शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

मक्याच्या लष्करी अळीपुढे कृषी खाते हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अमेरिकेहून थेट भारतात दाखल झालेल्या मक्यावरील लष्करी अळीचे संकट टाळण्यासाठी मे महिन्यापासून प्रयत्नशील असलेल्या ...

ठळक मुद्दे६० टक्के क्षेत्र बाधित : उपाययोजनांचे प्रयोगलष्करी अळी किमान दोन हजारांच्या आसपास अंडी घालत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अमेरिकेहून थेट भारतात दाखल झालेल्या मक्यावरील लष्करी अळीचे संकट टाळण्यासाठी मे महिन्यापासून प्रयत्नशील असलेल्या कृषी खात्याच्या अथक प्रयत्नानंतरही अळीचा प्रभाव झपाट्याने होत असल्याने कृषी खाते हतबल झाले आहे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरहून अधिक हेक्टरवर मक्याचे पीक घेतले जात असताना त्यातील जवळपास ६० टक्के क्षेत्राला लष्करी अळीचा धोका निर्माण झाल्याने यंदा मक्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे.

काही वर्षांपूर्वी मक्याला बोेंडअळीने त्रस्त केले होते त्यावर कृषी विभागाने कसेबसे नियंत्रण मिळविल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यात मक्याच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मक्याची निर्यातही करण्यात आली. यंदा मात्र मक्याची पेरणी करण्यापूर्वीच अमेरिकन लष्करी अळीचा धोका भारतातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला. नाशिक जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी होते त्यांनी मार्च, एप्रिल महिन्यांत मक्याची पेरणी केली होती. त्यांना मात्र अवघ्या महिनाभरात लष्करी अळीच्या धोक्याला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र खरिपाच्या पेरणीत सर्वच ठिकाणी लष्करी अळीने आपले कार्यक्षेत्र विस्तारले. अवघ्या वीस दिवसांच्या प्रजनन काळात लष्करी अळी किमान दोन हजारांच्या आसपास अंडी घालत असून, तीन दिवसांनंतर तत्काळ अंडीतून अळी बाहेर पडून ती थेट पिकाच्या मुख्य गाभावर हल्ला चढविते, परिणामी पीक आहे त्या परिस्थितीतच खुंटते. या अळीचा प्रवासही वेगाचा असल्यामुळे एका शेतातून दुस-या शेतात जाण्यास काही मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे कृषी खात्याने मे महिन्यापासून म्हणजे खरिपाच्या पेरणीपासूनच शेतकऱ्यांना लष्करी अळीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांशी अवगत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याचबरोबर अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चुना व वाळूचा वापर करण्याचा तसेच अळीला दुसºया पिकाकडे वळविण्यासाठी विविध प्रयोग केले. परंतु त्याला फारसे यश मिळू शकलेले नाही.जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख दहा हजार मक्याचे क्षेत्र असून, शेतकºयांनी सर्वच क्षेत्रांत मक्याची पेरणी केली आहे. त्यातील सुमारे ६० टक्के क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला असून, त्यावर कोणतीही मात्रा लागू पडत नसल्याचे पाहून अखेरचा उपाय म्हणून रासायनिक औषधांची फवारणी करण्याचा पर्याय पुढे आला आहे. परंतु ही फवारणी महागडी आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक