शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

४६ दिवसांनी केंद्रीय मंत्री भारती पवार परतल्या कर्मभूमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 22:59 IST

कळवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच कळवण तालुक्यात दाखल झालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. भारती पवार यांना गहिवरून आले. हा स्वागत सोहळा बघण्यासाठी आज स्व. ए. टी. पवार आज आपल्यात हवे होते, असे भावोद्गार काढताना त्यांना अश्रू अनावर झाले.

ठळक मुद्देकळवणला जोरदार स्वागत : श्वसुर ए.टी.पवार यांच्या स्मृती तरळल्या

कळवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच कळवण तालुक्यात दाखल झालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. भारती पवार यांना गहिवरून आले. हा स्वागत सोहळा बघण्यासाठी आज स्व. ए. टी. पवार आज आपल्यात हवे होते, असे भावोद्गार काढताना त्यांना अश्रू अनावर झाले.पालघर ते नंदुरबार जनआशीर्वाद यात्रा आटोपून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या कळवण तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले की, केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या संकटात मोठे काम उभे केले असून, देशातील ५५ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे. असे काम करणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. तसेच सामान्य महिलांना उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून न्याय दिला आहे तसेच शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना लागू केली आहे. कष्टकरी, शेतकरी, कामगार यांचेही प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यासारख्या आदिवासी समाजातील अनेक कार्यकर्त्यांना संधी दिल्याचेही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते सुधाकर पगार हे होते. यावेळी कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पवार यांचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, महिला अध्यक्ष सोनाली जाधव, गोविंद कोठावदे, विकास देशमुख, सचिन सोनवणे, दीपक वेढणे, सतीश पगार, हितेंद्र पगार, प्रवीण रौंदळ व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक विकास देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. किशोर पगार यांनी केले.सप्तशृंगी देवीचरणी नतमस्तकमंत्रिपद मिळाल्यानंतर डॉ. भारती पवार या पहिल्यांदाच कळवण तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. आपल्या मायभूमीत सत्कार स्वीकारत त्यांनी सप्तशृंगी देवीच्या गडावर जाऊन पहिल्या पायरीचे दर्शन घेतले. कोरोनापासून संपूर्ण देशाला मुक्ती मिळू दे, असे साकडे यावेळी त्यांनी सप्तशृंगी देवीला घातले. दरम्यान, मतदारसंघाच्याही विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण