शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

६४ दिवसांनंतर आज सायंकाळी प्रचार थांबणार; मतदानाला अवघे दोन दिवस

By संकेत शुक्ला | Updated: May 18, 2024 09:18 IST

सायंकाळी ६ वाजेपर्यंतच प्रचार करण्याची मुभा, पाचव्या टप्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. दि. २० मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे.

संकेत शुक्लनाशिक : महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील रणधुमाळी शिगेला पोहोचली असून नाशिकसह राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये प्रचाराची आज सांगता होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून ६४ दिवसांमध्ये होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांना त्यामुळे पुर्णविराम लाभणार आहे. देशभरातील पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा सायंकाळी ६ वाजता थांबणार असल्याने सर्वच उमेदवारांकडून शनिवारी (दि. १८) शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

पाचव्या टप्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. दि. २० मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या सहभागाने तापलेल्या वातावरणाचा उदया होणाऱ्या शक्तीप्रदर्शनाने सागता होणार आहे. काही पक्षांच्यावतीने रॅली काढली जाण्याची शक्यता असून त्यामुळेही जिल्ह्यातील वातावरण दुपारपर्यंत तापणार आहे. यंदा महायुती आणि महा आघाडी यांच्यात थेट लढत होत असल्याने देशपातळीवरच्या नेत्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावत राजकीय वातावरण अधिक तापवले. नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारीच्या नावावर एकमत होत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत येथे संदिग्धता पहावयास मिळाली. त्यातच कांद्यासारख्या प्रश्नाने नाशिकध्ये डोके वर काढल्याने त्याचाही परिणाम येथील प्रचारात दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासह मोठ्या नेत्यांनी नाशिकमधील सभांचे मैदान गाजवले.

जवळपास सर्वच सभा सूरळीत पार पडत असताना पिंपळगाव येथे पंतप्रधानांच्या सभेत एका कार्यकर्त्याने केलेला गोंधळ लक्षवेधी ठरला. नाशिक आणि दिंडोरीची जागा प्रतिष्ठेची करण्यात आल्याने अनेक मोठ्या नेत्यांनी येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तळ ठोकला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर नाशिकचा तब्बल चार वेळा दौरा केला.इन्फो...

साधु संतांचा पुढाकार चर्चेत

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथेही अनेक साधु महंत पिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील काहींनी माघार घेतली तर काही जण शेवटपर्यंत लढण्याच्या पावित्र्यात असल्याने नाशिक मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले होते.

ही आहेत बंधने...

लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२६ अन्वये सार्वजनिक सभा घेण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही सार्वजनिक सभा किंवा मिरवणूक आयोजित करता येत नाही, उपस्थित राहता येत नाही, सहभागी होता येत नाही किंवा संबोधित करता येत नाही. सिनेमॅटोग्राफ, टेलिव्हिजन किंवा इतर तत्सम उपकरणांद्वारे कोणत्याही निवडणुकीची बाब प्रदर्शित करता येत नाही. कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास बंदी असल्याने त्याचे उल्लंघन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.

टॅग्स :nashik-pcनाशिक