शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:27 IST

नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडत आहे.या धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.अपुऱ्या पाण्यावर पिकविलेल्या पिकांची अवस्था धुक्याने केला कहर... अण् शेतीचा गेला बहर अशी अवस्था सध्या नायगाव खो-यातील शेतक-यांची झाली आहे.

ठळक मुद्देऐन बहरात आलेले पीक विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतातच सडु लागले आहे.

नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडत आहे.या धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.अपुऱ्या पाण्यावर पिकविलेल्या पिकांची अवस्था धुक्याने केला कहर... अण् शेतीचा गेला बहर अशी अवस्था सध्या नायगाव खो-यातील शेतक-यांची झाली आहे.संपूर्ण पावसाळा संपत आला तरी नायगाव खो-यात अजून एकही जोरदार पाऊस पडला नाही.परिणामी खो-यातील सर्वच बांधारे व नदी-नाले आजही कोरडेठाक आहे.अशा परस्थितीत शेतक-यांनी कमी पाण्यावर थोड्याच क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली आहे.हे पीक रिमझिम पावसावर व महागडी खते,बियाणे तसेच किटकनाशके मारून आजपर्यंत तग धरून आहे.सध्या हे सर्वच पीक ऐन बहरात आले आहे.मात्र गेल्या तीनचार दिवसांपासून नायगाव खो-यात धुक्याने कहर केला आहे.त्यामुळे ऐन बहरात आलेले पीक विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतातच सडु लागले आहे.सध्या पडत असलेल्या धुक्यामुळे खरिपाच्या पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.त्यात या पिकांवर करपा,पिवळ तसेच काढणीला आलेल्या पिकांवर डाग पडण्याचे प्रमाण वाढले आहे.विशेषतः रब्बीच्या कांदा रोपांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहे.चौकट - गेल्या चार दिवसांपासून दररोज येणाऱ्या धुक्यामुळे परिसरातील कोबी,फ्लावर,टमाटे,मिरची आदीसह विविध भाज्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.दररोज येणाऱ्या धुक्यामुळे पिकांवर होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना महाड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहे.चौकट - यंदा कोरोनामुळे निर्माण झालेल्या लाँकडावून च्या भीतीने शेतक-यांनी कमी प्रमाणात भाजीपाला केला.परिणामी भाज्यांचे बाजारभाव कडाडले.कधी नव्हे यंदा शेतकऱ्यांना दोन पैसे कमवण्याची वेळ आली होती.मात्र या दररोज येणाऱ्या धुक्याच्या कहरामुळे हा भाजीपाला शेतातच सडु लागला आहे.हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.फोटो ओळी - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या चार दिवसांपासून अशा प्रकारे दाट धुके पडत आहे.या सतच्या धुईमुळे खरिपा बरोबर रब्बीच्या रोपांवरही विपरीत परिणाम होत आहे.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरagricultureशेती