शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

चौदा वर्षानंतर निफाडला लाल दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:19 IST

नाशिक जिल्हा परिषदेचे बहु प्रतीक्षेत असलेले अध्यक्षपद तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने निफाड तालुक्याला मिळाले. निफाडला अखेर लाल दिवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाला.

ठळक मुद्देबाळासाहेब क्षीरसागर : सोसायटी चेअरमन ते जि.प. अध्यक्ष

बाजीराव कमानकर।सायखेडा : नाशिक जिल्हा परिषदेचे बहु प्रतीक्षेत असलेले अध्यक्षपद तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने निफाड तालुक्याला मिळाले. निफाडला अखेर लाल दिवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाला.द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या शिवडीसारख्या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात १९६५ साली जन्माला आलेले बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर यांचा सामाजिक, राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख असणारे आर,.डी. क्षीरसागर आणि इंदूबाई यांना तीन मुले आणि एक मुलगी. सर्वात मोठे बाळासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण शिवडीच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यांना शिवडी गावाने विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड केली आणि तेथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरवात झाली. नातेगोते असल्याने त्यांची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाली. त्यानंतर तत्कालीन आमदार अनिल कदम यांनी विश्वास दाखवत त्यांना बाजार समितीच्या उपसभापती पदावर बढती दिली. शेतकरी ,मजूर यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी स्वत:ची चांदोरी येथे मुक्ताई को अपरेटिव्ह बँकेची स्थापना केली त्या माध्यमातून लोकसंपर्क वाढत गेला. निफाड येथे लोकनेते आर डि क्षीरसागर सहकारी बँकची सुरवात केली. निफाड शहर जवळ असल्याने त्यांनी मित्रपरिवार जमा केला. उगाव गावात अनेक शाळेतील मित्र, नातेवाईक असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी करावी म्हणून गळ घातली. अनिल कदम यांनी शिवसेनेचे तिकीट देऊन त्यांनी निवडणूक लढविली. अगदी कमी फरकाने त्यांचा विजय झाला असला तरी नशीब बळकट म्हणून की काय त्यांचे जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाली आज पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातील क्षीरसागर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरनिफाड व नाशिक येथे बी कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नोकरीच्या शोध न घेता कुटुंबाच्या समवेत शेती करण्यास सुरूवात केली, शिक्षण झाले असल्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष शेती केली. द्राक्ष पीक हे त्याकाळात खूपच कमी शेतकरी लागवड करत असे, मात्र बाळासाहेबांनी द्राक्ष पिकात भरघोस उत्पादन घेतले आणि त्यामुळे वयाच्या विसाव्या वर्षी द्राक्ष बागायतदार पुणे येथे संचालक मंडळाने सभासद करून घेतले आणि संचालक म्हणून निवड केली. परिसर द्राक्षाचा होत असल्याने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी स्वत:चे कोल्डस्टोरेज उभारले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद