शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

माघारीनंतर २२१ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 01:37 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी अर्ज माघारीच्या दिवशी ९५ उमदेवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आता २२१ उमेदवार नशीब आजमविणार आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशीही अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्यासाठीचे प्रयत्न झाले.

ठळक मुद्देग्रामपंचायत पोटनिवडणूक : ९५ उमेदवारांनी घेतली माघार

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी अर्ज माघारीच्या दिवशी ९५ उमदेवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आता २२१ उमेदवार नशीब आजमविणार आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशीही अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्यासाठीचे प्रयत्न झाले.

२१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील २३० ग्रामपंचायतींमध्ये ३९३ जागांसाठी निवडणूक होत आहे. येवला, बागलाण, दिंडोरी, मालेगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, पेठ, कळवण, सिन्नर, देवळाल, नाशिक, चांदवड, इगतपुरी तालुक्यांमधील ग्रामपंचातयतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, ३९३ जागांसाठी उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. काही जागांवर केवळ औपचारिकता शिल्लक असून काही ठिकाणी एका जागेसाठीदेखील चुरस वाढली असल्याचे दिसून येते. गेल्या ३० नोव्हेंबरपासून पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३७४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. छाननी अंत ३५० नामनिर्देशनपत्र वैध ठरले. गुरुवारी अर्ज माघारीचा दिवस असल्याने अर्ज माघारीकडे सर्वंचे लक्ष लागून होते. अर्ज माघारीच्या निर्धारित वेळेत ९५ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून, २२१ उमेदवार आपले नशीब आजमविणार आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या. माघारीनाट्यासाठी उमेदवारांची शोधाशोध आणि प्रदीर्घ चर्चा झाल्याने दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता. अर्ज माघारीनंतर निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट झाले असून, येवला-१८, बागलाण-१३, दिंडोरी-२५, मालेगाव-२१, निफाड-१६, त्र्यंबकेश्वर- ४१,नांदगाव-०६, पेठ-१७, कळवण-०१, सिन्नर- १४, देवळाली-०८, नाशिक-१२, चांदवड- १२, इगतपुरी-१८ याप्रमाणे २२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

--इन्फो--

स्थगित १८ जागांसाठी ३३ अर्ज

२३० ग्रामपंचायतींमध्ये ३९३ जागांसाठी पोटनिवडणूक होत असली तरी, काही जागांचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १८ जागा स्थगित ठेवण्यात आलेल्या असल्यातरी या जागांसाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या जागांचा निर्णय होणार आहे. त्यानंतर या जागांवरील निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे ३३३ वैध नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर ९५ उमेदवारांच्या माघारीनंतर २२१ इतके उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक