शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

नद्याचे जल घेवून सप्तश्रुंग गडावर कवडीधारक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 17:25 IST

कळवण- सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, पायातील घुंगराची छमछम व डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तश्रृंगी गडाकडील रस्ते निनादून गेले असून, सप्तश्रृंगी गडाकडे येणारे रस्ते कावडीधारकांचे भगवे कपडे व पदयात्रेकरु ंच्या हातात असलेल्या देवीच्या झेंड्यांमुळे सपूर्ण परीसर भगवामय झाला आहे.

ठळक मुद्देमंगळवारीकोजागरी पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा) उत्सव व कावड यात्रा सप्तशृंग गडावर संपन्न होत आहे.यानिमित्तयेथेकावड यात्रा संपन्न होते. कोजागिरी पौर्णिमेला आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेस अभिषेक विधी करण्यासाठी हजारो कावडीधारक पूणे येथून मुळा नदीचे, साक्र ी, पिंपळन

कोजागरी: तृतीय पंथींचा आनंद मेळावा भरणारकळवण-सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, पायातील घुंगराची छमछम व डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तश्रृंगी गडाकडील रस्ते निनादून गेले असून, सप्तश्रृंगी गडाकडे येणारे रस्ते कावडीधारकांचे भगवे कपडे व पदयात्रेकरु ंच्या हातात असलेल्या देवीच्या झेंड्यांमुळे सपूर्ण परीसर भगवामय झाला आहे.दरम्यान कोजागिरीच्या पूर्वसंध्येस नवीबेज, कळवण व सप्तश्रृंगी गड व परीसरात कावडीधारक दाखल झाले आहेत. रस्त्याला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कळवणकडून पहाटेपासून कावडीधारक सप्तशृंग गडाच्या दिशेने निघाले असून रस्ता गर्दीने ओसंडून वाहात असल्याने मार्गावरील वाहने संथ गतीने धावत होते. ठिकठिकाणी स्वयंसेवी मंडळतर्फे कावडीधारक व पदयात्रेकरूंना फराळ, दुध, नाष्टा, सरबत व पिण्याच्या पाण्याची सुविधा व रविवारी व सोमवारी रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.आज मंगळवारी सकाळी सातला पंचामृत महापूजा, दुपारी १२ वाजेपासून कावडीधारकांना गेटमधुन मंदीरात सोडण्यात येणार आहे. दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत कावडीधारकांनी आणलेले पवित्र नदयांचे जल कावडीधारक स्वत: जलाभिषेकासाठी ठेवण्यात आलेल्या दहा ते पंधरा पिंपामध्ये ओतील व त्यानंतर ११ पुरोहित लाखो भाविकांच्या उपस्थितीत सप्तश्रृंगीचा जलाभिषेक करण्यात येणार आहे व रात्री बारा वाजता महाआरती होणार आहे.कोजागीरी उत्साहाचे भाविकांचे खास आकर्षन असलेल्या किन्नरांची दिक्षा कार्यक्र मा बरोबरच शेकडो किन्नरांच्या उपस्थितअसणारी छबिना मिरवणूक निघणार आहे. त्यादृष्टीन किन्नरांचे वेगवेगळे गट सप्तशृंग गडावर दाखल झाले असून काही गट मंगळवारी सकाळीसपर्यंत दाखल होतील. कावडीधारक व यात्रेकरूंना पिण्याचे पाणी, निवास व इतर कार्यक्र मांसाठी श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टने तयारी पूर्ण केली असून भाविकांना प्रसादालयात सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोजागरीच्या पूर्वसंध्येस सप्तशृंग गडावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सोमवारी मध्यरात्रीपासून नांदुरी सप्तश्रृंगी रस्ता खाजगी वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्याने कावडीधारकांची साहित्य असलले हजारो वाहाने तत्पूर्वीच सप्तशृंग गडावर दाखल झाल्याने सप्तशृंग गडावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्री पासून नांदुरी - सप्तश्रृंगी गड या दरम्यान फक्त राज्य परीवहन महामंडाच्या बसेस वाहतूक करणार असल्याने एसटी बसेस भाविकांच्या वाहतूकीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.कळवणमध्ये दर्शन-उत्तर महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो कवडीधारक कळवण शहरात दाखल होवून विश्रांती घेतात. कळवणच्या गांधी चौकातील चंद्रकांत उपासनी यांच्या श्री अंबिकामातेच्या चरणी हजारो कावडीधारक नतमस्तक होवून मनोभावे दर्शन घेतात,मंदिरात आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेवून कवडीधारक सप्तश्रुंग गडाकडे मार्गस्थ होतात,कळवणमार्ग हजारो कवडीधारक व शेकडो वाहने मार्गस्थ झाले.किन्नराचा आनंद मेळावा-तृतीय पंथीयांंच्या शब्दाला शुभ मानले जाते ,त्याबद्दल त्यांना दान दिले जाते ,उपेक्षा ही मात्र त्यांच्या पाचवीला पुजलेली असते ,कोजागिरी पौर्णिमेला मात्र सप्तश्रुंगगडावर तृतीयपंथी देशाच्या व राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर येतात ,कोजागरीला तृतीयपंथींचा आनंद मेळावाच सप्तश्रुंग गडावर जणू भरतोे. सप्तश्रुंग गडावरील शिवालाय तलावावर स्नान केल्यानंतर तृतीय पंथीची गडावर मिरवणूक काढली जाते.विविध भागातील सर्व पंथाचे लोक एकत्र येवून पंथाच्या गुरूला गुरु प्रदक्षिणा अर्पण करतात गुरु कडून शिष्यांना दीक्षा देण्याचे काम कोजागिरी पौर्णिमेला गडावर तृतीय पंथींचा एक आगळावेगळा कार्यक्र म गडावर संपन्न होत असल्याने हा कार्यक्र म पाहण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देवीभक्त गर्दी करतात ,देशात कोजागिरी पौर्णिमेला तृतीय पंथीचे कर्नाटकातील यलमा देवी व महाराष्ट्रातील कळवण तालुक्यातील सप्तश्रुंग गडावर असे दोनच ठिकाणी आनंद मेळावे भरतात.

प्राचीन काळी सप्तश्रुंग गडावरील शिवालय तलावावर स्नान करण्यापूर्वी देवांच्या राण्यांनी देवांना सांगताना सांगितले की ,आमच्या स्नानाच्या वेळी येथे आम्हाला पुरु षाचीही उपस्थिती नको ,आणि स्रिया देखील नको त्यावेळी देवांनी यातून मार्ग काढण्यासाठी तृतीय पंथी वर्गाची निर्मिती केली अशी आख्यायिका सांगितली जाते तेव्हापासून आजतागायत हे देवांचे दूत तृतीय पंथी सप्तश्रुंग गडावर शिवालय तलावावर स्नान करण्यासाठी जमतात असे सांगितले जाते