शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

साखर मिळाल्याने रेशन दुकाने सुरू‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:38 IST

लोकमत’चा दणका : गरिबांची दिवाळी गोड नाशिक : ऐन सणासुदीत वाहतूक ठेकेदाराने साखरेची वाहतूक न केल्यामुळे रेशन दुकानांवर खडखडाट झाल्याने दुकानदार तसेच गोरगरिबांकडून होणारी ओरड लक्षात घेऊन नरक चतुर्दशीच्या दिवशी वाहतूक ठेकेदाराने धावपळ करीत शहरातील दुकानदारांपर्यंत साखर पोहोचती केली. त्यामुळे आता ऐन दिवाळीत दुकानदारांना साखर विक्रीसाठी दुकाने उघडावी लागली आहेत.

लोकमत’चा दणका : गरिबांची दिवाळी गोड

नाशिक : ऐन सणासुदीत वाहतूक ठेकेदाराने साखरेची वाहतूक न केल्यामुळे रेशन दुकानांवर खडखडाट झाल्याने दुकानदार तसेच गोरगरिबांकडून होणारी ओरड लक्षात घेऊन नरक चतुर्दशीच्या दिवशी वाहतूक ठेकेदाराने धावपळ करीत शहरातील दुकानदारांपर्यंत साखर पोहोचती केली. त्यामुळे आता ऐन दिवाळीत दुकानदारांना साखर विक्रीसाठी दुकाने उघडावी लागली आहेत.सरकारने रेशनवरील धान्य व साखरेची थेट दुकानापर्यंत वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केलेली असताना वाहतूक ठेकेदाराने दिवाळीसाठी सरकारने दिलेली साखर पुरविली नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुरवठा खात्याने ठेकेदाराच्या मुसक्या आवळल्याने दोन दिवसात शहरातील २०६ दुकानांना साखरेचा पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा रेशनवरून स्वस्त दरात साखर देण्यासाठी दिले जाणारे अनुदान राज्य सरकारला देणे बंद केल्यामुळे राज्य सरकारने सध्या फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आॅगस्ट महिन्यातच सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी लागणाºया साखरेचा कोटा मंजूर केला. नाशिक जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या एक लाख ७९ हजार ४०८ शिधापत्रिका असून, त्यासाठी शासनाने ५३९२ मेट्रिक टन साखर मंजूर करून जिल्ह्याच्या ताब्यात दिली. सदरची साखर त्या त्या तालुक्यातील शिधापत्रिकेच्या संख्येच्या प्रमाणात तालुक्यांच्या शासकीय गुदामात रवाना करण्यात आली होती. त्यातील सप्टेंबर महिन्यात ठेकेदाराने प्रत्येक रेशन दुकानापर्यंत साखर वाहतूक करून पुरविली असली तरी, आॅक्टोबर महिन्यात मात्र दुकानदारांना साखरेचा पुरवठा केला नाही. वर्षातून एकदाच येणारा दिवाळी सण सुरू होऊनही रेशनवर साखर मिळण्याच्या अपेक्षेवर असलेल्या गोरगरिबांना खुल्या बाजारात ४० रुपये किलो दराने साखर खरेदी करावी लागली. ४ किलो ते ४० किलो साखरसरकारने फक्त अंत्योदय योजनेसाठी पात्र ठरणाºया शिधापत्रिकाधारकांनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुकानदारांना चार किलो ते चाळीस किलोपर्यंत साखरेचे वितरण करण्यात आले.