शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

आदिवासी शाळा तंत्रज्ञानात अगे्रसर्न

By admin | Updated: March 3, 2017 01:02 IST

पेठ : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असताना ग्रामीण भागातील शाळा यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत.

 रामदास शिंदे  पेठ बदलत्या काळाबरोबर आधुनिक विकासाची कास धरत असताना जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत.एकेकाळी त्याच दगडी व कौलारू खोलीत टोपी, सदरा व धोतरच्या वेशातील मास्तर आणि भिंतीवर चिटकविलेल्या मळकट फळ्यावर खडूच्या साह्याने हातात छडी घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे मास्तर आणि फुटकी पाटी पिशवीत कोंबून वावरातून थेट शाळेच्या वर्गात धापा टाकत येणारी मुले; मात्र दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी व स्वत:ला सिद्ध करून दाखविण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला असून, शहरी शाळांच्या तुलनेत ग्रामीण व आदिवासी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सरस ठरू पाहत आहेत.डिजिटल शाळा ही संकल्पना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तशी दुर्र्मीळच; मात्र शिक्षकांच्या संकल्पनेतून व मोलमजुरी करून कमविलेल्या पैशातून शाळेला दान करणाऱ्या ग्रामस्थांच्या जिद्दीने आज ग्रामीण भागातील बालके तंत्रज्ञानाचे धडे गिरवू लागली आहेत. शिक्षकांनी पदरमोड करून शाळांचा चेहरा मोहरा बदलला. एरवी शालेय पोषण आहार व बांधकामाच्या जोखडात सापडलेल्या शिक्षकाने हातात रंग आणि ब्रश घेतला. प्रथम शिक्षकांनी शाळांचा बाह्य भाग सुशोभीत केला. जमेल त्या साधनांचा वापर करून शाळा डिजिटल करण्याचा शिक्षकांचा प्रयत्न तसा अभिनंदनीयच.आज ग्रामीण भागातील शेकडो शाळांना ई-लर्निंग सिस्टीम मिळाली. संगणकाच्या साह्याने नाहीच काहीतर स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षकांनी सुरू केलेले स्मार्ट ज्ञानदान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी वरदान ठरू पाहत आहे. ग्रामीण शाळांमध्ये तरुण शिक्षकांचा भरणा तसा मोठा आहे. शिकणे व शिकविणे या दोन्हीही गोष्टी शिक्षकांच्या नसानसांत भिनल्याने झपाटल्यागत काम करताना शिक्षक दिसून येत आहेत. स्वत:ची वेबसाइट बनविण्यापासून तर संगणकाचे संपूर्ण ज्ञान, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती ब्लॉगच्या माध्यमातून माहितीचा खजाना शिक्षण विभागासाठी खुला करून देण्यात आला आहे.आजच्या तंत्रज्ञान युगात सर्वच क्षेत्रात गरुडझेप घेतली. यात शिक्षणक्षेत्रानेसुद्धा मोठी मजल गाठली आहे. विद्यार्थी अभ्यासक्रमातील संगणक विषय, दृकश्राव्य साहित्याचा अध्यापनातील वापर ते विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंत शिक्षणक्षेत्रात नवीन वाटचाल सुरू केली आहे. यासाठी राज्यभरातून तंत्रज्ञानस्नेही सर्व शिक्षकवृंदानी नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी जिवाची पराकाष्टा केली.