शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

३१ वर्षांनंतर जेलरोडचा पूल बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 01:10 IST

नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच नासर्डीच्या पुरामुळे आगरटाकळी, विहितगावचा रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. सायंकाळनंतर पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.

ठळक मुद्दे पोलिसांनी पुलाच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारून पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद केला.

नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच नासर्डीच्या पुरामुळे आगरटाकळी, विहितगावचा रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. सायंकाळनंतर पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.गोदावरीच्या पुरामुळे जेलरोड, दसक येथे १९८८ मध्ये बांधण्यात आलेल्या संत जनार्दन स्वामी पुलावरून ३१ वर्षांत पहिल्यांदाच रविवारी दुपारी पुराचे पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारून पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. यामुळे नाशिकरोड जेलरोडवरून नांदूर नाका व औरंगाबाद महामार्गावर येणारी, जाणारी वाहतूक बंद झाली होती. यापूर्वी सप्टेंबर २००८ मध्ये पावसाच्या पुराचे पाणी फुलाच्या खालील बाजूस लागल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पहिल्यांदाच ३१ वर्षांत संत जनार्दन स्वामी पुलावरून पावसाच्या पुराचे पाणी वाहून जात असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. महापुरामुळे दसक स्मशानभूमी शेड, नदीपात्रातील उभी मारुतीची मूर्ती पुराच्या पाण्याखाली गेली. याचबरोबर आगर टाकळी येथील नासर्डी-गोदावरी नदी संगम पूल व आगर टाकळी समर्थ रामदास स्वामी मठाजवळील नासर्डी नदीवरील पूलदेखील पुराच्या पाण्याखाली गेला होता. तसेच वालदेवी नदीला महापूर आल्याने देवळालीगाव-रोकडोबा वाडी पुलावरून विहितगावला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. याशिवाय नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी येथील ब्रिटिशकालीन दारणा नदी पुलाला पुराचे पाणी लागल्याने सकाळपासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नवीन चौपदरी मार्गावरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. गोदावरी, वालदेवी, नासर्डी, नंदिनी, दारणा या नद्यांना महापूर आल्याने नाशिकरोड व परिसरातील गावांतील नदीकाठावरील स्मशानभूमी, दशक्रिया विधी शेड पुराच्या पाण्याखाली गेले होते. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान गोदावरी, वालदेवी, दारणा आदी नद्या-नाल्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूरजन्य परिस्थितीमुळे देवळालीगाव, वडारवाडी, साठेनगर, रोकडोबावाडी, जेलरोड, दसक व टाकळीगाव येथील आदिवासी वाडा येथील नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.