शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचे फायदे अन् तोटेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:21 IST

सध्या सोशल मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले असून, त्यातून बाहेर पडणे मुश्किल होत आहे. परंतु सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही असल्याने याचा विचार वापरकर्त्यांनी करायला हवा. सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जाणाºया मजकुराला विश्वासार्हता नसल्याने त्यातून दुष्परिणाम होण्याचीच अधिक शक्यता असते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.

नाशिक : सध्या सोशल मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले असून, त्यातून बाहेर पडणे मुश्किल होत आहे. परंतु सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही असल्याने याचा विचार वापरकर्त्यांनी करायला हवा. सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जाणाºया मजकुराला विश्वासार्हता नसल्याने त्यातून दुष्परिणाम होण्याचीच अधिक शक्यता असते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंपर्क विभागाच्या एचपीटी महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रावर विशेष संपर्कसत्राचे आयोजन केले होते. यावेळी समन्वयक श्रीकांत सोनवणे आणि अशोक देशपांडे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. मुळे म्हणाले की, पत्रकारिता करताना सोशल मीडिया त्यास फायदेशीर ठरत आहे. परंतु जोपर्यंत सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या मजकुराची शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे धाडसाचे होईल. यावेळी डॉ. मुळे यांनी, ‘बातमी’ या अनुषंगाने माहिती देताना म्हटले की, कुठल्याही विषयाची बातमी होऊ शकते. मात्र त्यासाठी प्रत्येक बातमीदाराने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन वार्तांकन करण्याची गरज आहे. असे केल्यास त्याचा बातमीदारालाही फायदा होत असून, त्याच्या जनसंपर्कात वाढच होते. शिवाय बातमीचे स्त्रोतही त्याला निर्माण करता येतात.  यावेळी डॉ. मुळे यांनी, विद्यार्थ्यांची मते जाणून घेऊन त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. यात बहुतांश विद्यार्थ्यांनी  सोशल मीडियाशी निगडीत प्रश्न विचारले असता, त्यांनी सोशल मीडियावर वापर करताना दक्षता घ्यावी असा सूचक सल्ला दिला. कारण सोशल मीडियांच्या जाळ्यात ज्या पद्धतीने सध्याचा तरुण अडकत आहे, त्यावरून त्याचा वापर करताना दक्षता घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.