शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेती बदलतेय... : बुधाजीराव मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:34 IST

नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गावाकडे परतणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी शेती टिकविली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.

ठळक मुद्देसरपंच हा गावाचा प्रमुख असल्याने त्याने गावाच्या शेतीचे बजेट मांडले पाहिजेगाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल

नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गावाकडे परतणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी शेती टिकविली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.शेतीची दैनावस्था झाली असल्याची वस्तुस्थिती असून, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शाश्वत शेती होणार नाही. सरपंच हा गावाचा प्रमुख असल्याने त्याने गावाच्या शेतीचे बजेट मांडले पाहिजे. गावशेतीचे उत्पादन वाढविण्याचा विचार करताना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आणि किंमत देणारे पीक कसे घेता येईल याचाही विचार झाला पाहिजे,असे ही ते म्हणाले.गाव समृद्ध करण्यासाठी शेतीचे नियोजन महत्त्वाचे नक्कीच आहे.शेतकºयाला नैसर्गिक परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागते. कीड, रोग, निसर्गाची अवकृपा, पूर यातून शेतीचे नुकसान होते. बिबट्याच्या वावर वाढल्याने पिकांकडे दुर्लक्ष झाले, परंतु हे नुकसान शेतकºयालाच सोसावे लागते. शासनाकडून याला संरक्षण मिळत नाही. खरेतर शेतकरी आणि त्याच्या पिकाची जबाबदारी कायद्याने शासनाने घेतली पाहिजे. सरकारी योजनेत शेतकºयाला भागीदार केले पाहिजे, तरच त्याच्या नुकसानीला संरक्षण मिळू शकेल.शेतकºयाच्या पिकावर देशाची अर्थवाहिनी अवलंबून आहे. बाजारहाट, व्यापार, बॅँका किंबहुना सरकारही शेतकºयावर अवलंबून आहे इतकी शेतकºयाची ताकद आहे. म्हणून शेतकºयांना स्थैर्य प्राप्त होण्यासाठी कायद्याने प्रयत्न झाले पाहिजेत. यांत्रिकीकरणाच्या काळात आपल्या चेहºयाला कुठेही महत्त्व नाही, तर बोटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रेरणादायी उपक्रम : दराडेजो चांगले काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी ही आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा आहे. त्याच परंपरेने ‘लोकमत’ने गावातील सरपंचांना सन्मानित करण्याचा सुरू केलेला उपक्रम निश्चितच गौरवास्पद आहे. ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले त्यांचे कार्य इतर सरपंचांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. प्रत्येक गावाच्या पारावर होणारी चर्चा ही मिनी पार्लमेंटसारखीच असते. येथे होणाºया चर्चेचे प्रतिबिंब गावात, तालुक्यात आणि पुढे देशभरापर्यंत उमटत असते. ज्या गावाचे सरपंच व पोलीसपाटीले क्रियाशील असतील ते गाव आदर्श आणि समृद्ध होण्यास वेळ लागत नाही. गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल, असेही दराडे म्हणाले.