शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

अखेर पुनेगावचे पाणी पोहचले दरसवाडी धरणात

By admin | Updated: September 5, 2016 23:12 IST

४० वर्षांची प्रतीक्षा संपली : येवलेकरांच्या पाणी चाचणीच्या आशा धूसर

गोरख घुसळे ल्ल पाटोदावेळ : दुपारी ४ वाजेची.स्थळ : दरसवाडी कालवागेल्या ४० वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व चांदवड व येवला तालुक्याला नवसंजीवनी ठरणाऱ्या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यास चाचणीसाठी सोडण्यात आलेले पाणी सोमवारी तब्बल अकरा दिवसांनी दुपारी चार वाजता ६१.७०५ किलोमीटर परसूल जवळील नदीपात्रातून दरसवाडी धरणात पोहचल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात असुन शेतकर्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, दरसवाडी धरण ९० टक्के भरले तरच पुढे येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत ४२ किलोमीटर या डोंगरगाव पोहोच कालव्यास चाचणीसाठी पाणी सुटू शकते अशी चर्चा असल्याने येवला तालुक्यातील बाळापुरपर्यंत पाणी चाचणी होते की नाही याबाबत शंका निर्माण झाली असल्याने येवलेकरांच्या चाचणीसाठी पाणी पोहोचण्याच्या आशा धूसर झाली आहे.यावर्षी जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले असल्याने व वाया जाणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चाचणी घ्यावी अशी मागणी कडवा कालवा विभागाकडे येवला तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी केली होती. मात्र या मागणीला संबधित विभागाने केराची टोपली दाखविल्याने शेलार व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी २३ आॅगस्ट पासून कातरणी येथील कालव्यावरच उपोषण सुरु केले होते. जोपर्यंत ओव्हरफ्लोच्या पाण्याने या कालव्याच्या चाचणीसाठी पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेऊन उपोषण तीव्र केल्याने काही उपोषणार्थीची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर काहींनी जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपचार करून घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती जास्तच खालावली होती.तिसऱ्या दिवशी कडवा कालवा विभागाचे अभियंता टाटीया यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून चाचणीसाठी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषणार्थीनी आपले आंदोलन मागे घेतले. आश्वासनाप्रमाणे दि. २६ आॅगस्ट रोजी पुणेगाव धरणातून या कालव्यास चाचणीसाठी सुमारे १०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. मात्र या कालव्याची ही पहिलीच चाचणी असल्यामुळे पाणी गळती मोठया प्रमाणात होत असल्याने व कालवा परिसरात मोठया प्रमाणात पाणी चोरीही होत असल्याने पाण्याचा प्रवाह संथ व कमी वाहत असल्याने पाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता व चाचणी पूर्ण होते की नाही याबाबत शंका होती. गेल्या अकरा दिवसांपासून विविध अडथळ्यांंची शर्यत पार करीत पाण्याचा प्रवाह आज दरसवाडी धरणाजवळील परसूल गावच्या नदीतून प्रवाहित होऊन दरसवाडी धरणात पोहोचल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असुन अनेक शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.