शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

माघारीनंतर २२१ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 01:37 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी अर्ज माघारीच्या दिवशी ९५ उमदेवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आता २२१ उमेदवार नशीब आजमविणार आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशीही अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्यासाठीचे प्रयत्न झाले.

ठळक मुद्देग्रामपंचायत पोटनिवडणूक : ९५ उमेदवारांनी घेतली माघार

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी अर्ज माघारीच्या दिवशी ९५ उमदेवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आता २२१ उमेदवार नशीब आजमविणार आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशीही अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्यासाठीचे प्रयत्न झाले.

२१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील २३० ग्रामपंचायतींमध्ये ३९३ जागांसाठी निवडणूक होत आहे. येवला, बागलाण, दिंडोरी, मालेगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, पेठ, कळवण, सिन्नर, देवळाल, नाशिक, चांदवड, इगतपुरी तालुक्यांमधील ग्रामपंचातयतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, ३९३ जागांसाठी उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. काही जागांवर केवळ औपचारिकता शिल्लक असून काही ठिकाणी एका जागेसाठीदेखील चुरस वाढली असल्याचे दिसून येते. गेल्या ३० नोव्हेंबरपासून पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३७४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. छाननी अंत ३५० नामनिर्देशनपत्र वैध ठरले. गुरुवारी अर्ज माघारीचा दिवस असल्याने अर्ज माघारीकडे सर्वंचे लक्ष लागून होते. अर्ज माघारीच्या निर्धारित वेळेत ९५ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून, २२१ उमेदवार आपले नशीब आजमविणार आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या. माघारीनाट्यासाठी उमेदवारांची शोधाशोध आणि प्रदीर्घ चर्चा झाल्याने दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता. अर्ज माघारीनंतर निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट झाले असून, येवला-१८, बागलाण-१३, दिंडोरी-२५, मालेगाव-२१, निफाड-१६, त्र्यंबकेश्वर- ४१,नांदगाव-०६, पेठ-१७, कळवण-०१, सिन्नर- १४, देवळाली-०८, नाशिक-१२, चांदवड- १२, इगतपुरी-१८ याप्रमाणे २२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

--इन्फो--

स्थगित १८ जागांसाठी ३३ अर्ज

२३० ग्रामपंचायतींमध्ये ३९३ जागांसाठी पोटनिवडणूक होत असली तरी, काही जागांचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १८ जागा स्थगित ठेवण्यात आलेल्या असल्यातरी या जागांसाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या जागांचा निर्णय होणार आहे. त्यानंतर या जागांवरील निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे ३३३ वैध नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर ९५ उमेदवारांच्या माघारीनंतर २२१ इतके उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक