शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

१९ वर्षांनंतर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 01:40 IST

राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता.

नाशिक : राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता. त्यानंतर मात्र १९ वर्षे एकच मंत्रिपद जिल्ह्याला मिळाले. आता मात्र छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ दादा भुसे यांच्या समावेशामुळे दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाल्याने जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.नाशिक जिल्ह्णाला ८० च्या दशकांपर्यंत राज्य मंत्रिमंडळात एकच कॅबिनेट मंत्रिपद सातत्याने दिले गेले. स्व. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे यांच्या पाठोपाठ बळीराम हिरे व पुष्पाताई हिरे यांच्याकडे शिक्षण, आरोग्य, ऊर्जा अशी महत्त्वाची खाती सोपविण्यात आली. त्यातून नाशिक जिल्ह्णाच्या विकासाला हातभार लागला. मात्र १९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याला मंत्रिपदांची मोठी लॉटरी लागली. डॉ. दौलतराव आहेर यांना राज्याचे आरोग्य हाताळण्याची संधी मिळाली तर सेनेचे बबनराव घोलप यांना समाजकल्यामंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. याच काळात ए. टी. पवार व तुकाराम दिघोळे यांना काही काळापर्यंत राज्यमंत्रिपदी नेमण्यात आले. याचदरम्यान प्रशांत हिरे यांनादेखील राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर मात्र छगन भुजबळ यांच्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद नाशिक जिल्ह्णाला लाभले. आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्णातून छगन भुजबळ यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद दहा वर्षे होते. त्यानंतर २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात ‘युती’चे आठ आमदार असूनही दादा भुसे यांना एकमेव राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मात्र अगोदर छगन भुजबळ व सोमवारी दादा भुसे यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तब्बल १९ वर्षांनंतर जिल्ह्णाच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. आता या दोघांकडे कोणती खाती सोपविली जातात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. मात्र कोणतेही खाते मिळाले तरी, या दोघांचा जिल्ह्णाच्या विकासासाठी फायदाच होणार आहे.राष्टवादीत नाराजीचा सूरसोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाशिक जिल्ह्याच्या व विशेषकरून राष्टÑवादीच्या कोट्यातून एखादे राज्यमंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याने सहा आमदार निवडून पाठविले असल्यामुळे नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर या दोघांपैकी एकाची राज्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, तर कॉँगे्रसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांनाही राज्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. राष्टवादीच्या एकाही आमदाराला संधी मिळालेली नाही. त्यामुळे राष्टवादीत नाराजीचा सूर आळवला जात आहे.

 

 

 

 

टॅग्स :ministerमंत्रीGovernmentसरकारNashikनाशिक