शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अखेर पुनेगावचे पाणी पोहचले दरसवाडी धरणात

By admin | Updated: September 5, 2016 23:12 IST

४० वर्षांची प्रतीक्षा संपली : येवलेकरांच्या पाणी चाचणीच्या आशा धूसर

गोरख घुसळे ल्ल पाटोदावेळ : दुपारी ४ वाजेची.स्थळ : दरसवाडी कालवागेल्या ४० वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व चांदवड व येवला तालुक्याला नवसंजीवनी ठरणाऱ्या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यास चाचणीसाठी सोडण्यात आलेले पाणी सोमवारी तब्बल अकरा दिवसांनी दुपारी चार वाजता ६१.७०५ किलोमीटर परसूल जवळील नदीपात्रातून दरसवाडी धरणात पोहचल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात असुन शेतकर्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, दरसवाडी धरण ९० टक्के भरले तरच पुढे येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत ४२ किलोमीटर या डोंगरगाव पोहोच कालव्यास चाचणीसाठी पाणी सुटू शकते अशी चर्चा असल्याने येवला तालुक्यातील बाळापुरपर्यंत पाणी चाचणी होते की नाही याबाबत शंका निर्माण झाली असल्याने येवलेकरांच्या चाचणीसाठी पाणी पोहोचण्याच्या आशा धूसर झाली आहे.यावर्षी जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले असल्याने व वाया जाणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चाचणी घ्यावी अशी मागणी कडवा कालवा विभागाकडे येवला तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी केली होती. मात्र या मागणीला संबधित विभागाने केराची टोपली दाखविल्याने शेलार व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी २३ आॅगस्ट पासून कातरणी येथील कालव्यावरच उपोषण सुरु केले होते. जोपर्यंत ओव्हरफ्लोच्या पाण्याने या कालव्याच्या चाचणीसाठी पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेऊन उपोषण तीव्र केल्याने काही उपोषणार्थीची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर काहींनी जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपचार करून घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती जास्तच खालावली होती.तिसऱ्या दिवशी कडवा कालवा विभागाचे अभियंता टाटीया यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून चाचणीसाठी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषणार्थीनी आपले आंदोलन मागे घेतले. आश्वासनाप्रमाणे दि. २६ आॅगस्ट रोजी पुणेगाव धरणातून या कालव्यास चाचणीसाठी सुमारे १०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. मात्र या कालव्याची ही पहिलीच चाचणी असल्यामुळे पाणी गळती मोठया प्रमाणात होत असल्याने व कालवा परिसरात मोठया प्रमाणात पाणी चोरीही होत असल्याने पाण्याचा प्रवाह संथ व कमी वाहत असल्याने पाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता व चाचणी पूर्ण होते की नाही याबाबत शंका होती. गेल्या अकरा दिवसांपासून विविध अडथळ्यांंची शर्यत पार करीत पाण्याचा प्रवाह आज दरसवाडी धरणाजवळील परसूल गावच्या नदीतून प्रवाहित होऊन दरसवाडी धरणात पोहोचल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असुन अनेक शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.