शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बाधित कुटुंबीयांना मिळणार १२०० क्विंटल धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:48 IST

पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे.

नाशिक : पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे. तालुकास्तरावर उपलब्ध बाधित कुटुंबीयांच्या यादीनुसार संबंधितांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ हे रास्तभाव दुकानदारांमार्फत वितरित केले जाणार आहे.गेल्या शनिवारपासून चार दिवस जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये निफाडसह मालेगाव आणि नाशिक तालुक्यातील सुमारे ६१९० कुटुंबे बाधित झाली आहेत. या तीनही तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत बाधीत कुटुंबीयांची संख्या सहा हजार इतकी असून, नाशिक तालुक्यात सर्वाधिक बाधित कुटुंबीय आढळले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांची घरे पाण्यात असल्यामुळे अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संसार अद्यापही सावरले नसल्यामुळे त्यांच्या पोटापाण्यासाठी या कुटुंबांना धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत होती. या संदर्भातील नाशिक, निफाड आणि मालेगाव तहसीलदारांनी मागणी नोंदविली त्यानुसार पुरवठा विभागाने धान्याचा साठा मंजूर केलेला आहे. तालुका पातळीवरील यंत्रणेने केलेल्या पाहणीत नाशिक तालुक्यात पुराचे पाणी आणि अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबीयांची संख्या ३,३७६ इतकी असून निफाडला २,७७४ आणि मालेगावात ४० इतकी बाधित कुटुंबीयांची संख्या आहे. या तीनही तालुक्यांतील ६,१९० कुटुंबीयांना ६१९ क्विंटल गहू आणि ६१९ क्विंटल मंजूर करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने या संदर्भातील धान्य उपलब्ध करून देताना नियमित धान्य वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या बाधित कुटुंबीयांच्या संख्येनुसार प्रतिकुटुंब दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. नाशिक तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा मोठा भाग हा शहराचा आहे, तर अन्य तालुक्यांमध्ये ग्रामीण भाग समाविष्ट आहे. नाशिक तालुक्यातील ३,३७६ बाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे ३३,७६० किलो गहू, तर ३३,७६० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे. निफाडसाठी २७,७४० गहू तर २७,७४० किलो तांदूळ, तसेच मालेगावमधील बाधीत कुटुंबीयांना ४०० किलो गहू आणि ४०० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे.आणखी मागणी येण्याची शक्यताबाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ दिला जाणार असून, सध्या तीन तालुक्यांतील बाधित कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पावसाची आणि पुराची एकूणच परिस्थिती पाहता कळवण, पेठ, बागलाण, सुरगाणा तालुक्यातूनदेखील मागणी होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत तालुकास्तरीय गुदामातील शिल्लक धान्यातून बाधितांना कुटुंबीयांना धान्य दिले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारfloodपूर