शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसमधून प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:13 AM

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये १२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अजूनही तब्बल १२ ...

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये १२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अजूनही तब्बल १२ हजार ९७० जागा रिक्त असताना या रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविताना एसईबीसी प्रवर्गातील विद्यर्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्यामुळे गुरुवारी (दि. २४) डिसेंबर रोजी जाहीर होणारे यादी पुढे ढकलण्यात आली असून विशेष फेरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण विभागाने दिली आहे.

राज्य सरकारने बुधवारी (दि. २३) एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्यता दिली. त्यानुसार एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएस किंवा सर्वसाधारण प्रवर्ग निवडण्यासाठी अकरावीच्या ऑनालाइन प्रवेश प्रक्रिया पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र विशेष फेरीचे महाविद्यालय वाटप स्थगित करण्यात आले असून यासंबंधीचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु, आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्यांना २६ डिसेंबरपर्यंत प्रवर्ग बदलण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना भाग एक भरून लॉक करणे, पडताळणी करून घेणे तसेच पूर्वी घेतलेला प्रवेश रद्द करून विशेष फेरीसाठी तत्काळ अर्ज करण्याची प्रक्रिया करता येणार आहे. त्यानंतर २७ डिसेंबरला प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरणे, निवडलेल्या पर्यायांमध्ये बदल करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, या फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांने ऑनलाइन संमतिपत्र देणे बंधनकारक असल्याची सूचना विभागीय शिक्षण संचालकांनी केली आहे.