शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कांद्याने पुन्हा केला वांदा बळीराजा संकटात : उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:48 IST

लासलगाव : गेली काही दिवसापूवी सरासरी १०३० रु पयांना विकला जाणारा कांदा हा आता सरासरी ६०० रु पये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक बजेट संपूर्ण कोलमडले आहे.

लासलगाव : गेली काही दिवसापूवी सरासरी १०३० रु पयांना विकला जाणारा कांदा हा आता सरासरी ६०० रु पये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक बजेट संपूर्ण कोलमडले आहे. कॅलिफोर्निया समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून येथील मुख्य पीक असलेल्या कांद्याचे दररोज घसरत असलेले दर हे शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी आपल्याकडे उन्हाळ कांदा हा चाळीमध्ये साठवून ठेवला मात्र शेअर बाजाराप्रमाणे कांद्याचे बाजारही कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.मार्च महिन्यात उन्हाळ कांदा साठवला आज सात महिन्यांनंतरही शेतकरी बाजार समितीत तो साठवलेला कांदा विक्र ीकरिता आणत आहे. आपल्या पोराबाळां सारखा सांभाळलेल्या कांद्याला मार्च महिन्याच्या तुलनेत अगदी नगण्य भाव मिळत असल्याने बळीराजा पूर्णपणे चिंतातुर झाला असून यंदा कांद्याने पूर्ण वर्षाचे गणति बिघडवण्याची भावना शेतकºयांमध्ये आहे. मागील वर्षी या कांद्याला पंधराशे रु पयांपर्यंत भाव मिळाला होता आज मात्र केवळ पाचशे ते सहाशे रु पये दराने कांदा विक्र ी करावा लागत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.गेल्यावर्षी लाल कांद्याला चांगला भाव मिळाला त्याचाच परिणाम म्हणून यांना नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भरमसाठ उत्पादन निघाले आहे मार्च मिहन्यापासून शेतकर्यांनी उन्हाळ कांदा आपल्या जमिनीत बांधलेल्या कांदा चाळीत तो साठवून ठेवला आहे मार्च मिहन्यात ज्यावेळी कांदा साठवणूक सुरू होती त्यावेळी कांद्याला सर्वसाधारण भाव हा 650 रु पये इतका मिळत होता आज सात मिहने कांदा साठवून तो बाजारात विक्र ीसाठी आणला जात आहे त्यावेळी देखील ६०० ते ७०० याच दराने कांदा विक्र ी करावा लागत असल्याने आपण एवढी मेहनत करून साठवलेल्या कांदा आज मातीमोल भावाने विकला जात असल्याने हाती तर काहीच आले नाही उलट कांदायाचा भाव पाहून डोळ्यातून अश्रू पडण्याची वेळ बळीराजावर आल्याची भावना शेतकर्यांमध्ये आहे.मागील वर्षी उन्हाळ कांद्याचे भाव यंदाच्या तुलनेत चांगले होते गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उन्हाळ कांद्याला उच्चांकी भावाची पातळी गाठून कांदा चार हजार रूपयांपर्यंत गेला होता. यंदाही चांगला कांदा भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदाचाळीत साठवणूक झाली असली तरी आज पर्यंत शेतकर्यांच्या नशिबी कांदा भावाची उच्च पातळी पाहण्याची वेळ मात्र आली नसली तरी अजूनही शेतकºयांना रास्त व चांगल्या भावाची अपेक्षा मात्र लागलेली आहे.

टॅग्स :onionकांदा