शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:27 IST

नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडत आहे.या धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.अपुऱ्या पाण्यावर पिकविलेल्या पिकांची अवस्था धुक्याने केला कहर... अण् शेतीचा गेला बहर अशी अवस्था सध्या नायगाव खो-यातील शेतक-यांची झाली आहे.

ठळक मुद्देऐन बहरात आलेले पीक विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतातच सडु लागले आहे.

नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडत आहे.या धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.अपुऱ्या पाण्यावर पिकविलेल्या पिकांची अवस्था धुक्याने केला कहर... अण् शेतीचा गेला बहर अशी अवस्था सध्या नायगाव खो-यातील शेतक-यांची झाली आहे.संपूर्ण पावसाळा संपत आला तरी नायगाव खो-यात अजून एकही जोरदार पाऊस पडला नाही.परिणामी खो-यातील सर्वच बांधारे व नदी-नाले आजही कोरडेठाक आहे.अशा परस्थितीत शेतक-यांनी कमी पाण्यावर थोड्याच क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली आहे.हे पीक रिमझिम पावसावर व महागडी खते,बियाणे तसेच किटकनाशके मारून आजपर्यंत तग धरून आहे.सध्या हे सर्वच पीक ऐन बहरात आले आहे.मात्र गेल्या तीनचार दिवसांपासून नायगाव खो-यात धुक्याने कहर केला आहे.त्यामुळे ऐन बहरात आलेले पीक विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतातच सडु लागले आहे.सध्या पडत असलेल्या धुक्यामुळे खरिपाच्या पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.त्यात या पिकांवर करपा,पिवळ तसेच काढणीला आलेल्या पिकांवर डाग पडण्याचे प्रमाण वाढले आहे.विशेषतः रब्बीच्या कांदा रोपांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहे.चौकट - गेल्या चार दिवसांपासून दररोज येणाऱ्या धुक्यामुळे परिसरातील कोबी,फ्लावर,टमाटे,मिरची आदीसह विविध भाज्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.दररोज येणाऱ्या धुक्यामुळे पिकांवर होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना महाड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहे.चौकट - यंदा कोरोनामुळे निर्माण झालेल्या लाँकडावून च्या भीतीने शेतक-यांनी कमी प्रमाणात भाजीपाला केला.परिणामी भाज्यांचे बाजारभाव कडाडले.कधी नव्हे यंदा शेतकऱ्यांना दोन पैसे कमवण्याची वेळ आली होती.मात्र या दररोज येणाऱ्या धुक्याच्या कहरामुळे हा भाजीपाला शेतातच सडु लागला आहे.हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.फोटो ओळी - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या चार दिवसांपासून अशा प्रकारे दाट धुके पडत आहे.या सतच्या धुईमुळे खरिपा बरोबर रब्बीच्या रोपांवरही विपरीत परिणाम होत आहे.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरagricultureशेती