शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

बाधित कुटुंबीयांना मिळणार १२०० क्विंटल धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:48 IST

पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे.

नाशिक : पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे. तालुकास्तरावर उपलब्ध बाधित कुटुंबीयांच्या यादीनुसार संबंधितांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ हे रास्तभाव दुकानदारांमार्फत वितरित केले जाणार आहे.गेल्या शनिवारपासून चार दिवस जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये निफाडसह मालेगाव आणि नाशिक तालुक्यातील सुमारे ६१९० कुटुंबे बाधित झाली आहेत. या तीनही तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत बाधीत कुटुंबीयांची संख्या सहा हजार इतकी असून, नाशिक तालुक्यात सर्वाधिक बाधित कुटुंबीय आढळले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांची घरे पाण्यात असल्यामुळे अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संसार अद्यापही सावरले नसल्यामुळे त्यांच्या पोटापाण्यासाठी या कुटुंबांना धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत होती. या संदर्भातील नाशिक, निफाड आणि मालेगाव तहसीलदारांनी मागणी नोंदविली त्यानुसार पुरवठा विभागाने धान्याचा साठा मंजूर केलेला आहे. तालुका पातळीवरील यंत्रणेने केलेल्या पाहणीत नाशिक तालुक्यात पुराचे पाणी आणि अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबीयांची संख्या ३,३७६ इतकी असून निफाडला २,७७४ आणि मालेगावात ४० इतकी बाधित कुटुंबीयांची संख्या आहे. या तीनही तालुक्यांतील ६,१९० कुटुंबीयांना ६१९ क्विंटल गहू आणि ६१९ क्विंटल मंजूर करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने या संदर्भातील धान्य उपलब्ध करून देताना नियमित धान्य वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या बाधित कुटुंबीयांच्या संख्येनुसार प्रतिकुटुंब दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. नाशिक तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा मोठा भाग हा शहराचा आहे, तर अन्य तालुक्यांमध्ये ग्रामीण भाग समाविष्ट आहे. नाशिक तालुक्यातील ३,३७६ बाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे ३३,७६० किलो गहू, तर ३३,७६० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे. निफाडसाठी २७,७४० गहू तर २७,७४० किलो तांदूळ, तसेच मालेगावमधील बाधीत कुटुंबीयांना ४०० किलो गहू आणि ४०० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे.आणखी मागणी येण्याची शक्यताबाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ दिला जाणार असून, सध्या तीन तालुक्यांतील बाधित कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पावसाची आणि पुराची एकूणच परिस्थिती पाहता कळवण, पेठ, बागलाण, सुरगाणा तालुक्यातूनदेखील मागणी होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत तालुकास्तरीय गुदामातील शिल्लक धान्यातून बाधितांना कुटुंबीयांना धान्य दिले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारfloodपूर