शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

बाधित कुटुंबीयांना मिळणार १२०० क्विंटल धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:48 IST

पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे.

नाशिक : पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे. तालुकास्तरावर उपलब्ध बाधित कुटुंबीयांच्या यादीनुसार संबंधितांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ हे रास्तभाव दुकानदारांमार्फत वितरित केले जाणार आहे.गेल्या शनिवारपासून चार दिवस जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये निफाडसह मालेगाव आणि नाशिक तालुक्यातील सुमारे ६१९० कुटुंबे बाधित झाली आहेत. या तीनही तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत बाधीत कुटुंबीयांची संख्या सहा हजार इतकी असून, नाशिक तालुक्यात सर्वाधिक बाधित कुटुंबीय आढळले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांची घरे पाण्यात असल्यामुळे अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संसार अद्यापही सावरले नसल्यामुळे त्यांच्या पोटापाण्यासाठी या कुटुंबांना धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत होती. या संदर्भातील नाशिक, निफाड आणि मालेगाव तहसीलदारांनी मागणी नोंदविली त्यानुसार पुरवठा विभागाने धान्याचा साठा मंजूर केलेला आहे. तालुका पातळीवरील यंत्रणेने केलेल्या पाहणीत नाशिक तालुक्यात पुराचे पाणी आणि अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबीयांची संख्या ३,३७६ इतकी असून निफाडला २,७७४ आणि मालेगावात ४० इतकी बाधित कुटुंबीयांची संख्या आहे. या तीनही तालुक्यांतील ६,१९० कुटुंबीयांना ६१९ क्विंटल गहू आणि ६१९ क्विंटल मंजूर करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने या संदर्भातील धान्य उपलब्ध करून देताना नियमित धान्य वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या बाधित कुटुंबीयांच्या संख्येनुसार प्रतिकुटुंब दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. नाशिक तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा मोठा भाग हा शहराचा आहे, तर अन्य तालुक्यांमध्ये ग्रामीण भाग समाविष्ट आहे. नाशिक तालुक्यातील ३,३७६ बाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे ३३,७६० किलो गहू, तर ३३,७६० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे. निफाडसाठी २७,७४० गहू तर २७,७४० किलो तांदूळ, तसेच मालेगावमधील बाधीत कुटुंबीयांना ४०० किलो गहू आणि ४०० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे.आणखी मागणी येण्याची शक्यताबाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ दिला जाणार असून, सध्या तीन तालुक्यांतील बाधित कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पावसाची आणि पुराची एकूणच परिस्थिती पाहता कळवण, पेठ, बागलाण, सुरगाणा तालुक्यातूनदेखील मागणी होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत तालुकास्तरीय गुदामातील शिल्लक धान्यातून बाधितांना कुटुंबीयांना धान्य दिले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारfloodपूर