शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

गिरणाच्या पूरपाण्यामुळे शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:26 IST

गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते.

ठळक मुद्देकळवण तालुका : ७०० क्ंिवटल कांदा सडला; मक्यासह उसाला फटका

कळवण/पाळे खुर्द/सायखेडा : गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते. अशोक मोतीराम पाटील यांच्या चार ते पाच एकर ऊस बेणे प्लॉट झालेला असताना त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने ऊस वाहून गेला तर काही ऊस गाळाने व रेतीने भरलाआहे.भास्कर शिवराम पाटील यांच्या चाळीमध्ये पाणी शिरल्याने ७०० क्विंटल कांदा पाण्यामुळे सडला. ७०० क्षमता असलेल्या चाळीमध्ये दहा फुटापर्यंत पाणी होते. दीड एकर टमाटा पिकाचा प्लॉट त्यावर साधारण दीड लाख रुपये खर्च केलेला तो पुरामध्ये वाहून गेला. नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरल्याने काही शेतकऱ्यांचे जमिनीत असलेली पाइपलाइन व ठिबक सिंचनची वाट लागली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.गोदाकाठी शेतकरी हवालदिलसायखेडा : गोदावरी नदीला आलेल्या महापुराने झालेले नुकसान हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. प्रत्येक दिवशी नवनवीन समस्या आणि नुकसान पाहून नागरिक हैराण झाले आहे. शेती आणि व्यवसाय यांचे सर्वाधिक फटका बसला आहे. गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, चाटोरी, दारणासांगवी, शिंपी टकळी, गोदानगर, चापडगाव या गावात पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. नदीलगत असलेल्या शेतात पाणी गेल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.४पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली, तर अनेक पिके शेतात तग धरून उभी असली तरी जास्त दिवस पाण्यात राहून आणि जमिनीत अनेक दिवस ओलावा राहिल्याने पिके सडू लागली आहे. अनेक पिकांचे शेतात अस्तित्वदेखील शिल्लक राहिले नाही. कोणत्या शेतात कोणते पीक उभे होते याच्या केवळ खुणा दिसत आहे. शेतकरी नदीचे पाणी कमी झाल्याने शेतात जाऊन पहात आहे तर उभे पीक डोळ्यासमोर गेल्याने हवालदिल होत आहे, शेतकरी या अस्मानी संकटामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी जळूनखाक झाली होती तर हंगाम सुरू होताच खरीप हंगामातील पिके उभे केली. हजारो रु पये खर्च करून पिके शेतात डोलू लागली असताना गोदामाईच्या कुशीत वाहून गेली. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकfloodपूरagricultureशेती