शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

३१ वर्षांनंतर जेलरोडचा पूल बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 01:10 IST

नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच नासर्डीच्या पुरामुळे आगरटाकळी, विहितगावचा रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. सायंकाळनंतर पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.

ठळक मुद्दे पोलिसांनी पुलाच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारून पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद केला.

नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच नासर्डीच्या पुरामुळे आगरटाकळी, विहितगावचा रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. सायंकाळनंतर पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.गोदावरीच्या पुरामुळे जेलरोड, दसक येथे १९८८ मध्ये बांधण्यात आलेल्या संत जनार्दन स्वामी पुलावरून ३१ वर्षांत पहिल्यांदाच रविवारी दुपारी पुराचे पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारून पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. यामुळे नाशिकरोड जेलरोडवरून नांदूर नाका व औरंगाबाद महामार्गावर येणारी, जाणारी वाहतूक बंद झाली होती. यापूर्वी सप्टेंबर २००८ मध्ये पावसाच्या पुराचे पाणी फुलाच्या खालील बाजूस लागल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पहिल्यांदाच ३१ वर्षांत संत जनार्दन स्वामी पुलावरून पावसाच्या पुराचे पाणी वाहून जात असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. महापुरामुळे दसक स्मशानभूमी शेड, नदीपात्रातील उभी मारुतीची मूर्ती पुराच्या पाण्याखाली गेली. याचबरोबर आगर टाकळी येथील नासर्डी-गोदावरी नदी संगम पूल व आगर टाकळी समर्थ रामदास स्वामी मठाजवळील नासर्डी नदीवरील पूलदेखील पुराच्या पाण्याखाली गेला होता. तसेच वालदेवी नदीला महापूर आल्याने देवळालीगाव-रोकडोबा वाडी पुलावरून विहितगावला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. याशिवाय नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी येथील ब्रिटिशकालीन दारणा नदी पुलाला पुराचे पाणी लागल्याने सकाळपासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नवीन चौपदरी मार्गावरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. गोदावरी, वालदेवी, नासर्डी, नंदिनी, दारणा या नद्यांना महापूर आल्याने नाशिकरोड व परिसरातील गावांतील नदीकाठावरील स्मशानभूमी, दशक्रिया विधी शेड पुराच्या पाण्याखाली गेले होते. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान गोदावरी, वालदेवी, दारणा आदी नद्या-नाल्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूरजन्य परिस्थितीमुळे देवळालीगाव, वडारवाडी, साठेनगर, रोकडोबावाडी, जेलरोड, दसक व टाकळीगाव येथील आदिवासी वाडा येथील नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.