शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

तब्बल २३ दिवसांनी बळींची संख्या पुन्हा दुहेरी आकड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर शनिवारी (दि. ०३) कोरोना बळींच्या दिवसभरातील बळींच्या संख्येतही अचानकपणे वाढ ...

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर शनिवारी (दि. ०३) कोरोना बळींच्या दिवसभरातील बळींच्या संख्येतही अचानकपणे वाढ दिसून आली असून तब्बल २३ दिवसांनंतर बळींचा आकडा पुन्हा दुहेरी आकड्यात पोहोचला आहे. शनिवारी गेलेल्या १३ बळींमुळे आतापर्यंत गेलेल्या बळींची संख्या ८,३७१ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात शनिवारी २३१ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून, ३४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. शनिवारी गेलेल्या १३ बळींमध्ये नाशिक ग्रामीणच्या तब्बल १२ बळींचा समावेश असून, एक बळी नाशिक मनपा क्षेत्रातील गेला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा बहर ओसरू लागल्यापासून एका दिवसात केवळ १२ जूनला २७ बळींची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने सर्व बळी एक अंकी आकड्यात असून थेट शनिवारीच हा आकडा दुहेरी आकड्यात पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा नाशिकमध्ये कोरोना रुग्ण आणि बळी वाढण्यास प्रारंभ झाला की काय, अशा चर्चेला प्रारंभ झाला आहे. दरम्यान शनिवारी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या काहीशी अधिक असल्याने उपचारार्थी रुग्णांची संख्या २,२७३ पर्यंत खाली आली आहे. तर प्रलंबित अहवालांची संख्यादेखील हजारपेक्षा कमी होऊन ९४७ वर आली आहे, तर जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णसंख्येचा दर ९७.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.