शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

आदिवासी शाळा तंत्रज्ञानात अगे्रसर्न

By admin | Updated: March 3, 2017 01:02 IST

पेठ : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असताना ग्रामीण भागातील शाळा यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत.

 रामदास शिंदे  पेठ बदलत्या काळाबरोबर आधुनिक विकासाची कास धरत असताना जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत.एकेकाळी त्याच दगडी व कौलारू खोलीत टोपी, सदरा व धोतरच्या वेशातील मास्तर आणि भिंतीवर चिटकविलेल्या मळकट फळ्यावर खडूच्या साह्याने हातात छडी घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे मास्तर आणि फुटकी पाटी पिशवीत कोंबून वावरातून थेट शाळेच्या वर्गात धापा टाकत येणारी मुले; मात्र दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी व स्वत:ला सिद्ध करून दाखविण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला असून, शहरी शाळांच्या तुलनेत ग्रामीण व आदिवासी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सरस ठरू पाहत आहेत.डिजिटल शाळा ही संकल्पना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तशी दुर्र्मीळच; मात्र शिक्षकांच्या संकल्पनेतून व मोलमजुरी करून कमविलेल्या पैशातून शाळेला दान करणाऱ्या ग्रामस्थांच्या जिद्दीने आज ग्रामीण भागातील बालके तंत्रज्ञानाचे धडे गिरवू लागली आहेत. शिक्षकांनी पदरमोड करून शाळांचा चेहरा मोहरा बदलला. एरवी शालेय पोषण आहार व बांधकामाच्या जोखडात सापडलेल्या शिक्षकाने हातात रंग आणि ब्रश घेतला. प्रथम शिक्षकांनी शाळांचा बाह्य भाग सुशोभीत केला. जमेल त्या साधनांचा वापर करून शाळा डिजिटल करण्याचा शिक्षकांचा प्रयत्न तसा अभिनंदनीयच.आज ग्रामीण भागातील शेकडो शाळांना ई-लर्निंग सिस्टीम मिळाली. संगणकाच्या साह्याने नाहीच काहीतर स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षकांनी सुरू केलेले स्मार्ट ज्ञानदान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी वरदान ठरू पाहत आहे. ग्रामीण शाळांमध्ये तरुण शिक्षकांचा भरणा तसा मोठा आहे. शिकणे व शिकविणे या दोन्हीही गोष्टी शिक्षकांच्या नसानसांत भिनल्याने झपाटल्यागत काम करताना शिक्षक दिसून येत आहेत. स्वत:ची वेबसाइट बनविण्यापासून तर संगणकाचे संपूर्ण ज्ञान, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती ब्लॉगच्या माध्यमातून माहितीचा खजाना शिक्षण विभागासाठी खुला करून देण्यात आला आहे.आजच्या तंत्रज्ञान युगात सर्वच क्षेत्रात गरुडझेप घेतली. यात शिक्षणक्षेत्रानेसुद्धा मोठी मजल गाठली आहे. विद्यार्थी अभ्यासक्रमातील संगणक विषय, दृकश्राव्य साहित्याचा अध्यापनातील वापर ते विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंत शिक्षणक्षेत्रात नवीन वाटचाल सुरू केली आहे. यासाठी राज्यभरातून तंत्रज्ञानस्नेही सर्व शिक्षकवृंदानी नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी जिवाची पराकाष्टा केली.