शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चौदा वर्षानंतर निफाडला लाल दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:19 IST

नाशिक जिल्हा परिषदेचे बहु प्रतीक्षेत असलेले अध्यक्षपद तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने निफाड तालुक्याला मिळाले. निफाडला अखेर लाल दिवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाला.

ठळक मुद्देबाळासाहेब क्षीरसागर : सोसायटी चेअरमन ते जि.प. अध्यक्ष

बाजीराव कमानकर।सायखेडा : नाशिक जिल्हा परिषदेचे बहु प्रतीक्षेत असलेले अध्यक्षपद तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने निफाड तालुक्याला मिळाले. निफाडला अखेर लाल दिवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाला.द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या शिवडीसारख्या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात १९६५ साली जन्माला आलेले बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर यांचा सामाजिक, राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख असणारे आर,.डी. क्षीरसागर आणि इंदूबाई यांना तीन मुले आणि एक मुलगी. सर्वात मोठे बाळासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण शिवडीच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यांना शिवडी गावाने विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड केली आणि तेथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरवात झाली. नातेगोते असल्याने त्यांची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाली. त्यानंतर तत्कालीन आमदार अनिल कदम यांनी विश्वास दाखवत त्यांना बाजार समितीच्या उपसभापती पदावर बढती दिली. शेतकरी ,मजूर यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी स्वत:ची चांदोरी येथे मुक्ताई को अपरेटिव्ह बँकेची स्थापना केली त्या माध्यमातून लोकसंपर्क वाढत गेला. निफाड येथे लोकनेते आर डि क्षीरसागर सहकारी बँकची सुरवात केली. निफाड शहर जवळ असल्याने त्यांनी मित्रपरिवार जमा केला. उगाव गावात अनेक शाळेतील मित्र, नातेवाईक असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी करावी म्हणून गळ घातली. अनिल कदम यांनी शिवसेनेचे तिकीट देऊन त्यांनी निवडणूक लढविली. अगदी कमी फरकाने त्यांचा विजय झाला असला तरी नशीब बळकट म्हणून की काय त्यांचे जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाली आज पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातील क्षीरसागर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरनिफाड व नाशिक येथे बी कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नोकरीच्या शोध न घेता कुटुंबाच्या समवेत शेती करण्यास सुरूवात केली, शिक्षण झाले असल्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष शेती केली. द्राक्ष पीक हे त्याकाळात खूपच कमी शेतकरी लागवड करत असे, मात्र बाळासाहेबांनी द्राक्ष पिकात भरघोस उत्पादन घेतले आणि त्यामुळे वयाच्या विसाव्या वर्षी द्राक्ष बागायतदार पुणे येथे संचालक मंडळाने सभासद करून घेतले आणि संचालक म्हणून निवड केली. परिसर द्राक्षाचा होत असल्याने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी स्वत:चे कोल्डस्टोरेज उभारले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद