शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

पंचवटीत ड्रेनेज सफाईनंतर रस्त्यावर गाळ, माती पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:18 IST

परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले ड्रेनेज सफाईचे काम ड्रेनेज विभागाकडून केल्यानंतर त्यामधून काढलेला गाळ व माती तत्काळ उचलून नेणे गरजेचे असताना ड्रेनेज विभागाकडून सदर रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ व माती उचलली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

पंचवटी : परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले ड्रेनेज सफाईचे काम ड्रेनेज विभागाकडून केल्यानंतर त्यामधून काढलेला गाळ व माती तत्काळ उचलून नेणे गरजेचे असताना ड्रेनेज विभागाकडून सदर रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ व माती उचलली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ड्रेनेज सफाई केल्यानंतर गाळ, माती उचलण्याची जबाबदारी ड्रेनेज विभागाची नसल्याचे सांगत टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.पंचवटी परिसरातील अनेक ठिकाणी ड्रेनेज विभागाकडून दैनंदिन रस्त्यालगतच्या गटारी साफ करण्याचे काम केले जाते. गटार साफ केल्यानंतर गटारातील गाळ व माती ढाप्यांच्या बाजूला ठेवली जाते, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागते. तीन ते चार दिवस गाळ व माती रस्त्यावर पडून राहत असल्याने संबंधित विभागाकडे तक्रार केल्यानंतर गाळ, माती उचलून नेण्याची जबाबदारी आमची नाही, दुसऱ्या विभागाची आहे असे सांगत टाळाटाळ केली जाते.ड्रेनेज विभागाकडून ड्रेनेज साफसफाईचे काम केले जात असले तरी त्यामधून काढलेला गाळ, माती उचललाच जात नसल्याचे चित्र वारंवार दिसून येते. पंचवटी ड्रेनेज विभागाचे अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतरदेखील दखल घेतली जात नसल्याची ओरड खुद्द पालिका कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केल्याने ड्रेनेज विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान