शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

तिकीट वाटपानंतर कार्यकर्त्यांचंही ठरलंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:31 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठळक मुद्देप्रमुख पक्षांची डोकेदुखी कार्यकर्त्यांची करावी लागणार मनधरणी

नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नाट्यपूर्ण घडामोडीनंतर युती, आघाडीसह वंचित, मनसेने राजकीय गणिते जुळवली असली तरी अपेक्षित मतदारसंघ तसेच उमेदवारही न मिळाल्यामुळे इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त न करता ‘आता आमचंही ठरलंय !’ अशी भूमिका घेतल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असताना त्याचे पडसाददेखील उमटताना दिसत आहेत. मुंबईसह नागपूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी या ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी दर्शविली असताना जिल्ह्यात अद्याप तशी परिस्थिती समोर आलेली नाही. मात्र अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागल्याने अशीच परिस्थिती कायम राहील याची शाश्वती आता तरी देता येणार नाही.जिल्ह्यातून शिवसेना भाजपच्या कोणत्या जागांची अदलाबदली होते याकडे लक्ष असताना अपेक्षित निर्णय न झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे तेथे निर्णय कोणताही झाला तरी पक्षाला अंतर्गत नाराजीला सामोरे जावे लागणार हे जवळपास निश्चितच आहे.उघड नाराजीवर एकवेळ तोडगा काढणे शक्य असले तरी पक्षाच्या अनपेक्षित भूमिकेमुळे धक्का बसलेल्या कार्यकर्त्यांनी ‘आता आमचंही ठरलंय’, असे म्हणत पक्षाला धडा शिकविण्याचे मनसुबे आखल्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांना दुर्लक्षून चालणार नाही.आणखी काही नावांची घोषणा होणार असल्याने पक्षांतर्गत नाराजांमध्ये भर पडते की कार्यकर्त्यांचे समाधान होते यावर नाराजांचा आलेख कमी-अधिक होणारआहे. नाराजी होणार हे गृहीत धरूनच निर्णय घेतले असण्याची शक्यताआहे. त्यामुळे बऱ्यापैकी नाराजांना शांत करण्यास पक्षाला यश आले तर प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी कार्यकर्ते काय ठरवितात, हे पाहणे मतमोजणीतूनच समोर येणार आहे.सर्वत्र नाराजी नाट्याला सुरुवातराजकीय पटलावर सध्या उमेदवारांचीच चर्चा होत असताना दुसरीकडे राज्यात सर्वत्र नाराजी नाट्यालादेखील सुरुवात झालेली आहे. अगदी हक्काच्या मतदारसंघांमध्येदेखील पक्षाला कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास या कार्यकर्त्यांच्या भावनांपेक्षा उमेदवारांच्या नावांकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याने पुढील काही दिवसांत कार्यकर्त्यांची आणि नाराज उमेदवारांची समजूत काढण्यासाठी पक्षांची धावपळ होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक