शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट वाटपानंतर कार्यकर्त्यांचंही ठरलंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:31 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठळक मुद्देप्रमुख पक्षांची डोकेदुखी कार्यकर्त्यांची करावी लागणार मनधरणी

नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नाट्यपूर्ण घडामोडीनंतर युती, आघाडीसह वंचित, मनसेने राजकीय गणिते जुळवली असली तरी अपेक्षित मतदारसंघ तसेच उमेदवारही न मिळाल्यामुळे इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त न करता ‘आता आमचंही ठरलंय !’ अशी भूमिका घेतल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असताना त्याचे पडसाददेखील उमटताना दिसत आहेत. मुंबईसह नागपूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी या ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी दर्शविली असताना जिल्ह्यात अद्याप तशी परिस्थिती समोर आलेली नाही. मात्र अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागल्याने अशीच परिस्थिती कायम राहील याची शाश्वती आता तरी देता येणार नाही.जिल्ह्यातून शिवसेना भाजपच्या कोणत्या जागांची अदलाबदली होते याकडे लक्ष असताना अपेक्षित निर्णय न झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे तेथे निर्णय कोणताही झाला तरी पक्षाला अंतर्गत नाराजीला सामोरे जावे लागणार हे जवळपास निश्चितच आहे.उघड नाराजीवर एकवेळ तोडगा काढणे शक्य असले तरी पक्षाच्या अनपेक्षित भूमिकेमुळे धक्का बसलेल्या कार्यकर्त्यांनी ‘आता आमचंही ठरलंय’, असे म्हणत पक्षाला धडा शिकविण्याचे मनसुबे आखल्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांना दुर्लक्षून चालणार नाही.आणखी काही नावांची घोषणा होणार असल्याने पक्षांतर्गत नाराजांमध्ये भर पडते की कार्यकर्त्यांचे समाधान होते यावर नाराजांचा आलेख कमी-अधिक होणारआहे. नाराजी होणार हे गृहीत धरूनच निर्णय घेतले असण्याची शक्यताआहे. त्यामुळे बऱ्यापैकी नाराजांना शांत करण्यास पक्षाला यश आले तर प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी कार्यकर्ते काय ठरवितात, हे पाहणे मतमोजणीतूनच समोर येणार आहे.सर्वत्र नाराजी नाट्याला सुरुवातराजकीय पटलावर सध्या उमेदवारांचीच चर्चा होत असताना दुसरीकडे राज्यात सर्वत्र नाराजी नाट्यालादेखील सुरुवात झालेली आहे. अगदी हक्काच्या मतदारसंघांमध्येदेखील पक्षाला कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास या कार्यकर्त्यांच्या भावनांपेक्षा उमेदवारांच्या नावांकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याने पुढील काही दिवसांत कार्यकर्त्यांची आणि नाराज उमेदवारांची समजूत काढण्यासाठी पक्षांची धावपळ होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक