शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सोशल मीडियाचे फायदे अन् तोटेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:21 IST

सध्या सोशल मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले असून, त्यातून बाहेर पडणे मुश्किल होत आहे. परंतु सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही असल्याने याचा विचार वापरकर्त्यांनी करायला हवा. सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जाणाºया मजकुराला विश्वासार्हता नसल्याने त्यातून दुष्परिणाम होण्याचीच अधिक शक्यता असते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.

नाशिक : सध्या सोशल मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले असून, त्यातून बाहेर पडणे मुश्किल होत आहे. परंतु सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही असल्याने याचा विचार वापरकर्त्यांनी करायला हवा. सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जाणाºया मजकुराला विश्वासार्हता नसल्याने त्यातून दुष्परिणाम होण्याचीच अधिक शक्यता असते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंपर्क विभागाच्या एचपीटी महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रावर विशेष संपर्कसत्राचे आयोजन केले होते. यावेळी समन्वयक श्रीकांत सोनवणे आणि अशोक देशपांडे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. मुळे म्हणाले की, पत्रकारिता करताना सोशल मीडिया त्यास फायदेशीर ठरत आहे. परंतु जोपर्यंत सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या मजकुराची शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे धाडसाचे होईल. यावेळी डॉ. मुळे यांनी, ‘बातमी’ या अनुषंगाने माहिती देताना म्हटले की, कुठल्याही विषयाची बातमी होऊ शकते. मात्र त्यासाठी प्रत्येक बातमीदाराने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन वार्तांकन करण्याची गरज आहे. असे केल्यास त्याचा बातमीदारालाही फायदा होत असून, त्याच्या जनसंपर्कात वाढच होते. शिवाय बातमीचे स्त्रोतही त्याला निर्माण करता येतात.  यावेळी डॉ. मुळे यांनी, विद्यार्थ्यांची मते जाणून घेऊन त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. यात बहुतांश विद्यार्थ्यांनी  सोशल मीडियाशी निगडीत प्रश्न विचारले असता, त्यांनी सोशल मीडियावर वापर करताना दक्षता घ्यावी असा सूचक सल्ला दिला. कारण सोशल मीडियांच्या जाळ्यात ज्या पद्धतीने सध्याचा तरुण अडकत आहे, त्यावरून त्याचा वापर करताना दक्षता घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.