पिंपळगाव १