शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तिकीट वाटपानंतर कार्यकर्त्यांचंही ठरलंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:31 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठळक मुद्देप्रमुख पक्षांची डोकेदुखी कार्यकर्त्यांची करावी लागणार मनधरणी

नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नाट्यपूर्ण घडामोडीनंतर युती, आघाडीसह वंचित, मनसेने राजकीय गणिते जुळवली असली तरी अपेक्षित मतदारसंघ तसेच उमेदवारही न मिळाल्यामुळे इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त न करता ‘आता आमचंही ठरलंय !’ अशी भूमिका घेतल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असताना त्याचे पडसाददेखील उमटताना दिसत आहेत. मुंबईसह नागपूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी या ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी दर्शविली असताना जिल्ह्यात अद्याप तशी परिस्थिती समोर आलेली नाही. मात्र अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागल्याने अशीच परिस्थिती कायम राहील याची शाश्वती आता तरी देता येणार नाही.जिल्ह्यातून शिवसेना भाजपच्या कोणत्या जागांची अदलाबदली होते याकडे लक्ष असताना अपेक्षित निर्णय न झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे तेथे निर्णय कोणताही झाला तरी पक्षाला अंतर्गत नाराजीला सामोरे जावे लागणार हे जवळपास निश्चितच आहे.उघड नाराजीवर एकवेळ तोडगा काढणे शक्य असले तरी पक्षाच्या अनपेक्षित भूमिकेमुळे धक्का बसलेल्या कार्यकर्त्यांनी ‘आता आमचंही ठरलंय’, असे म्हणत पक्षाला धडा शिकविण्याचे मनसुबे आखल्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांना दुर्लक्षून चालणार नाही.आणखी काही नावांची घोषणा होणार असल्याने पक्षांतर्गत नाराजांमध्ये भर पडते की कार्यकर्त्यांचे समाधान होते यावर नाराजांचा आलेख कमी-अधिक होणारआहे. नाराजी होणार हे गृहीत धरूनच निर्णय घेतले असण्याची शक्यताआहे. त्यामुळे बऱ्यापैकी नाराजांना शांत करण्यास पक्षाला यश आले तर प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी कार्यकर्ते काय ठरवितात, हे पाहणे मतमोजणीतूनच समोर येणार आहे.सर्वत्र नाराजी नाट्याला सुरुवातराजकीय पटलावर सध्या उमेदवारांचीच चर्चा होत असताना दुसरीकडे राज्यात सर्वत्र नाराजी नाट्यालादेखील सुरुवात झालेली आहे. अगदी हक्काच्या मतदारसंघांमध्येदेखील पक्षाला कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास या कार्यकर्त्यांच्या भावनांपेक्षा उमेदवारांच्या नावांकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याने पुढील काही दिवसांत कार्यकर्त्यांची आणि नाराज उमेदवारांची समजूत काढण्यासाठी पक्षांची धावपळ होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक