शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

गिरणाच्या पूरपाण्यामुळे शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:26 IST

गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते.

ठळक मुद्देकळवण तालुका : ७०० क्ंिवटल कांदा सडला; मक्यासह उसाला फटका

कळवण/पाळे खुर्द/सायखेडा : गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते. अशोक मोतीराम पाटील यांच्या चार ते पाच एकर ऊस बेणे प्लॉट झालेला असताना त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने ऊस वाहून गेला तर काही ऊस गाळाने व रेतीने भरलाआहे.भास्कर शिवराम पाटील यांच्या चाळीमध्ये पाणी शिरल्याने ७०० क्विंटल कांदा पाण्यामुळे सडला. ७०० क्षमता असलेल्या चाळीमध्ये दहा फुटापर्यंत पाणी होते. दीड एकर टमाटा पिकाचा प्लॉट त्यावर साधारण दीड लाख रुपये खर्च केलेला तो पुरामध्ये वाहून गेला. नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरल्याने काही शेतकऱ्यांचे जमिनीत असलेली पाइपलाइन व ठिबक सिंचनची वाट लागली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.गोदाकाठी शेतकरी हवालदिलसायखेडा : गोदावरी नदीला आलेल्या महापुराने झालेले नुकसान हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. प्रत्येक दिवशी नवनवीन समस्या आणि नुकसान पाहून नागरिक हैराण झाले आहे. शेती आणि व्यवसाय यांचे सर्वाधिक फटका बसला आहे. गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, चाटोरी, दारणासांगवी, शिंपी टकळी, गोदानगर, चापडगाव या गावात पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. नदीलगत असलेल्या शेतात पाणी गेल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.४पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली, तर अनेक पिके शेतात तग धरून उभी असली तरी जास्त दिवस पाण्यात राहून आणि जमिनीत अनेक दिवस ओलावा राहिल्याने पिके सडू लागली आहे. अनेक पिकांचे शेतात अस्तित्वदेखील शिल्लक राहिले नाही. कोणत्या शेतात कोणते पीक उभे होते याच्या केवळ खुणा दिसत आहे. शेतकरी नदीचे पाणी कमी झाल्याने शेतात जाऊन पहात आहे तर उभे पीक डोळ्यासमोर गेल्याने हवालदिल होत आहे, शेतकरी या अस्मानी संकटामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी जळूनखाक झाली होती तर हंगाम सुरू होताच खरीप हंगामातील पिके उभे केली. हजारो रु पये खर्च करून पिके शेतात डोलू लागली असताना गोदामाईच्या कुशीत वाहून गेली. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकfloodपूरagricultureशेती