शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

साखर मिळाल्याने रेशन दुकाने सुरू‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:38 IST

लोकमत’चा दणका : गरिबांची दिवाळी गोड नाशिक : ऐन सणासुदीत वाहतूक ठेकेदाराने साखरेची वाहतूक न केल्यामुळे रेशन दुकानांवर खडखडाट झाल्याने दुकानदार तसेच गोरगरिबांकडून होणारी ओरड लक्षात घेऊन नरक चतुर्दशीच्या दिवशी वाहतूक ठेकेदाराने धावपळ करीत शहरातील दुकानदारांपर्यंत साखर पोहोचती केली. त्यामुळे आता ऐन दिवाळीत दुकानदारांना साखर विक्रीसाठी दुकाने उघडावी लागली आहेत.

लोकमत’चा दणका : गरिबांची दिवाळी गोड

नाशिक : ऐन सणासुदीत वाहतूक ठेकेदाराने साखरेची वाहतूक न केल्यामुळे रेशन दुकानांवर खडखडाट झाल्याने दुकानदार तसेच गोरगरिबांकडून होणारी ओरड लक्षात घेऊन नरक चतुर्दशीच्या दिवशी वाहतूक ठेकेदाराने धावपळ करीत शहरातील दुकानदारांपर्यंत साखर पोहोचती केली. त्यामुळे आता ऐन दिवाळीत दुकानदारांना साखर विक्रीसाठी दुकाने उघडावी लागली आहेत.सरकारने रेशनवरील धान्य व साखरेची थेट दुकानापर्यंत वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केलेली असताना वाहतूक ठेकेदाराने दिवाळीसाठी सरकारने दिलेली साखर पुरविली नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुरवठा खात्याने ठेकेदाराच्या मुसक्या आवळल्याने दोन दिवसात शहरातील २०६ दुकानांना साखरेचा पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा रेशनवरून स्वस्त दरात साखर देण्यासाठी दिले जाणारे अनुदान राज्य सरकारला देणे बंद केल्यामुळे राज्य सरकारने सध्या फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आॅगस्ट महिन्यातच सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी लागणाºया साखरेचा कोटा मंजूर केला. नाशिक जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या एक लाख ७९ हजार ४०८ शिधापत्रिका असून, त्यासाठी शासनाने ५३९२ मेट्रिक टन साखर मंजूर करून जिल्ह्याच्या ताब्यात दिली. सदरची साखर त्या त्या तालुक्यातील शिधापत्रिकेच्या संख्येच्या प्रमाणात तालुक्यांच्या शासकीय गुदामात रवाना करण्यात आली होती. त्यातील सप्टेंबर महिन्यात ठेकेदाराने प्रत्येक रेशन दुकानापर्यंत साखर वाहतूक करून पुरविली असली तरी, आॅक्टोबर महिन्यात मात्र दुकानदारांना साखरेचा पुरवठा केला नाही. वर्षातून एकदाच येणारा दिवाळी सण सुरू होऊनही रेशनवर साखर मिळण्याच्या अपेक्षेवर असलेल्या गोरगरिबांना खुल्या बाजारात ४० रुपये किलो दराने साखर खरेदी करावी लागली. ४ किलो ते ४० किलो साखरसरकारने फक्त अंत्योदय योजनेसाठी पात्र ठरणाºया शिधापत्रिकाधारकांनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुकानदारांना चार किलो ते चाळीस किलोपर्यंत साखरेचे वितरण करण्यात आले.