शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

आंदोलन सुरूच : बोगद्याप्रश्नी हरकतदारांच्या तीव्र भावना

By admin | Updated: July 29, 2015 00:32 IST

पोलिसांनी इंधनाचे पैसे द्यावेत

नाशिक : इंदिरानगरचा बोगदा पूर्वसूचना न देता बंद केल्याने नागरिकांच्या भावना चांगल्याच उफाळून आल्या असून, नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी हरकती नोंदविण्याचे आवाहन केले असता, त्यात अनेक नागरिकांनी आपली मते निर्भिडपणे व्यक्त केले. बोगदा बंदमुळे होणारा फेरा पाहता वेळ व इंधनात पैसा खर्च होत असल्याने पोलिसांनीच प्रत्येक वाहनचालकांना पैसे द्यावेत, अशी मागणी करून दडपशाहीपद्धतीने जर बोगदा बंद करणार असाल तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, बोगदा बंदच्या विरोधात इंदिरानगरच्या नागरिकांनी राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेत चौथ्या दिवशी चारशे नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, तर नगरसेवक कुलकर्णी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन जवळपास दिडशेहून अधिक नागरिकांनी लेखी स्वरूपात ‘बोगदा बंद’ केल्याबद्दल आपले मत नोंदविले आहे. त्यात आपल्या भावना मोकळ्या करताना पोलिसांनी नागरिकांना विश्वासात न घेता, दडपशाही चालविली असल्याची बहुसंख्य नागरिकांनी तक्रार केली आहे. बोगदा बंद केल्याने होणारी गैरसोय सविस्तर मांडताना वळण घेऊन करावी लागणारी कसरत अपघाताला आमंत्रण देणारी असून, दोन ते तीन किलोमीटरचा फेरा मारणे म्हणजे वेळ व पैसा वाया घालविण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. बोगदा बंद झाल्याने त्या ठिकाणची वाहतुकीची कोंडी बंद झाली असली तरी ज्या ज्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली अशा ठिकाणांवर वाहतूक जाम होऊ लागली आहे. मुंबईनाका, हॉटेल संदीप, चांडक सर्कल, मायको सर्कल या ठिकाणी वाहनांची गर्दी वाढल्याचेही निरीक्षण काही नागरिकांनी नोंदविले आहे. बोगदा बंद झाल्यामुळे गोविंदनगरला सहा पदरी बांधलेला रस्ता बिनकामाचा ठरला असून, त्यावर केलेला खर्चही वाया गेल्याने महापालिकेने पोलीस खात्याकडून त्याची भरपाई मागावी, अशी सूचनाही एका नागरिकाने केली आहे. पोलीस यंत्रणेचे कामच असून, बोगद्याजवळ होणारी कोंडी ते फोडू शकत नाही, म्हणजेच त्यांची कार्यक्षमता नसल्याचा टोलाही एकाने लगावला आहे. वाहतुकीचे नियोजन करता येत नसेल तर त्याचा दोष वाहनचालकांना देण्यात काय अर्थ, असेही पुढे म्हटले आहे. पोलिसांनी जनभावनेचा आदर करून वाहतुकीचे नियोजन करावे, नागरिकही त्याला साथ देतील; परंतु कोणताही निर्णय लादू नये अन्यथा लोकांनाच त्यांच्याविरोधात रस्त्यावर यावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)