शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शेती बदलतेय... : बुधाजीराव मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:34 IST

नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गावाकडे परतणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी शेती टिकविली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.

ठळक मुद्देसरपंच हा गावाचा प्रमुख असल्याने त्याने गावाच्या शेतीचे बजेट मांडले पाहिजेगाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल

नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गावाकडे परतणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी शेती टिकविली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.शेतीची दैनावस्था झाली असल्याची वस्तुस्थिती असून, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शाश्वत शेती होणार नाही. सरपंच हा गावाचा प्रमुख असल्याने त्याने गावाच्या शेतीचे बजेट मांडले पाहिजे. गावशेतीचे उत्पादन वाढविण्याचा विचार करताना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आणि किंमत देणारे पीक कसे घेता येईल याचाही विचार झाला पाहिजे,असे ही ते म्हणाले.गाव समृद्ध करण्यासाठी शेतीचे नियोजन महत्त्वाचे नक्कीच आहे.शेतकºयाला नैसर्गिक परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागते. कीड, रोग, निसर्गाची अवकृपा, पूर यातून शेतीचे नुकसान होते. बिबट्याच्या वावर वाढल्याने पिकांकडे दुर्लक्ष झाले, परंतु हे नुकसान शेतकºयालाच सोसावे लागते. शासनाकडून याला संरक्षण मिळत नाही. खरेतर शेतकरी आणि त्याच्या पिकाची जबाबदारी कायद्याने शासनाने घेतली पाहिजे. सरकारी योजनेत शेतकºयाला भागीदार केले पाहिजे, तरच त्याच्या नुकसानीला संरक्षण मिळू शकेल.शेतकºयाच्या पिकावर देशाची अर्थवाहिनी अवलंबून आहे. बाजारहाट, व्यापार, बॅँका किंबहुना सरकारही शेतकºयावर अवलंबून आहे इतकी शेतकºयाची ताकद आहे. म्हणून शेतकºयांना स्थैर्य प्राप्त होण्यासाठी कायद्याने प्रयत्न झाले पाहिजेत. यांत्रिकीकरणाच्या काळात आपल्या चेहºयाला कुठेही महत्त्व नाही, तर बोटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रेरणादायी उपक्रम : दराडेजो चांगले काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी ही आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा आहे. त्याच परंपरेने ‘लोकमत’ने गावातील सरपंचांना सन्मानित करण्याचा सुरू केलेला उपक्रम निश्चितच गौरवास्पद आहे. ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले त्यांचे कार्य इतर सरपंचांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. प्रत्येक गावाच्या पारावर होणारी चर्चा ही मिनी पार्लमेंटसारखीच असते. येथे होणाºया चर्चेचे प्रतिबिंब गावात, तालुक्यात आणि पुढे देशभरापर्यंत उमटत असते. ज्या गावाचे सरपंच व पोलीसपाटीले क्रियाशील असतील ते गाव आदर्श आणि समृद्ध होण्यास वेळ लागत नाही. गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल, असेही दराडे म्हणाले.