शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

३१ वर्षांनंतर जेलरोडचा पूल बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 01:10 IST

नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच नासर्डीच्या पुरामुळे आगरटाकळी, विहितगावचा रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. सायंकाळनंतर पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.

ठळक मुद्दे पोलिसांनी पुलाच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारून पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद केला.

नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच नासर्डीच्या पुरामुळे आगरटाकळी, विहितगावचा रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. सायंकाळनंतर पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.गोदावरीच्या पुरामुळे जेलरोड, दसक येथे १९८८ मध्ये बांधण्यात आलेल्या संत जनार्दन स्वामी पुलावरून ३१ वर्षांत पहिल्यांदाच रविवारी दुपारी पुराचे पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारून पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. यामुळे नाशिकरोड जेलरोडवरून नांदूर नाका व औरंगाबाद महामार्गावर येणारी, जाणारी वाहतूक बंद झाली होती. यापूर्वी सप्टेंबर २००८ मध्ये पावसाच्या पुराचे पाणी फुलाच्या खालील बाजूस लागल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पहिल्यांदाच ३१ वर्षांत संत जनार्दन स्वामी पुलावरून पावसाच्या पुराचे पाणी वाहून जात असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. महापुरामुळे दसक स्मशानभूमी शेड, नदीपात्रातील उभी मारुतीची मूर्ती पुराच्या पाण्याखाली गेली. याचबरोबर आगर टाकळी येथील नासर्डी-गोदावरी नदी संगम पूल व आगर टाकळी समर्थ रामदास स्वामी मठाजवळील नासर्डी नदीवरील पूलदेखील पुराच्या पाण्याखाली गेला होता. तसेच वालदेवी नदीला महापूर आल्याने देवळालीगाव-रोकडोबा वाडी पुलावरून विहितगावला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. याशिवाय नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी येथील ब्रिटिशकालीन दारणा नदी पुलाला पुराचे पाणी लागल्याने सकाळपासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नवीन चौपदरी मार्गावरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. गोदावरी, वालदेवी, नासर्डी, नंदिनी, दारणा या नद्यांना महापूर आल्याने नाशिकरोड व परिसरातील गावांतील नदीकाठावरील स्मशानभूमी, दशक्रिया विधी शेड पुराच्या पाण्याखाली गेले होते. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान गोदावरी, वालदेवी, दारणा आदी नद्या-नाल्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूरजन्य परिस्थितीमुळे देवळालीगाव, वडारवाडी, साठेनगर, रोकडोबावाडी, जेलरोड, दसक व टाकळीगाव येथील आदिवासी वाडा येथील नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.