शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कपातीनंतर पाणीप्रश्न होणार गंभीर

By admin | Updated: October 6, 2015 23:07 IST

वासननगर : परिसरातील रहिवाशांना चिंंता; तोडगा काढण्याची मागणी

 इंदिरानगर : वासननगर परिसरात सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने संयम सुटलेल्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून पालिकेचे लक्ष वेधून घेतले असले तरी आगामी पाणीकपातीच्या धोरणामुळे येथील पाणीप्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वासननगर येथील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. कमी दाबाने आणि कमीवेळ पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिक सातत्याने पालिकेकडे पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र अद्यापही येथील पाणीप्रश्न सुटलेला नाही. गेल्या सहा वर्षांपासून येथील परिसरात पहाटे दोन ते चार यावेळेत पाणीपुरवठा केला जातो. अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कुटुंबातील महिलावर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. एकवेळ आणि तेही कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. याच कारणास्तव परिसरातील नागरिकांनी महिनाभरापूर्वी मुख्य रस्त्यावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले होते. सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पालिकेने सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अजूनही वासननगर परिसरातील मुरलीधरनगर, गामणेमळा, माउलीनगर, पाणेरी सोसायटी, कैलास रो-हाऊस आदि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, याच काळात परिसरातील पाण्याचा व्हॉल्व्ह कुणीतरी बंद केल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसराला पाणीपुरवठादेखील होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे संतप्त नागरिकांना पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करावे लागले. आंदोलन करूनही पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. आता तर पालिकेने गुरुवारपासून पाणीकपातीची घोषणा केल्यामुळे परिसरात पाण्याची समस्या आणखी गंभीर बनणार आहे. पालिकेकडेच पुरेसे पाणी नसेल तर पाणी मिळणार कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याने एकवेळ का होईना, परंतु पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी नागरिकांनी एकत्र येणे अपेक्षित आहे. (वार्ताहर)