शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कपातीनंतर पाणीप्रश्न होणार गंभीर

By admin | Updated: October 6, 2015 23:07 IST

वासननगर : परिसरातील रहिवाशांना चिंंता; तोडगा काढण्याची मागणी

 इंदिरानगर : वासननगर परिसरात सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने संयम सुटलेल्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून पालिकेचे लक्ष वेधून घेतले असले तरी आगामी पाणीकपातीच्या धोरणामुळे येथील पाणीप्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वासननगर येथील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. कमी दाबाने आणि कमीवेळ पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिक सातत्याने पालिकेकडे पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र अद्यापही येथील पाणीप्रश्न सुटलेला नाही. गेल्या सहा वर्षांपासून येथील परिसरात पहाटे दोन ते चार यावेळेत पाणीपुरवठा केला जातो. अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कुटुंबातील महिलावर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. एकवेळ आणि तेही कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. याच कारणास्तव परिसरातील नागरिकांनी महिनाभरापूर्वी मुख्य रस्त्यावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले होते. सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पालिकेने सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अजूनही वासननगर परिसरातील मुरलीधरनगर, गामणेमळा, माउलीनगर, पाणेरी सोसायटी, कैलास रो-हाऊस आदि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, याच काळात परिसरातील पाण्याचा व्हॉल्व्ह कुणीतरी बंद केल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसराला पाणीपुरवठादेखील होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे संतप्त नागरिकांना पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करावे लागले. आंदोलन करूनही पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. आता तर पालिकेने गुरुवारपासून पाणीकपातीची घोषणा केल्यामुळे परिसरात पाण्याची समस्या आणखी गंभीर बनणार आहे. पालिकेकडेच पुरेसे पाणी नसेल तर पाणी मिळणार कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याने एकवेळ का होईना, परंतु पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी नागरिकांनी एकत्र येणे अपेक्षित आहे. (वार्ताहर)