शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

मक्याच्या लष्करी अळीपुढे कृषी खाते हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अमेरिकेहून थेट भारतात दाखल झालेल्या मक्यावरील लष्करी अळीचे संकट टाळण्यासाठी मे महिन्यापासून प्रयत्नशील असलेल्या ...

ठळक मुद्दे६० टक्के क्षेत्र बाधित : उपाययोजनांचे प्रयोगलष्करी अळी किमान दोन हजारांच्या आसपास अंडी घालत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अमेरिकेहून थेट भारतात दाखल झालेल्या मक्यावरील लष्करी अळीचे संकट टाळण्यासाठी मे महिन्यापासून प्रयत्नशील असलेल्या कृषी खात्याच्या अथक प्रयत्नानंतरही अळीचा प्रभाव झपाट्याने होत असल्याने कृषी खाते हतबल झाले आहे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरहून अधिक हेक्टरवर मक्याचे पीक घेतले जात असताना त्यातील जवळपास ६० टक्के क्षेत्राला लष्करी अळीचा धोका निर्माण झाल्याने यंदा मक्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे.

काही वर्षांपूर्वी मक्याला बोेंडअळीने त्रस्त केले होते त्यावर कृषी विभागाने कसेबसे नियंत्रण मिळविल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यात मक्याच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मक्याची निर्यातही करण्यात आली. यंदा मात्र मक्याची पेरणी करण्यापूर्वीच अमेरिकन लष्करी अळीचा धोका भारतातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला. नाशिक जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी होते त्यांनी मार्च, एप्रिल महिन्यांत मक्याची पेरणी केली होती. त्यांना मात्र अवघ्या महिनाभरात लष्करी अळीच्या धोक्याला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र खरिपाच्या पेरणीत सर्वच ठिकाणी लष्करी अळीने आपले कार्यक्षेत्र विस्तारले. अवघ्या वीस दिवसांच्या प्रजनन काळात लष्करी अळी किमान दोन हजारांच्या आसपास अंडी घालत असून, तीन दिवसांनंतर तत्काळ अंडीतून अळी बाहेर पडून ती थेट पिकाच्या मुख्य गाभावर हल्ला चढविते, परिणामी पीक आहे त्या परिस्थितीतच खुंटते. या अळीचा प्रवासही वेगाचा असल्यामुळे एका शेतातून दुस-या शेतात जाण्यास काही मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे कृषी खात्याने मे महिन्यापासून म्हणजे खरिपाच्या पेरणीपासूनच शेतकऱ्यांना लष्करी अळीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांशी अवगत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याचबरोबर अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चुना व वाळूचा वापर करण्याचा तसेच अळीला दुसºया पिकाकडे वळविण्यासाठी विविध प्रयोग केले. परंतु त्याला फारसे यश मिळू शकलेले नाही.जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख दहा हजार मक्याचे क्षेत्र असून, शेतकºयांनी सर्वच क्षेत्रांत मक्याची पेरणी केली आहे. त्यातील सुमारे ६० टक्के क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला असून, त्यावर कोणतीही मात्रा लागू पडत नसल्याचे पाहून अखेरचा उपाय म्हणून रासायनिक औषधांची फवारणी करण्याचा पर्याय पुढे आला आहे. परंतु ही फवारणी महागडी आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक