शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

गिरणाच्या पूरपाण्यामुळे शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:26 IST

गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते.

ठळक मुद्देकळवण तालुका : ७०० क्ंिवटल कांदा सडला; मक्यासह उसाला फटका

कळवण/पाळे खुर्द/सायखेडा : गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते. अशोक मोतीराम पाटील यांच्या चार ते पाच एकर ऊस बेणे प्लॉट झालेला असताना त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने ऊस वाहून गेला तर काही ऊस गाळाने व रेतीने भरलाआहे.भास्कर शिवराम पाटील यांच्या चाळीमध्ये पाणी शिरल्याने ७०० क्विंटल कांदा पाण्यामुळे सडला. ७०० क्षमता असलेल्या चाळीमध्ये दहा फुटापर्यंत पाणी होते. दीड एकर टमाटा पिकाचा प्लॉट त्यावर साधारण दीड लाख रुपये खर्च केलेला तो पुरामध्ये वाहून गेला. नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरल्याने काही शेतकऱ्यांचे जमिनीत असलेली पाइपलाइन व ठिबक सिंचनची वाट लागली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.गोदाकाठी शेतकरी हवालदिलसायखेडा : गोदावरी नदीला आलेल्या महापुराने झालेले नुकसान हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. प्रत्येक दिवशी नवनवीन समस्या आणि नुकसान पाहून नागरिक हैराण झाले आहे. शेती आणि व्यवसाय यांचे सर्वाधिक फटका बसला आहे. गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, चाटोरी, दारणासांगवी, शिंपी टकळी, गोदानगर, चापडगाव या गावात पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. नदीलगत असलेल्या शेतात पाणी गेल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.४पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली, तर अनेक पिके शेतात तग धरून उभी असली तरी जास्त दिवस पाण्यात राहून आणि जमिनीत अनेक दिवस ओलावा राहिल्याने पिके सडू लागली आहे. अनेक पिकांचे शेतात अस्तित्वदेखील शिल्लक राहिले नाही. कोणत्या शेतात कोणते पीक उभे होते याच्या केवळ खुणा दिसत आहे. शेतकरी नदीचे पाणी कमी झाल्याने शेतात जाऊन पहात आहे तर उभे पीक डोळ्यासमोर गेल्याने हवालदिल होत आहे, शेतकरी या अस्मानी संकटामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी जळूनखाक झाली होती तर हंगाम सुरू होताच खरीप हंगामातील पिके उभे केली. हजारो रु पये खर्च करून पिके शेतात डोलू लागली असताना गोदामाईच्या कुशीत वाहून गेली. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकfloodपूरagricultureशेती