शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

स्मार्ट रोडमुळे पुन्हा कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:44 IST

गेल्या दीड वर्षापासून स्मार्ट रोडच्या प्रलंबित असलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यात या रोडचे काम पूर्णत्वास येत नाही तोच अशोकस्तंभ येथील स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे येथील व्यावसायिकांना पुन्हा एकदा आर्थिळ झळ बसणार आहे.

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून स्मार्ट रोडच्या प्रलंबित असलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यात या रोडचे काम पूर्णत्वास येत नाही तोच अशोकस्तंभ येथील स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे येथील व्यावसायिकांना पुन्हा एकदा आर्थिळ झळ बसणार आहे. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.शहराला जोडणाऱ्या अशोकस्तंभ चौकात स्मार्ट रोड अंतर्गत कामासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे चहूबाजूंनी स्तंभाकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात येत आहे. त्यामुळे रविवार कारंजा ते रेडक्र ॉस सिग्नलपर्यंत दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यात पर्यायी मार्गाबाबत माहिती नसल्याने अनेक वाहनधारकांची दिशाभूल होत आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.गेल्या दीड वर्षापासून या रस्त्याचे काम रखडल्याने वाहनधारकांसह परिसरातील व्यावसायिक, रहिवासी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशी परिस्थिती असताना स्मार्ट रोडच्या पुढच्या टप्प्यातील कामासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेला अशोकस्तंभ परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी शुक्रवारपासून हा मार्ग ३ महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या परिसरात असलेले महाविद्यालय, शाळा, व्यावसायिक संकुलामुळे या ठिकाणांहून रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ सुरू असते.व्यावसायिकांना आर्थिक फटकाअशोकस्तंभ शहराचा मध्यवर्ती परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे याठिकाणी अनेकांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. मात्र प्रशासनाने हा परिसर पुढील तीन महिने वाहतुकीसाठी बंद केल्याने येथील व्यवसाय संकटात सापडला आहे.परिसरात हॉटेल्स, दुकाने, हॉस्पिटलची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कामामुळे परिसरातील विविध व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याचे अनेक व्यावसायिक सांगतात.रस्ताच बंद असल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. त्यात याठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक न करता ठेकेदाराने नेमलेल्या ट्रॅफिक वार्डनवरच वाहतुकीची जबाबदारी देण्यात आल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीTrafficवाहतूक कोंडी