शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आचारसंहिता २५ नंतरच

By admin | Updated: August 22, 2014 00:30 IST

निवडणूक आचारसंहिता २५ नंतरच

नाशिक : राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता राजकीय व शासकीय पातळीवर व्यक्त करून त्या दृष्टीने पावले टाकली जात असली तरी, विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आयोगाने २५ आॅगस्टपर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन केलेले असल्यामुळे त्यानंतरच आचारसंहिता लागू होण्याची ठाम खात्री निवडणूक शाखेने दिली आहे.विधानसभा निवडणुकीचे पडघम गेल्या महिन्यापासूनच वाजू लागले असून, खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगानेच तसे संकेत देऊन मतदार याद्यांचे पुनरीक्षण (पान ७ वर)व अंतिम मतदार यादी जाहीर करून यंत्रणेला निवडणुकीच्या कामाला लावले आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे दिल्ली येथे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना निवडणूक पद्धती हाताळण्याबाबत अवगत केले असल्याने कोणत्याही क्षणी निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार व लोकप्रतिनिधींनीही त्या अनुषंगाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी चालविली असताना, चालू आठवड्यात आचारसंहिता लागण्याची व्यक्त होणारी शक्यता जवळपास मावळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने २० ते २५ आॅगस्टदरम्यान प्रत्येक विभागीय पातळीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता जारी केल्यास त्याच दिवशी व वेळेस प्रत्येक निवडणूक अधिकारी हा मुख्यालयात हजर असला पाहिजे व त्याने तत्काळ आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली पाहिजे असा निवडणूक आयोगाचा दंडक असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आचारसंहिता जारीच केली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव एस. ए. रुदोला, प्रधान सचिव आशिष चक्रवर्ती, आर. के. श्रीवास्तव व राज्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवार व गुरुवारी पुणे व कोकण या विभागाचे प्रशिक्षण पुण्याच्या यशदा संस्थेत घेण्यात आले. नाशिक व औरंगाबाद या दोन विभागांचे शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस औरंगाबाद येथे प्रशिक्षण असून, रविवार व सोमवारी नागपूर व अमरावती या दोन विभागांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सारेच अधिकारी सोमवारपर्यंत व्यस्त असल्याने तूर्त त्यानंतरच आचारसंहिता जारी होईल, असे ठामपणे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)